शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
6
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
7
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
8
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
9
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
10
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
11
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
12
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
13
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
14
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
15
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
16
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
17
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
18
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
19
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
20
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...

लाभार्थी संख्येअभावी उत्पन्न अत्यल्प

By admin | Updated: July 24, 2014 00:08 IST

बीड: महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतील लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना शासनाने प्राधिकृत केलेली विमा कंपनी पैसे देते.

बीड: महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतील लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना शासनाने प्राधिकृत केलेली विमा कंपनी पैसे देते. जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव असल्या कारणामुळे या योजनेचे लाभार्थी उपचारासाठी पसंती देत नसल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. शासनाने दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील (पांढरी शिधा पत्रिकाधारक वगळता) नागरिकांना अत्याधुनिक व सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु केली आहे. ही योजना एका राष्ट्रीय विमा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील सर्व व्यक्तींना घेता येणे शक्य आहे. यामध्ये जनरल सर्जरी, पेडियाट्रीक सर्जरी, न्युरो सर्जरी, बर्न यासह वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावर शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना जिल्हा रुग्णालयातील राजीव गांधी जीवनदायी योजना विभागाशी संपर्क साधून त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना एक कार्ड देण्यात येते. या कार्डवर एक कुटुंब एक वर्षात दीड लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया किंवा उपचार घेऊ शकतो. या योजनेचा अधिक प्रचार व प्रसार झाल्यामुळे दिवसागणिक लाभार्थी नोंदणीची प्रक्रिया वाढली आहे. लाभार्थ्यांना उपचार घेण्यासाठी त्यांची प्राथमिक तपासणी केली जाते. आजार गंभीर असल्यास किंवा रुग्णास शस्त्रक्रियेची गरज भासल्यास त्याला ज्या ठिकाणी इच्छा असेल त्या ठिकाणी तो रुग्ण उपचार घेऊ शकतो. काय झाली समस्याबीड जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवरच व्यवस्थित उपचार होत नसल्याने राजीव गांधी जीवनदायी योजनेचे लाभार्थी जिल्हा रुग्णालयात उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी येत नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे लाभार्थी जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत नसल्याने रुग्णालयास उत्पन्न मिळत नाही. केवळ तीन ते चार जणांनी उपचार घेतले आहेत. त्यांच्या विम्याचे बिल अद्याप जिल्हा रुग्णालयास मिळणे बाकी आहे. त्या तुलनेत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बऱ्यापैकी उपचार होत असल्याने अनेक रुग्ण तेथे उपचार घेण्यास पसंती देत आहेत. वर्षभराच्या कालावधीत वीस ते पंचवीस रुग्णांना उपचार घेतले असून त्यातून स्वारातीला चाळीस लाखांच्या जवळपास उत्पन्न मिळाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राजीव गांधी योजनेर्तंगत लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना अधिक रक्कम दिली जाते. मात्र जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे येथे उपचारासाठी येण्यास रुग्णांनी पाठ फिरवली आहे. (प्रतिनिधी)जिल्हा शल्यचिकित्सकांचेही दुर्लक्षजिल्हा रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याने शस्त्रक्रियेसाठी अनेकांनी फिरवली पाठराजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना मिळतो निधीबीड जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने इतर रुग्णालयांना पसंती