शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
4
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
5
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
6
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
7
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
8
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
9
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
10
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
11
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
12
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
13
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
14
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
15
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
16
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
17
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
18
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
19
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
20
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक

मोबाईलने ' मेमरी ' घालविली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:03 IST

राम शिनगारे औरंगाबाद : १०० मीटर चालत जायचे असेल तर दुचाकी बाहेर काढली जाते. कोणाची आठवण ठेवायची असेल तर ...

राम शिनगारे

औरंगाबाद : १०० मीटर चालत जायचे असेल तर दुचाकी बाहेर काढली जाते. कोणाची आठवण ठेवायची असेल तर मोबाईलवर रिमाईंडर लावले जाते. झोपेतून उठवण्यासाठी मोबाईलचा अलार्म काम करतो. त्याच प्रकारे स्वत:चा दुसरा मोबाईल नंबरही मोबाईलमध्ये पाहून सांगावा लागतो. मित्र, नातेवाईकांचे मोबाईल नंबर पाठ असणे तर दूरची गोष्ट. ही सर्व अवस्था मोबाईल नावाच्या यंत्राने केली आहे. माेबाईल कंपन्यांनी वापरकर्त्यांच्या गरजांचा अभ्यास करून त्याप्रमाणे बदल करीत मानवी मेंदूवर नियंत्रण मिळविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सहजासहजी बदलणे शक्य नसल्याचा दावाही काही मानसोपचार तज्ज्ञांनी केला आहे.

असे का होते?

- मोबाईल उद्योगाने ग्राहकांची मानसिकता ओळखून वेळ, अलार्मसह इतर सुविधा उपलब्ध करून देत ब्रेनवर कब्जा मिळवला आहे.

- एकदा सवय लागली की, अवलंबित्व वाढत जाते. दोन बटन दाबले की, सेव केलेला नंबर दिसून येतो. त्यामुळे तो लक्षात ठेवण्याची किंवा पाठ करण्याची गरज राहत नाही. पूर्वी मोबाईल तुरळक प्रमाणात होते. सेव करण्यासाठी मेमरी अल्प होती. आता त्यात बदल झाला आहे.

- अनेकवेळा व्यक्तीचा चेहरा आठवतो, मात्र नाव आठवत नाही. हे सर्व मेमरी लॉस होण्याचा परिणाम आहे.

असे टाळण्यासाठी हे करावे

-आपण कोणावर तरी अवलंबून आहोत हे टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.

-दिनचर्या ठरवणे, नैसर्गिक दिनचर्या राखणे आणि स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे.

-श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत. दिवसात तीनवेळा मी काय करतो ? मला काय केले पाहिजे? जे करतो ते बरोबर आहे का? हे तपासून घेतले पाहिजे.

-सतत डायरी आणि पेन सोबत ठेवले पाहिजे. दिवसात आठ ते नऊ तास झोप घेतली पाहिजेत.

कोट,

आपले अवलंबित्व वाढत चालले आहे. प्रत्येक गोष्टी आपण मेहनत न घेता, मेंदूला कोणताही ताण न देता करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे मेमरी लॉस होण्यासारखे परिणाम समोर येत आहेत. हे परिणाम दीर्घकालीन असल्यामुळे प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे. मेंदूवर सतत ताण दिला पाहिजे.

- डॉ. संदीप सिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ

आजोबा

युवा असताना फोन आले. तेव्हा गावात एक दोन फोन होते. त्यानंतर गेल्या २० वर्षांपूर्वी मोजक्या जणांजवळ मोबाईल होते. त्यामुळे ते नंबर तोंडपाठ होते. आता स्किमनुसार नंबर बदलले जातात. त्यामुळे ते पाठ होणे शक्य होत नाही, असे कृष्णा खेडकर यांनी सांगितले.

वडील

मोबाईलमध्ये सर्वच नंबर सेव असल्यामुळे त्याकडे कधी पाहिलेच नाही. त्यामुळे पाठ करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. तरीही घरातील दोघां तिघांचे नंबर पाठ आहेत, असे राजू खेडकर यांनी सांगितले.

नातू

आई-बाबांसह नातेवाईकांचे मोबाईल नंबर पाठ आहेत. मोबाईल नसल्यामुळे नातेवाईकांना फोन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नेहमीच फोन लावण्यासाठी पाठ असलेल्या मोबाईलचा वापर करत असतो, असे नातू ललित खेडकर यांनी सांगितले.