शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

नवरा-बायकोमधील वादाला कारणीभूत ‘मोबाइल फोेन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:06 IST

मॅडम माझी बायको सतत मोबाइलवर बोलते, माझा नवरा रात्रंदिवस मोबाइलवर चॅटिंग करतो, यामुळे आमच्यात सतत भांडण होत असल्याने आम्ही आता एकत्र राहू शकत नाही, अशा प्रकारच्या सुमारे ८० टक्के तक्रारी रोज पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण मंचात दाखल होतात. यातील ५० टक्के जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना यश येते.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मॅडम माझी बायको सतत मोबाइलवर बोलते, माझा नवरा रात्रंदिवस मोबाइलवर चॅटिंग करतो, यामुळे आमच्यात सतत भांडण होत असल्याने आम्ही आता एकत्र राहू शकत नाही, अशा प्रकारच्या सुमारे ८० टक्के तक्रारी रोज पोलीस आयुक्तालयातील महिला तक्रार निवारण मंचात दाखल होतात. यातील ५० टक्के जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलीस अधिकारी, कर्मचा-यांना यश येते.याविषयी अधिक माहिती अशी की, लग्न झाल्यानंतर संसार सुरळीत चालावा, यासाठी पती-पत्नीसोबतच सासर आणि माहेरच्या मंडळींची भूमिकाही महत्त्वाची ठरत असते. आजच्या सारखी पूर्वी दळणवळण आणि संपर्काची साधने नव्हती. यामुळे सासरी गेलेल्या विवाहितेला माहेरी निरोप पत्राद्वारेच पाठवावेलागत.दिवाळी, भाऊबीज, रक्षाबंधन अशा सणासाठी ती माहेरी जाई. आता मात्र मोबाइल आणि दळणवळणाच्या साधनांमुळे जग जवळच आले आहे.पती-पत्नीत भांडण जेव्हा विकोपाला जाते तेव्हा प्रकरण पोलिसांच्या दारात पोहोचते. तेव्हा पोलीस ठाण्याचे अधिकारी ही तक्रार महिला तक्रार निवारण मंचाकडे वर्ग करते. जानेवारीपासून आतापर्यंत ११६७ तक्रारी दाखल झाल्या. यापैैकी २३७ जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांची मने जुळविण्यात पोलिसांना यश आले.२०१ जोडप्यांच्या तक्रारी विविध कारणांमुळे निकाली काढल्या, तर १४१ जोडप्यांना पोलीस ठाण्यात तर १३८ जोडप्यांना कोर्टात पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण पाटील यांनी दिली. तसेच ३७० जोडप्यांचे समुपदेशन सध्या आम्ही करीत आहोत.त्या म्हणाल्या की, पती-पत्नीच्या वादाला कारणीभूत असलेल्या विविध कारणांमध्ये मोबाइल हे प्रमुख कारण म्हणून वेगाने पुढे येऊ लागले. सासरी काही भांडण झाले तर विवाहिता लगेच माहेरी फोन करून सर्वकाही सांगते. यानंतर माहेरच्या मंडळीकडून तिच्या घरात हस्तक्षेप करण्यास सुरुवात होते आणि वाद पोलिसांपर्यंत येतो.संयुक्त कुटुंबात राहून संसार करण्यास अनेक मुली नकार देतात. त्यांना पतीसोबत वेगळे राहायचे असते, तर मुलाला आई-वडिलासोबत. यामुळे पती-पत्नीत भांडण होते, तर एकुलत्या एक मुलाच्या लग्नानंतर त्याच्या आई-वडिलांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. सून मुलाला आपल्यापासून दूर नेईन असे त्यांना वाटते. त्यांचा सांभाळ करणारी सून त्यांना हवी असते तर सुनेला सासू-सासरे नको असतात. पती-पत्नीपैकी कोणाचेतरी बाहेर अफेअर असणे, हे एक कारण संसार तुटण्यात असते. मोबाइलवर सतत चॅटिंग करण्याच्या कारणातूनही जोडप्यात भांडण होते, असे पोलीस निरीक्षक पाटील म्हणाल्या.