शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
3
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
4
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
5
अर्जुन तेंडुलकसंदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
6
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
7
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
8
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
9
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
10
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
11
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
12
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
13
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
14
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
15
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
16
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
17
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
18
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
19
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
20
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

मोबाईलने ' मेमरी ' घालविली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:03 IST

राम शिनगारे औरंगाबाद : १०० मीटर चालत जायचे असेल तर दुचाकी बाहेर काढली जाते. कोणाची आठवण ठेवायची असेल तर ...

राम शिनगारे

औरंगाबाद : १०० मीटर चालत जायचे असेल तर दुचाकी बाहेर काढली जाते. कोणाची आठवण ठेवायची असेल तर मोबाईलवर रिमाईंडर लावले जाते. झोपेतून उठवण्यासाठी मोबाईलचा अलार्म काम करतो. त्याच प्रकारे स्वत:चा दुसरा मोबाईल नंबरही मोबाईलमध्ये पाहून सांगावा लागतो. मित्र, नातेवाईकांचे मोबाईल नंबर पाठ असणे तर दूरची गोष्ट. ही सर्व अवस्था मोबाईल नावाच्या यंत्राने केली आहे. माेबाईल कंपन्यांनी वापरकर्त्यांच्या गरजांचा अभ्यास करून त्याप्रमाणे बदल करीत मानवी मेंदूवर नियंत्रण मिळविल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती सहजासहजी बदलणे शक्य नसल्याचा दावाही काही मानसोपचार तज्ज्ञांनी केला आहे.

असे का होते?

- मोबाईल उद्योगाने ग्राहकांची मानसिकता ओळखून वेळ, अलार्मसह इतर सुविधा उपलब्ध करून देत ब्रेनवर कब्जा मिळवला आहे.

- एकदा सवय लागली की, अवलंबित्व वाढत जाते. दोन बटन दाबले की, सेव केलेला नंबर दिसून येतो. त्यामुळे तो लक्षात ठेवण्याची किंवा पाठ करण्याची गरज राहत नाही. पूर्वी मोबाईल तुरळक प्रमाणात होते. सेव करण्यासाठी मेमरी अल्प होती. आता त्यात बदल झाला आहे.

- अनेकवेळा व्यक्तीचा चेहरा आठवतो, मात्र नाव आठवत नाही. हे सर्व मेमरी लॉस होण्याचा परिणाम आहे.

असे टाळण्यासाठी हे करावे

-आपण कोणावर तरी अवलंबून आहोत हे टाळण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत.

-दिनचर्या ठरवणे, नैसर्गिक दिनचर्या राखणे आणि स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे.

-श्वसनाचे व्यायाम केले पाहिजेत. दिवसात तीनवेळा मी काय करतो ? मला काय केले पाहिजे? जे करतो ते बरोबर आहे का? हे तपासून घेतले पाहिजे.

-सतत डायरी आणि पेन सोबत ठेवले पाहिजे. दिवसात आठ ते नऊ तास झोप घेतली पाहिजेत.

कोट,

आपले अवलंबित्व वाढत चालले आहे. प्रत्येक गोष्टी आपण मेहनत न घेता, मेंदूला कोणताही ताण न देता करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे मेमरी लॉस होण्यासारखे परिणाम समोर येत आहेत. हे परिणाम दीर्घकालीन असल्यामुळे प्रत्येकाने मेहनत घेतली पाहिजे. मेंदूवर सतत ताण दिला पाहिजे.

- डॉ. संदीप सिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ

आजोबा

युवा असताना फोन आले. तेव्हा गावात एक दोन फोन होते. त्यानंतर गेल्या २० वर्षांपूर्वी मोजक्या जणांजवळ मोबाईल होते. त्यामुळे ते नंबर तोंडपाठ होते. आता स्किमनुसार नंबर बदलले जातात. त्यामुळे ते पाठ होणे शक्य होत नाही, असे कृष्णा खेडकर यांनी सांगितले.

वडील

मोबाईलमध्ये सर्वच नंबर सेव असल्यामुळे त्याकडे कधी पाहिलेच नाही. त्यामुळे पाठ करण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. तरीही घरातील दोघां तिघांचे नंबर पाठ आहेत, असे राजू खेडकर यांनी सांगितले.

नातू

आई-बाबांसह नातेवाईकांचे मोबाईल नंबर पाठ आहेत. मोबाईल नसल्यामुळे नातेवाईकांना फोन करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. नेहमीच फोन लावण्यासाठी पाठ असलेल्या मोबाईलचा वापर करत असतो, असे नातू ललित खेडकर यांनी सांगितले.