शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

निम्मे बालमृत्यू अतिसाराने !

By admin | Updated: July 19, 2015 00:25 IST

संजय तिपाले , बीड जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण ३२ टक्के इतके असून यापैकी निम्मे मृत्यू केवळ अतिसार झाल्याने होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे.

संजय तिपाले , बीडजिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण ३२ टक्के इतके असून यापैकी निम्मे मृत्यू केवळ अतिसार झाल्याने होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून अडीच लाख बालकांना मोफत ‘ओआरएस’ (अतिसार प्रतिबंधक पावडर) देण्याची मोहीम उघडली आहे. सोबतच मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी मातांना आशा सेविकांमार्फत धडे दिले जाणार आहेत.२७ जुलै ते ८ आॅगस्ट या दरम्यान ‘अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ राबविला जात आहे. पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी आशा व आरोग्य कर्मचारी ‘डोअर टू डोअर’ जाणार आहेत. प्रत्येक बालकांना मोफत ओआरएस दिले जाणार आहे. ओआरएसचे द्रावण कसे तयार करायचे? याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. अतिसाराची लागण झालेल्या बालकांना झिंक गोळी देण्यात येणार आहे. सर्वेक्षणातून एकही बालक सुटू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी ‘हात धुवा’ मोहीम राबविणार आहेत. प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ते स्वच्छतेबाबत टिप्स देणार असून त्यांनाही यासंदर्भात सूचना दिल्याचे वडगावे म्हणाले.मातांना समूपदेशनसर्वेक्षणावेळी आशा स्वयंसेविका मातांचे समूपदेशन करणार आहेत. स्तनपानाचे महत्त्व, ६ महिन्यानंतर बाळाला द्यावयाच्या अन्नाबाबतही माहिती दिली जाणार आहे. खीर, पराठा, मुगदाळ, खीर हे पदार्थ लाभदायक असून स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचे आवाहन डॉ. वडगावे यांनी केले आहे.अशी घ्या काळजी!बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी सांगितले की, पावसाळ्यात बालकांमध्ये अतिसार होण्याची दाट शक्यता असते. गेल्या काही दिवसांत अतिसाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. उघड्यावरील अन्न मुलांना देणे टाळावे, शौचानंतर व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी उकळून प्यावे, असा सल्ला दिला.कोवळ्या जिवांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना सुरु आहेत. प्रशासनाने अतिसार नियंत्रणासाठी पंधरा दिवसांची मोहीम उघडली आहे. त्यापूर्वीच बालकांमध्ये अतिसाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. अतिसार, उलट्यांमुळे अनेक बालके त्रस्त असून दवाखान्यांमध्ये गर्दी वाढत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.