शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
2
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
3
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
4
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
5
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
6
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
7
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
9
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
10
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
11
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
12
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
13
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
14
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
15
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
16
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
17
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
18
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
19
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
20
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!

नवरा-बायकोमधील वादाला कारणीभूत ‘मोबाइल फोेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:06 IST

मॅडम माझी बायको सतत मोबाइलवर बोलते, माझा नवरा रात्रंदिवस मोबाइलवर चॅटिंग करतो, यामुळे आमच्यात सतत भांडण होत असल्याने आम्ही आता एकत्र राहू शकत नाही, अशा प्रकारच्या सुमारे ८० टक्के तक्रारी रोज पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण मंचात दाखल होतात. यातील ५० टक्के जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना यश येते.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मॅडम माझी बायको सतत मोबाइलवर बोलते, माझा नवरा रात्रंदिवस मोबाइलवर चॅटिंग करतो, यामुळे आमच्यात सतत भांडण होत असल्याने आम्ही आता एकत्र राहू शकत नाही, अशा प्रकारच्या सुमारे ८० टक्के तक्रारी रोज पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण मंचात दाखल होतात. यातील ५० टक्के जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना यश येते.याविषयी अधिक माहिती अशी की, लग्न झाल्यानंतर संसार सुरळीत चालावा, यासाठी पती-पत्नीसोबतच सासर आणि माहेरच्या मंडळींची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते. आजच्या सारखी पूर्वी दळणवळण आणि संपर्काची साधने नव्हती. यामुळे सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी निरोप पत्राद्वारेच पाठवावेलागत.दिवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन अशा सणासाठी ती माहेरी जाई. आता मात्र मोबाइल आणि दळणवळणाच्या साधनांमुळे जग जवळच आले आहे.पती-पत्नीत भांडण जेव्हा विकोपाला जाते तेव्हा प्रकरण पोलिसांच्या दारात पोहोचते. तेव्हा पोलीस ठाण्याचे अधिकारी ही तक्रार महिला तक्रार निवारण मंचाकडे वर्ग करते. जानेवारीपासून आतापर्यंत ११६७ तक्रारी दाखल झाल्या. यापैैकी २३७ जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलिसांना यश आले.२०१ जोडप्यांच्या तक्रारी विविध कारणांमुळे निकाली काढल्या, तर १४१ जोडप्यांना पोलीस ठाण्यात तर १३८ जोडप्यांना कोर्टात पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी दिली. तसेच ३७० जोडप्यांचे समुपदेशन सध्या आम्ही करीत आहोत.त्या म्हणाल्या की, पती-पत्नीच्या वादाला कारणीभूत असलेल्या विविध कारणांमध्ये मोबाइल हे प्रमुख कारण म्हणून वेगाने पुढे येऊ लागले. सासरी काही भांडण झाले तर विवाहिता लगेच माहेरी फोन करून सर्वकाही सांगते. यानंतर माहेरच्या मंडळीकडून तिच्या घरात हस्तक्षेप करण्यास सुरुवात होते आणि वाद पोलिसांपर्यंत येतो.संयुक्त कुटुंबात राहून संसार करण्यास अनेक मुली नकार देतात. त्यांना पतीसोबत वेगळे राहायचे असते, तर मुलाला आई-वडिलासोबत. यामुळे पती-पत्नीत भांडण होते, तर एकुलत्या एक मुलाच्या लग्नानंतर त्याच्या आई-वडिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. सून मुलाला आपल्यापासून दूर नेईन असे त्यांना वाटते. त्यांचा सांभाळ करणारी सून त्यांना हवी असते तर सुनेला सासू-सासरे नको असतात. पती-पत्नीपैकी कोणाचेतरी बाहेर अफेअर असणे, हे एक कारण संसार तुटण्यात असते. मोबाइलवर सतत चॅटिंग करण्याच्या कारणातूनही जोडप्यात भांडण होते, असे पोलीस निरीक्षक पाटील म्हणाल्या.