शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

मनसेचे ‘हलगी नाद’ आंदोलन !

By admin | Updated: January 9, 2015 00:50 IST

लातूर : उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मांजरा सहकारी साखर कारखान्यासमोर शुक्रवारी ‘हलगी नाद’ आंदोलन करण्यात आले.

लातूर : उसाला एफआरपीप्रमाणे दर देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मांजरा सहकारी साखर कारखान्यासमोर शुक्रवारी ‘हलगी नाद’ आंदोलन करण्यात आले. लातूर जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १४०० ते ११०० रुपये प्रमाणे पहिला हप्ता दिला आहे. जो भाव एफआरपीपेक्षा ६०० ते ७०० रुपयांनी कमी आहे, शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे भाव न दिल्यास कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून मनसेच्या वतीने धरणे, उपोषण, रस्ता रोको, पानगाव येथील कारखान्यासमोर हलगी नाद आंदोलन करण्यात आले असून, शुक्रवारी मांजरा कारखान्यासमोर मनसे कार्यकर्त्यांनी एक तास ‘हलगी नाद’ आंदोलन केले. आंदोलनात मनसेचे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे, शिवकुमार नागराळे, प्रसाद स्वामी, लताताई गायकवाड, अनिता अंकुशे, बाळासाहेब मुंडे, गणेश गवारे, गजानन कातळे, अ‍ॅड. अजय कलशेट्टी, अ‍ॅड. बालाजी चापोलीकर, भास्कर औताडे, नारायण गिरी, मनमोहन डागा, एस. सोनी, सय्यद बशीर, सुरेश गालफाडे, भागवत कांदे, नारायण गिरी आदींनी सहभाग नोंदविला होता. (प्रतिनिधी)जिल्ह्यातील एकाही कारखान्याने अद्याप एफआरपीप्रमाणे भाव जाहीर केला नाही. १४०० ते १५०० टन प्रमाणे पहिला हप्ता देण्यात येत आहे. हा भाव एफआरपीप्रमाणे ७०० रुपयांनी कमी आहे. जोपर्यंत एफआरपीप्रमाणे भाव दिला जात नाही, तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरू राहील, असे जिल्हाध्यक्ष संतोष नागरगोजे यावेळी म्हणाले. कारखानदारांना जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘हलगी नाद’ आंदोलन करीत आहे. आतापर्यंत दोन कारखान्यांवर आंदोलन झाले आहे. सर्वच कारखान्यांवर हे आंदोलन करून एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांच्या पदरात भाव पाडून घेऊ, असेही नागरगोजे यावेळी म्हणाले.