शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

मनपाकडून चक्क खंडपीठाची दिशाभूल!

By admin | Updated: May 19, 2015 00:54 IST

मुजीब देवणीकर , औरंगाबाद मागील दोन दशकांपासून सर्वसामान्य औरंगाबादकरांना पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे.

मुजीब देवणीकर , औरंगाबादमागील दोन दशकांपासून सर्वसामान्य औरंगाबादकरांना पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे. नागरिकांना त्यांच्या हक्काचे पार्किंग उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दखल घेतली. मनपा प्रशासनाने तेवढ्याच तत्परतेने शहरातील तब्बल ४७ इमारतींमधील पार्किंगच्या जागा रिकाम्या करण्यात येणार असल्याचे शपथपत्र दिले. १३ वर्षांनंतर मनपाला एकाही इमारतींमधील अतिक्रमण काढता आलेले नाही, हे विशेष.१७ आॅक्टोबर २००२ रोजी ‘लोकमत’ने ‘पार्किंगच्या जागा दाबणाऱ्यांबाबत मनपा थंड’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. शहरातील अनेक बिल्डरांनी मोठमोठ्या इमारती बांधल्या. मनपाकडून बांधकाम परवानगी मिळविताना पार्किंगची जागाही कागदावर दाखविण्यात येते. नंतर ती जागा विकून टाकण्यात येते. शहरातील असंख्य इमारतींच्या पार्किंग गायब झाल्याचे वृत्तात म्हटले होते. या वृत्ताची दखल तत्कालीन न्या. एस. बी. म्हसे, न्या. बी. एच. मार्लापल्ले यांनी घेतली. ‘लोकमत’च्या वृत्तावरून जनहित याचिका (क्र. ५००९-०२) दाखल करण्यात आली. महापालिकेला नोटिसा बजावण्यात आल्या. तत्कालीन आयुक्तांनी खंडपीठात शपथपत्र दाखल केले. शहरातील ४७ इमारतींमधील पार्किंग गायब असून, पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्यासाठी सहा वेगवेगळे गट स्थापन करण्यात आले आहेत.१खंडपीठात शपथपत्र दाखल केल्यानंतर मागील १३ वर्षांमध्ये ४७ इमारतींमधील पार्किंगच्या जागा मोकळ्या का करण्यात आल्या नाहीत, असा प्रश्न नगररचना सहसंचालक डी. पी. कुलकर्णी यांना विचारला असता ते म्हणाले की, एवढे जुने आठवत नाही. पार्किंगचा काही तरी विषय होता.२ नगररचना विभागाचे काम एवढेच आहे की, नागरिकांना बांधकाम परवानगी देणे. इमारत उभी राहिल्यानंतर तपासून कमप्लिशन (भोगवटा) सर्टिफिकेट देणे. इमारतीत बेकायदा गाळे बांधून पार्किंग गायब असेल तर प्रशासकीय विभागाने कारवाई करावी. आमच्याकडे इमारत निरीक्षक नाहीत.