शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्र्यांना लागली ‘द्राक्षा’ची गोडी...!

By admin | Updated: January 31, 2017 00:26 IST

जालना : राजकारणातील ताणतणाव दूर ठेवत मूळचे शेतकरी असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रामनगर येथे त्यांच्या शेतात लावलेल्या द्राक्ष बागेत चक्क छोट्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली

जालना : निवडणुकीच्या धामधुमीत राजकारणातील ताणतणाव दूर ठेवत मूळचे शेतकरी असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी रामनगर येथे त्यांच्या शेतात लावलेल्या द्राक्ष बागेत चक्क छोट्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली आणि शेतीपासून आपण दूर गेलो नसल्याचा प्रत्यय या निमित्ताने सर्वांना आला. पशुसंवर्धन, मत्स व्यवसाय आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे तसे गाढेसावरगाव येथील शेतकरी. शालेय जिवनापासून जालन्यात आल्याने शेतीशी तसा संबंध कमीच झाला. पण रामनगर येथी साखर कारखाना परिसरात असलेल्या १५ एकर कोरडवाहू शेतजमिनीत त्यांनी गतवर्षी मार्च महिन्यात द्राक्ष बागेची लागवड केली. एवढ्यावरच न थांबता जालन्यात मुक्कामी असले की आवर्जून बागेची पाहणी ही ठरलेलीच. या बागेवर त्यांनी सुरुवातीपासूनच जातीने लक्ष ठेवले आहे. त्यामुळेच अगदी कमी कालावधीत त्यांची द्राक्ष बाग फुलली आहे. नियमितपणे बागेची पाहणी ते करीत असल्याने या बागेवर कुठला रोग पडला, की एखादी समस्या निर्माण झाली याबाबत ते नेहमीच सजग असतात. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची धामधूम सर्वत्र सुरू आहे. तिकीट मिळविण्याठी कार्यकर्त्यांसह इच्छुकांचा गराडा घराभोवती पडलेला सध्या दिसून येतो. यातून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी शेतीसारखी दुसरी योग्य जागा असू शकत नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. त्यातूनच सोमवारी त्यांनी साखर कारखाना गाठला आणि थेट शेतात जात ट्रक्टरद्वारे नांगरणीला सुरुवात केली. शेती आणि कृषी संस्कृतीची जपणूक त्यांनी केल्याचे यानिमित्ताने दिसून आले. (प्रतिनिधी)