शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

विधानसभेसाठी रासपचे मिशन-५०

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:24 IST

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑीय समाज पक्षाने मिशन-५० आखले आहे; पण हे मिशन पूर्ण करण्यासाठी आपण कमी पडता कामा नये, याची काळजी घ्या आणि ताकदीने कामाला लागा, असा सल्ला आज येथे राष्टÑीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिला.

ठळक मुद्देऔरंगाबादमध्ये पक्षाची राज्य परिषद : महादेव जानकरांकडून मात्र चिरफाड

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्टÑीय समाज पक्षाने मिशन-५० आखले आहे; पण हे मिशन पूर्ण करण्यासाठी आपण कमी पडता कामा नये, याची काळजी घ्या आणि ताकदीने कामाला लागा, असा सल्ला आज येथे राष्टÑीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिला.ते नक्षत्रवाडी येथील सद्गुरू शिवनंद लॉन्सवर आयोजित रासपच्या राज्यस्तरीय परिषदेत मार्गदर्शन करीत होते. राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते या परिषदेला आले होते; परंतु जानकर यांनी आपल्या पद्धतीने चिरफाड करीत वरिष्ठ पदाधिकाºयांचे कान टोचले. पक्षासाठी आपले योगदान काय, हे प्रत्येकाने तपासले पाहिजे, असे ते म्हणाले.महाराष्टÑात ३८ जिल्हे आहेत. आज या परिषदेला रासपचे किती जिल्हाध्यक्ष आले आहेत, किती महिला अध्यक्षा आलेल्या आहेत आणि किती युवक अध्यक्ष आलेले आहेत, असे सवाल उपस्थित करून जानकर यांनी त्यांना उभे राहावयास सांगितले आणि त्यांची संख्या मोजून घेतली. ते असमाधानकारक असल्याचा शेरा मारीत पक्षाचे मुख्य महासचिव बाळासाहेब दोडतले यांना मिशन-५० कसे पूर्ण करणार? असा सवाल केला.‘भाजपने आता पेजप्रमुखाची संकल्पना पुढे आणली आहे आणि आपल्या पक्षाला अद्याप जिल्हाध्यक्ष नसतील, तर ही बाब योग्य नसल्याचे मत त्यांनी मांडले.एस.एल. अक्कीसागर यांची रासपच्या राष्टÑीय अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.या परिषदेत दोडतले, डॉ. उज्ज्वला हाके, राजाभाऊ फड, श्रद्धा भातंब्रेकर, दादासाहेब केतकर, सुमित त्रिवेदी, अजित पाटील, गजानन चौगुले, दशरथ लोहबंदे, सुभाष राजपूत, अंकुश काळदाते, अशोक लांडे, पूजा नवनाथ शिंदे, प्रतिभा डोंगरे, सुरेश संबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाध्यक्ष सुरेश कटारे यांनी सूत्रसंचालन केले. नंतर जानकर यांनी पंगतीत बसून सर्वांबरोबर भोजन घेतले.जानकर प्रेक्षकांमध्येच बसून४संपूर्ण कार्यक्रम होईपर्यंत महादेव जानकर हे प्रेक्षकांमध्येच बसून होते. परिषदेचे उद्घाटनही त्यांनी पदाधिकाºयांच्या हस्ते होऊ दिले, पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागतही परिषेदचे अध्यक्ष एस.एल. अक्कीसागर हेच करीत होते. सर्व वक्त्यांची भाषणेही त्यांनी ऐकली; पण ती खाली प्रेक्षकांमध्ये बसूनच! ते विचारपीठावर गेले ते फक्त भाषण करण्यासाठी! खाली प्रेक्षकांमध्ये बसलेले असताना त्यांना भेटण्यासाठी जे कुणी येत होते, त्यांनाही ते इशाºयानेच कार्यक्रमाकडे लक्ष देण्याची सूचना करीत होते.