शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलने ' मेमरी ' घालविली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:03 IST

राम शिनगारे औरंगाबाद : १०० मीटर चालत जायचे असेल तर दुचाकी बाहेर काढली जाते. कोणाची आठवण ठेवायची असेल तर ...

राम शिनगारे

औरंगाबाद : १०० मीटर चालत जायचे असेल तर दुचाकी बाहेर काढली जाते. कोणाची आठवण ठेवायची असेल तर मोबाईलवर रिमाईंडर लावले जाते. झोपेतून उठवण्यासाठी मोबाईलचा अलार्म काम करतो. त्याच प्रकारे स्वत:चा दुसरा मोबाईल नंबरही मोबाईलमध्ये पाहून सांगावा लागतो. मित्र, नातेवाईकांचे मोबाईल नंबर पाठ असणे तर दूरची गोष्ट. ही सर्व अवस्था मोबाईल नावाच्या यंत्राने केली आहे. माेबाईल कंपन्यांनी वापरकर्त्यांच्या गरजांचा अभ्यास करून त्याप्रमाणे बदल करीत मानवी मेंदूवर नियंत्रण मिळविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सहजासहजी बदलणे शक्य नसल्याचा दावाही काही मानसोपचार तज्ज्ञांनी केला आहे.

असे का होते?

- मोबाईल उद्योगाने ग्राहकांची मानसिकता ओळखून वेळ, अलार्मसह इतर सुविधा उपलब्ध करून देत ब्रेनवर कब्जा मिळवला आहे.

- एकदा सवय लागली की, अवलंबित्व वाढत जाते. दोन बटन दाबले की, सेव केलेला नंबर दिसून येतो. त्यामुळे तो लक्षात ठेवण्याची किंवा पाठ करण्याची गरज राहत नाही. पूर्वी मोबाईल तुरळक प्रमाणात होते. सेव करण्यासाठी मेमरी अल्प होती. आता त्यात बदल झाला आहे.

- अनेकवेळा व्यक्तीचा चेहरा आठवतो, मात्र नाव आठवत नाही. हे सर्व मेमरी लॉस होण्याचा परिणाम आहे.

असे टाळण्यासाठी हे करावे

-आपण कोणावर तरी अवलंबून आहोत हे टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.

-दिनचर्या ठरवणे, नैसर्गिक दिनचर्या राखणे आणि स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे.

-श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत. दिवसात तीनवेळा मी काय करतो ? मला काय केले पाहिजे? जे करतो ते बरोबर आहे का? हे तपासून घेतले पाहिजे.

-सतत डायरी आणि पेन सोबत ठेवले पाहिजे. दिवसात आठ ते नऊ तास झोप घेतली पाहिजेत.

कोट,

आपले अवलंबित्व वाढत चालले आहे. प्रत्येक गोष्टी आपण मेहनत न घेता, मेंदूला कोणताही ताण न देता करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे मेमरी लॉस होण्यासारखे परिणाम समोर येत आहेत. हे परिणाम दीर्घकालीन असल्यामुळे प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे. मेंदूवर सतत ताण दिला पाहिजे.

- डॉ. संदीप सिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ

आजोबा

युवा असताना फोन आले. तेव्हा गावात एक दोन फोन होते. त्यानंतर गेल्या २० वर्षांपूर्वी मोजक्या जणांजवळ मोबाईल होते. त्यामुळे ते नंबर तोंडपाठ होते. आता स्किमनुसार नंबर बदलले जातात. त्यामुळे ते पाठ होणे शक्य होत नाही, असे कृष्णा खेडकर यांनी सांगितले.

वडील

मोबाईलमध्ये सर्वच नंबर सेव असल्यामुळे त्याकडे कधी पाहिलेच नाही. त्यामुळे पाठ करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. तरीही घरातील दोघां तिघांचे नंबर पाठ आहेत, असे राजू खेडकर यांनी सांगितले.

नातू

आई-बाबांसह नातेवाईकांचे मोबाईल नंबर पाठ आहेत. मोबाईल नसल्यामुळे नातेवाईकांना फोन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नेहमीच फोन लावण्यासाठी पाठ असलेल्या मोबाईलचा वापर करत असतो, असे नातू ललित खेडकर यांनी सांगितले.