शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

मनपाकडून खंडपीठाची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 01:19 IST

महापालिकेत दैनिक वेतनावर काम करणाºया एका कर्मचाºयाने आपल्याला सेवेत कायम करण्यासंदर्भात खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात मनपा पॅनलवरील वकिलांनी प्रशासनाचे शपथपत्र न देता परस्पर न्यायालयाला संबंधित कर्मचाºयाला कायम करण्यासाठी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन देऊन टाकले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महापालिकेत दैनिक वेतनावर काम करणाºया एका कर्मचाºयाने आपल्याला सेवेत कायम करण्यासंदर्भात खंडपीठात याचिका दाखल केली होती. या प्रकरणात मनपा पॅनलवरील वकिलांनी प्रशासनाचे शपथपत्र न देता परस्पर न्यायालयाला संबंधित कर्मचाºयाला कायम करण्यासाठी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्याचे आश्वासन देऊन टाकले. त्यामुळे उद्या १८ डिसेंबर रोजी होणाºया सर्वसाधारण सभेसमोर या कर्मचाºयाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.महापालिकेत दैनिक वेतनावर २६८ कर्मचारी कार्यरत होते. त्यातील ४० पेक्षा अधिक कर्मचाºयांचा मागील १५ ते २० वर्षांमध्ये मृत्यू झाला आहे. १० आॅक्टोबर २००८ रोजी मनपा प्रशासनाने दैनिक वेतनावरील ४ आणि आरोग्य विभागातील ६ कर्मचाºयांना कायम करण्याचा प्रस्ताव (क्रमांक-३१०-३११) ठेवला.या ठरावाच्या विरोधात दैनिक वेतनावरील सर्व कर्मचाºयांनी ‘बंड’पुकारले. एकाला न्याय दुसºयांवर अन्याय का, असा संतप्त प्रश्न सर्व कर्मचाºयांनी तत्कालीन आयुक्त दिलीप बंड यांच्याकडे लेखी स्वरुपात उपस्थित केला. बंड यांनी त्वरित सर्वसाधारण सभेसमोर ठेवलेला प्रस्ताव मागे घेण्याचे आदेश दिले. नंतर आरोग्य विभागातील सहा कर्मचाºयांना जाहिरात देऊन मुलाखत पद्धतीचा अवलंब करून सेवेत कायम करण्यात आले. २६८ कर्मचाºयांबाबत मनपाने शासनाकडे अहवाल पाठवून दिला. २००९ मध्ये शासनाने या कर्मचाºयांना सेवेत कायम करता येणार नाही, असा स्पष्ट अभिप्राय दिला. उर्वरित चारपैकी एक कर्मचारी कृष्णा ठोकळ यांनी खंडपीठात धाव घेतली. प्रकरण सुनावणीस आले असता मनपाच्या वकिलांनी न्यायालयास आश्वासित केले की, संबंधित कर्मचाºयाला सेवेत कायम करण्यासाठी सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवण्यात येईल. मनपाच्या आश्वासनावरून न्यायालयानेही त्याच आशयाचे आदेश दिले.उद्या १८ डिसेंबर रोजी होणाºया सर्वसाधारण सभेसमोर कृष्णा ठोकळ यांच्याशी संबंधित शासन निर्णय, न्यायालयाचा निर्णय आदी बाबींचा सविस्तर प्रस्ताव मनपा प्रशासनाकडून ठेवण्यात आला आहे. यामध्ये ठोकळ यांची नियुक्ती दैनिक वेतनावर झालेली आहे.प्रकल्पग्रस्त म्हणून शासनाने ठरवून दिलेल्या विहित पद्धतीचा अवलंब झालेला नाही. औरंगाबाद खंडपीठाने यासंदर्भात सहा महिन्यांत सर्वसाधारण सभेने निर्णय घ्यावा, असा निर्वाळा दिल्याचे म्हटलेआहे.