शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

राज्यमंत्र्यांना लागली ‘द्राक्षा’ची गोडी...!

By admin | Updated: January 31, 2017 00:26 IST

जालना : राजकारणातील ताणतणाव दूर ठेवत मूळचे शेतकरी असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी रामनगर येथे त्यांच्या शेतात लावलेल्या द्राक्ष बागेत चक्क छोट्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली

जालना : निवडणुकीच्या धामधुमीत राजकारणातील ताणतणाव दूर ठेवत मूळचे शेतकरी असलेले राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सोमवारी रामनगर येथे त्यांच्या शेतात लावलेल्या द्राक्ष बागेत चक्क छोट्या ट्रॅक्टरद्वारे नांगरणी केली आणि शेतीपासून आपण दूर गेलो नसल्याचा प्रत्यय या निमित्ताने सर्वांना आला. पशुसंवर्धन, मत्स व्यवसाय आणि वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे तसे गाढेसावरगाव येथील शेतकरी. शालेय जिवनापासून जालन्यात आल्याने शेतीशी तसा संबंध कमीच झाला. पण रामनगर येथी साखर कारखाना परिसरात असलेल्या १५ एकर कोरडवाहू शेतजमिनीत त्यांनी गतवर्षी मार्च महिन्यात द्राक्ष बागेची लागवड केली. एवढ्यावरच न थांबता जालन्यात मुक्कामी असले की आवर्जून बागेची पाहणी ही ठरलेलीच. या बागेवर त्यांनी सुरुवातीपासूनच जातीने लक्ष ठेवले आहे. त्यामुळेच अगदी कमी कालावधीत त्यांची द्राक्ष बाग फुलली आहे. नियमितपणे बागेची पाहणी ते करीत असल्याने या बागेवर कुठला रोग पडला, की एखादी समस्या निर्माण झाली याबाबत ते नेहमीच सजग असतात. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची धामधूम सर्वत्र सुरू आहे. तिकीट मिळविण्याठी कार्यकर्त्यांसह इच्छुकांचा गराडा घराभोवती पडलेला सध्या दिसून येतो. यातून निर्माण झालेला तणाव दूर करण्यासाठी शेतीसारखी दुसरी योग्य जागा असू शकत नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. त्यातूनच सोमवारी त्यांनी साखर कारखाना गाठला आणि थेट शेतात जात ट्रक्टरद्वारे नांगरणीला सुरुवात केली. शेती आणि कृषी संस्कृतीची जपणूक त्यांनी केल्याचे यानिमित्ताने दिसून आले. (प्रतिनिधी)