शहरं
Join us  
Trending Stories
1
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
2
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
3
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
4
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
5
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
6
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
7
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
8
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
9
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
10
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
11
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
12
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
13
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
14
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
15
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
16
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
17
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
18
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
19
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
20
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता

निम्मे बालमृत्यू अतिसाराने !

By admin | Updated: July 19, 2015 00:25 IST

संजय तिपाले , बीड जिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण ३२ टक्के इतके असून यापैकी निम्मे मृत्यू केवळ अतिसार झाल्याने होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे.

संजय तिपाले , बीडजिल्ह्यात बालमृत्यूचे प्रमाण ३२ टक्के इतके असून यापैकी निम्मे मृत्यू केवळ अतिसार झाल्याने होत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून अडीच लाख बालकांना मोफत ‘ओआरएस’ (अतिसार प्रतिबंधक पावडर) देण्याची मोहीम उघडली आहे. सोबतच मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी मातांना आशा सेविकांमार्फत धडे दिले जाणार आहेत.२७ जुलै ते ८ आॅगस्ट या दरम्यान ‘अतिसार नियंत्रण पंधरवाडा’ राबविला जात आहे. पाच वर्षापर्यंतच्या बालकांचे सर्वेक्षण करण्यासाठी आशा व आरोग्य कर्मचारी ‘डोअर टू डोअर’ जाणार आहेत. प्रत्येक बालकांना मोफत ओआरएस दिले जाणार आहे. ओआरएसचे द्रावण कसे तयार करायचे? याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. अतिसाराची लागण झालेल्या बालकांना झिंक गोळी देण्यात येणार आहे. सर्वेक्षणातून एकही बालक सुटू नये, अशा सूचना संबंधितांना दिल्या असल्याचे जिल्हा प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करणारे वैद्यकीय अधिकारी ‘हात धुवा’ मोहीम राबविणार आहेत. प्रत्येक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ते स्वच्छतेबाबत टिप्स देणार असून त्यांनाही यासंदर्भात सूचना दिल्याचे वडगावे म्हणाले.मातांना समूपदेशनसर्वेक्षणावेळी आशा स्वयंसेविका मातांचे समूपदेशन करणार आहेत. स्तनपानाचे महत्त्व, ६ महिन्यानंतर बाळाला द्यावयाच्या अन्नाबाबतही माहिती दिली जाणार आहे. खीर, पराठा, मुगदाळ, खीर हे पदार्थ लाभदायक असून स्वच्छतेबाबत काळजी घेण्याचे आवाहन डॉ. वडगावे यांनी केले आहे.अशी घ्या काळजी!बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जानवळे यांनी सांगितले की, पावसाळ्यात बालकांमध्ये अतिसार होण्याची दाट शक्यता असते. गेल्या काही दिवसांत अतिसाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. उघड्यावरील अन्न मुलांना देणे टाळावे, शौचानंतर व जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावे, परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी उकळून प्यावे, असा सल्ला दिला.कोवळ्या जिवांचे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना सुरु आहेत. प्रशासनाने अतिसार नियंत्रणासाठी पंधरा दिवसांची मोहीम उघडली आहे. त्यापूर्वीच बालकांमध्ये अतिसाराच्या तक्रारी वाढल्या आहेत. अतिसार, उलट्यांमुळे अनेक बालके त्रस्त असून दवाखान्यांमध्ये गर्दी वाढत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.