शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

‘मोदी सरकारचा उद्योगपतीचा चेहरा लवकरच बाहेर येईल’

By admin | Updated: May 30, 2014 01:01 IST

औरंगाबाद : मोदी सरकार गरिबाला थारा देणार नाही, या सरकारचा उद्योगपतीचा चेहरा लवकरच बाहेर येईल, असे मत आम आदमी पार्टीचे मयंक गांधी यांनी व्यक्त केले.

औरंगाबाद : मोदी सरकार गरिबाला थारा देणार नाही, या सरकारचा उद्योगपतीचा चेहरा लवकरच बाहेर येईल, असे मत आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य, तथा महाराष्ट्र प्रभारी मयंक गांधी यांनी गुरुवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची मीमांसा करण्यासाठी आपतर्फे गुरुवारी मराठवाडास्तरीय कार्यकर्त्यांचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मयंक गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत आम्ही वाहून गेलो; परंतु विधानसभेत निकाल वेगळेच येतील. आम्ही काँग्रेसला पर्याय म्हणून समोर आलो असून, भविष्यात भाजपा व आम्हीच राहू. काँग्रेस नेस्तनाबूत होईल. लोकसभेत पराभव का झाला, यावर दिवसभरात झालेल्या मंथनाचा सार सांगताना ते म्हणाले, मोदी लाटेमुळे संभ्रमित झालेला कार्यकर्ता, राजकीय डावपेच, पैशांची कमतरता, कार्यकर्त्यांतील समन्वय व प्रशिक्षणाचा अभाव आदी आमची पराभवाची कारणे आहेत. परंतु भविष्यात आम्ही कार्यकर्त्यांना अधिक सबळ करण्यासाठी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणार आहोत. कार्यकर्त्यांनी माहिती अधिकाराचा अधिकाधिक वापर करावा, यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण देणार आहोत. यावेळी नंदू माधव, सुभाष लोमटे, अण्णा खंदारे, मनीषा चौधरी, हरमितसिंग, जालन्याचे सुभाष देठे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.