शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला लागला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाची ३६५ पदांसाठी १८ संवर्गाच्या भरतीची जाहिरात १ मार्च २०१९ रोजी काढण्यात आली होती. ...

औरंगाबाद : जिल्हा परिषद आरोग्य विभागाची ३६५ पदांसाठी १८ संवर्गाच्या भरतीची जाहिरात १ मार्च २०१९ रोजी काढण्यात आली होती. मात्र, आरक्षण, कोरोना आणि विविध निवडणुकांमुळे रखडलेल्या भरतीला अखेर आता मुहूर्त लागला आहे. ५ संवर्गातील पदे १०० टक्के भरण्याला मंजुरी मिळाल्याने आता २६५ पदांची जाहिरात २९ जून रोजी प्रसिद्ध होणार आहे, अशी माहिती जि.प. आरोग्य सभापती अविनाश गलांडे यांनी शनिवारी दिली.

याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. सुधाकर शेळके म्हणाले, सरळ सेवा भरतीला पाच संवर्गातील १०० टक्के भरण्याची मंजुरी मिळाली. दिव्यांगाचे आरक्षण ३ टक्क्यांहून चार टक्के करण्यात आले आहे, तर दिव्यांगात पूर्वी एकच प्रकार होता. आता लर्निंग डिसॅबिलीटी, अंध, अपंग, मूकबधिर, ॲसिड हल्ल्यातील पीडित, सेलेब्रल पाल्सी आदींसह समांतर आरक्षणात बदल होऊन २६५ पदांची २९ जूनला जाहिरात प्रसिद्ध होईल. त्यानंतर ७ आणि ८ ऑगस्टला परीक्षा होणार आहे. यात आरोग्यसेविकांची १८९, आरोग्यसेवक ६६, औषधनिर्माण अधिकारी ८, तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ २ अशा पदांचा समावेश आहे. ही भदे भरल्यास आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताणही कमी होणार आहे.

---

ग्रामविकास विभागाकडून भरती

सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे म्हणाले, आता ही भरती ग्रामविकास विभागामार्फत होणार आहे. एसईबीसीची पदे खुली करण्यात आली असून, त्यांना आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) किंवा खुल्या प्रवर्गाचा पर्याय उमेदवारांना निवडून लेखी परीक्षा देता येणार आहे.

---

३३ लाखांच्या खर्चाला मान्यता

आरोग्य समितीच्या बैठकीत पाणी गुणवत्ता सर्वेक्षणासाठी एक लाख, जटवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संरक्षण भितींच्या बांधकामासाठी आठ लाख रुपये, श्वान, सर्पदंश, धनुर्वात लस खरेदीसाठी पाच लाख, साथरोग साहित्य खरेदीसाठी चार लाख, तर १५ लाखांच्या औषधी खरेदीसाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची माहिती आरोग्य सभापती गलांडे यांनी दिली.

---

डेंग्यूचा धोका; ग्रामीणमध्ये ७ रुग्ण, १ मृत्यू

आतापर्यंत कन्नड तालुक्यात जैतापूर येथे ५ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले तर औरंगाबाद तालुक्यात सरताळासह २ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ४ महिन्याच्या बालकाचा डेंगीमुळे मृत्यू झाला. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर डेंगीला आळा घालण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जनजागृती करण्याचे निर्देश गलांडे यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत.

---

आरोग्य केंद्रावर १०० टेस्ट करा

जिल्ह्यात १४९ गावांत अद्याप कोरोनाचे संक्रमण पोहोचलेले नाही. त्याशिवाय कोरोनामुक्त झालेल्या गावांत पुन्हा संक्रमण होणार नाही. यासाठी खबरदारी तसेच आरटीपीसीआर तपासण्या प्रत्येक आरोग्य केंद्र परिसरात दररोज किमान १०० होणे गरजेचे आहे. मात्र, नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आठवडी बाजार, छोटे व्यापारी यांच्या मदतीने ग्रामपंचायत, सहकारी सोसायट्यांनी प्रबोधन मोहीम राबवण्याच्या सूचनाही आरोग्य समितीच्या बैठकीत देण्यात आल्या.