शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

नवरा-बायकोमधील वादाला कारणीभूत ‘मोबाइल फोेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:06 IST

मॅडम माझी बायको सतत मोबाइलवर बोलते, माझा नवरा रात्रंदिवस मोबाइलवर चॅटिंग करतो, यामुळे आमच्यात सतत भांडण होत असल्याने आम्ही आता एकत्र राहू शकत नाही, अशा प्रकारच्या सुमारे ८० टक्के तक्रारी रोज पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण मंचात दाखल होतात. यातील ५० टक्के जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना यश येते.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मॅडम माझी बायको सतत मोबाइलवर बोलते, माझा नवरा रात्रंदिवस मोबाइलवर चॅटिंग करतो, यामुळे आमच्यात सतत भांडण होत असल्याने आम्ही आता एकत्र राहू शकत नाही, अशा प्रकारच्या सुमारे ८० टक्के तक्रारी रोज पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण मंचात दाखल होतात. यातील ५० टक्के जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना यश येते.याविषयी अधिक माहिती अशी की, लग्न झाल्यानंतर संसार सुरळीत चालावा, यासाठी पती-पत्नीसोबतच सासर आणि माहेरच्या मंडळींची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते. आजच्या सारखी पूर्वी दळणवळण आणि संपर्काची साधने नव्हती. यामुळे सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी निरोप पत्राद्वारेच पाठवावेलागत.दिवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन अशा सणासाठी ती माहेरी जाई. आता मात्र मोबाइल आणि दळणवळणाच्या साधनांमुळे जग जवळच आले आहे.पती-पत्नीत भांडण जेव्हा विकोपाला जाते तेव्हा प्रकरण पोलिसांच्या दारात पोहोचते. तेव्हा पोलीस ठाण्याचे अधिकारी ही तक्रार महिला तक्रार निवारण मंचाकडे वर्ग करते. जानेवारीपासून आतापर्यंत ११६७ तक्रारी दाखल झाल्या. यापैैकी २३७ जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलिसांना यश आले.२०१ जोडप्यांच्या तक्रारी विविध कारणांमुळे निकाली काढल्या, तर १४१ जोडप्यांना पोलीस ठाण्यात तर १३८ जोडप्यांना कोर्टात पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी दिली. तसेच ३७० जोडप्यांचे समुपदेशन सध्या आम्ही करीत आहोत.त्या म्हणाल्या की, पती-पत्नीच्या वादाला कारणीभूत असलेल्या विविध कारणांमध्ये मोबाइल हे प्रमुख कारण म्हणून वेगाने पुढे येऊ लागले. सासरी काही भांडण झाले तर विवाहिता लगेच माहेरी फोन करून सर्वकाही सांगते. यानंतर माहेरच्या मंडळीकडून तिच्या घरात हस्तक्षेप करण्यास सुरुवात होते आणि वाद पोलिसांपर्यंत येतो.संयुक्त कुटुंबात राहून संसार करण्यास अनेक मुली नकार देतात. त्यांना पतीसोबत वेगळे राहायचे असते, तर मुलाला आई-वडिलासोबत. यामुळे पती-पत्नीत भांडण होते, तर एकुलत्या एक मुलाच्या लग्नानंतर त्याच्या आई-वडिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. सून मुलाला आपल्यापासून दूर नेईन असे त्यांना वाटते. त्यांचा सांभाळ करणारी सून त्यांना हवी असते तर सुनेला सासू-सासरे नको असतात. पती-पत्नीपैकी कोणाचेतरी बाहेर अफेअर असणे, हे एक कारण संसार तुटण्यात असते. मोबाइलवर सतत चॅटिंग करण्याच्या कारणातूनही जोडप्यात भांडण होते, असे पोलीस निरीक्षक पाटील म्हणाल्या.