शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

संतांचा प्रतिनिधी म्हणून आमदार विधानसभेत हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:04 IST

औरंगाबाद : आपल्याला संतांची मोठी परंपरा आहे. आजच्या काळातील समस्यांवरील उत्तरे संत वाङ्मयात सापडतील. त्याचे प्रतिबिंब राजकारणात उमटायचे असेल, ...

औरंगाबाद : आपल्याला संतांची मोठी परंपरा आहे. आजच्या काळातील समस्यांवरील उत्तरे संत वाङ्मयात सापडतील. त्याचे प्रतिबिंब राजकारणात उमटायचे असेल, तर संतांचा प्रतिनिधी आमदार म्हणून विधानसभेत पाठवा, असे आवाहन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सु. ग. चव्हाण यांनी केले.

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ‘आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर’, या विषयावर सायंकाळी प्र. ई. सोनकांबळे व्यासपीठावर परिसंवाद झाला. नांदेड येथील सु. ग. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात बीड येथील दीपा क्षीरसागर, जालना येथील राम रौनेकर, देगलूर येथील रवींद्र बेंबरे, नांदेड येथील संजय जगताप आणि लातूर येथील मोहिब कादरी यांनी आपापले विचार व्यक्त केले.

कुठल्याही धार्मिक प्रार्थना व इतर उपचारांपेक्षा तुटलेली मने जोडणे हीच ईश्वराची सर्वात श्रेष्ठ प्रार्थना आहे, असा संदेश प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दिला आहे, असे मत मोहिब कादरी यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी प्रेषितांच्या, संतांच्या आणि ख्रिश्चन धर्मातील प्रार्थनांचा उल्लेख केला.

महात्मा चक्रधर यांनी अहिंसेच्या तत्त्वा चा पुरस्कार केला. जीवाच्या कल्याणासाठी, पर्यावरणपूरक असे त्यांचे विचार होते. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही तत्त्वे सर्वज्ञांनी लोकांमध्ये रुजवली, असे प्रतिपादन संजय जगताप यांनी केले.

जगातली सर्वात पहिली लोकशाही यंत्रणा महात्मा बसवेश्वरांनी ‘अनुभव मंटपाच्या’ माध्यमातून प्रत्यक्षात आणली होती. संत तुकाराम, संत रामदास यांच्या अभंग-ओव्यांचा संदर्भ देत त्यांनी संतांनी शिकवलेली मूल्ये आजच्या लोकशाहीत कशी उपयोगात आणावीत, याविषयी रवींद्र बेंबरे यांनी आपले विचार मांडले. समाज मूल्याधिष्ठित झाला, की राजकारण आपोआप शुद्ध होते, असेही ते म्हणाले.

आज पक्षीय नेत्यांमध्ये बलात्कारी प्रवृत्ती वाढली आहे. समाज संतांच्या विचारापासून दूर गेला आणि राजकारणानेही आपसूकच सर्व चांगल्या गुणांना तिलांजली दिल्याचे चित्र दिसत आहे, असे मत दीपा क्षीरसागर यांनी व्यक्त केले. या सत्राचे सूत्रसंचालन कैलास इंगळे यांनी केले, तर आभार सुभाष बागल यांनी केले.

चौकट,

मनातील विकार दूर करा

कुठल्याही धर्मातल्या, कुठल्याही पंथातल्या संतांनी हेच सांगितले आहे, की मनातील विकार दूर झाल्याशिवाय सुधारणा होत नाही. आजही चांगले वर्तन असलेल्या व्यक्तीच्या मागे लोक उभे राहतात, असे राम रौनेकर म्हणाले.