शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

हरवलेला मुलगा ७ वर्षांनंतर सापडला

By admin | Updated: July 17, 2017 00:59 IST

सिल्लोड : तालुक्यातील गेवराई सेमी येथून हरवलेला मुलगा ७ वर्षांनंतर पैठण तालुक्यातील सानपवाडीत सापडला

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : तालुक्यातील गेवराई सेमी येथून हरवलेला मुलगा ७ वर्षांनंतर पैठण तालुक्यातील सानपवाडीत सापडला. मुलाला बघताच आई वडिलांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. मुलाने त्यांना मिठी मारली.अनिल उर्फ बट्या प्रकाश साबळे (२०) हा डिसेंबर २०१० मध्ये गेवराई सेमी येथून हरवला होता. त्यावेळी तो थोडा गतिमंद होता. त्याने काही काळ पाचोड येथील एका हॉटेलवर काम केले. तेथे गायकवाड नावाचा एक शेतकरी आला. त्याने त्याला नाव, गाव विचारले पण त्याला त्याची ओळख सांगता येईना. फक्त गेवराई, फुलंब्री, माझे वडील महाराज आहे एवढेच शब्द फक्त अनिल बोलायचा. म्हणून गायकवाड यांनी त्याला आपल्या घरी (सानपवाडीत) नेले व मुलासारखे सांभाळले. त्याच्या नातेवाईकांचा त्यांनी खूप शोधही घेतला, पण कुणी सापडले नाही. ७ वर्षे तो गायकवाड कुटुंबात मुलासारखा राहत होता. यामुळे त्याला कधीच आई -वडिलांची आठवण आली नाही.पंढरपूरला चाललेल्या एका दिंडीमध्ये सानपवाडी येथील एका महाराजांची भेट गेवराई सेमी येथे संदीप घुगे यांच्यासोबत झाली. चर्चेअंती लक्षात आले की, आपल्या गावातील प्रकाश महाराज यांचा मुलगा हरवला आहे. त्यांनी लगेच सानपवाडीत मुलाच्या आई -वडिलांना पाठवले. तेथे सात वर्षापूर्वी हरवलेला अनिल सापडला. गायकवाड कुटुंबाने त्या मुलास आई -वडिलांच्या स्वाधीन केले. सात वर्षानंतर मुलगा सापडल्याने आई-वडिलांना गहीवरुन आले. शिवाय गावकऱ्यांनाही आनंद झाला. त्यांनी गायकवाड कुटुंबाचे आभार मानले.