शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

संतांचा प्रतिनिधी म्हणून आमदार विधानसभेत हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:04 IST

औरंगाबाद : आपल्याला संतांची मोठी परंपरा आहे. आजच्या काळातील समस्यांवरील उत्तरे संत वाङ्मयात सापडतील. त्याचे प्रतिबिंब राजकारणात उमटायचे असेल, ...

औरंगाबाद : आपल्याला संतांची मोठी परंपरा आहे. आजच्या काळातील समस्यांवरील उत्तरे संत वाङ्मयात सापडतील. त्याचे प्रतिबिंब राजकारणात उमटायचे असेल, तर संतांचा प्रतिनिधी आमदार म्हणून विधानसभेत पाठवा, असे आवाहन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सु. ग. चव्हाण यांनी केले.

४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ‘आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर संत साहित्य हेच उत्तर’, या विषयावर सायंकाळी प्र. ई. सोनकांबळे व्यासपीठावर परिसंवाद झाला. नांदेड येथील सु. ग. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिसंवादात बीड येथील दीपा क्षीरसागर, जालना येथील राम रौनेकर, देगलूर येथील रवींद्र बेंबरे, नांदेड येथील संजय जगताप आणि लातूर येथील मोहिब कादरी यांनी आपापले विचार व्यक्त केले.

कुठल्याही धार्मिक प्रार्थना व इतर उपचारांपेक्षा तुटलेली मने जोडणे हीच ईश्वराची सर्वात श्रेष्ठ प्रार्थना आहे, असा संदेश प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दिला आहे, असे मत मोहिब कादरी यांनी व्यक्त केले. यावेळी त्यांनी प्रेषितांच्या, संतांच्या आणि ख्रिश्चन धर्मातील प्रार्थनांचा उल्लेख केला.

महात्मा चक्रधर यांनी अहिंसेच्या तत्त्वा चा पुरस्कार केला. जीवाच्या कल्याणासाठी, पर्यावरणपूरक असे त्यांचे विचार होते. स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता ही तत्त्वे सर्वज्ञांनी लोकांमध्ये रुजवली, असे प्रतिपादन संजय जगताप यांनी केले.

जगातली सर्वात पहिली लोकशाही यंत्रणा महात्मा बसवेश्वरांनी ‘अनुभव मंटपाच्या’ माध्यमातून प्रत्यक्षात आणली होती. संत तुकाराम, संत रामदास यांच्या अभंग-ओव्यांचा संदर्भ देत त्यांनी संतांनी शिकवलेली मूल्ये आजच्या लोकशाहीत कशी उपयोगात आणावीत, याविषयी रवींद्र बेंबरे यांनी आपले विचार मांडले. समाज मूल्याधिष्ठित झाला, की राजकारण आपोआप शुद्ध होते, असेही ते म्हणाले.

आज पक्षीय नेत्यांमध्ये बलात्कारी प्रवृत्ती वाढली आहे. समाज संतांच्या विचारापासून दूर गेला आणि राजकारणानेही आपसूकच सर्व चांगल्या गुणांना तिलांजली दिल्याचे चित्र दिसत आहे, असे मत दीपा क्षीरसागर यांनी व्यक्त केले. या सत्राचे सूत्रसंचालन कैलास इंगळे यांनी केले, तर आभार सुभाष बागल यांनी केले.

चौकट,

मनातील विकार दूर करा

कुठल्याही धर्मातल्या, कुठल्याही पंथातल्या संतांनी हेच सांगितले आहे, की मनातील विकार दूर झाल्याशिवाय सुधारणा होत नाही. आजही चांगले वर्तन असलेल्या व्यक्तीच्या मागे लोक उभे राहतात, असे राम रौनेकर म्हणाले.