शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

लाभार्थी संख्येअभावी उत्पन्न अत्यल्प

By admin | Updated: July 24, 2014 00:08 IST

बीड: महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतील लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना शासनाने प्राधिकृत केलेली विमा कंपनी पैसे देते.

बीड: महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या राजीव गांधी जीवनदायी योजनेतील लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना शासनाने प्राधिकृत केलेली विमा कंपनी पैसे देते. जिल्हा रुग्णालयात अनेक सुविधांचा अभाव असल्या कारणामुळे या योजनेचे लाभार्थी उपचारासाठी पसंती देत नसल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. शासनाने दारिद्र्य रेषेखालील व दारिद्र्य रेषेवरील (पांढरी शिधा पत्रिकाधारक वगळता) नागरिकांना अत्याधुनिक व सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी योजना सुरु केली आहे. ही योजना एका राष्ट्रीय विमा कंपनीच्या संयुक्त विद्यमाने राबवली जात आहे. या योजनेचा लाभ एकाच कुटुंबातील सर्व व्यक्तींना घेता येणे शक्य आहे. यामध्ये जनरल सर्जरी, पेडियाट्रीक सर्जरी, न्युरो सर्जरी, बर्न यासह वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावर शस्त्रक्रिया करणे शक्य होत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना जिल्हा रुग्णालयातील राजीव गांधी जीवनदायी योजना विभागाशी संपर्क साधून त्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी झाल्यानंतर लाभार्थ्यांना एक कार्ड देण्यात येते. या कार्डवर एक कुटुंब एक वर्षात दीड लाखापर्यंतच्या शस्त्रक्रिया किंवा उपचार घेऊ शकतो. या योजनेचा अधिक प्रचार व प्रसार झाल्यामुळे दिवसागणिक लाभार्थी नोंदणीची प्रक्रिया वाढली आहे. लाभार्थ्यांना उपचार घेण्यासाठी त्यांची प्राथमिक तपासणी केली जाते. आजार गंभीर असल्यास किंवा रुग्णास शस्त्रक्रियेची गरज भासल्यास त्याला ज्या ठिकाणी इच्छा असेल त्या ठिकाणी तो रुग्ण उपचार घेऊ शकतो. काय झाली समस्याबीड जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांवरच व्यवस्थित उपचार होत नसल्याने राजीव गांधी जीवनदायी योजनेचे लाभार्थी जिल्हा रुग्णालयात उपचार किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी येत नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी जीवनदायी योजनेचे लाभार्थी जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत नसल्याने रुग्णालयास उत्पन्न मिळत नाही. केवळ तीन ते चार जणांनी उपचार घेतले आहेत. त्यांच्या विम्याचे बिल अद्याप जिल्हा रुग्णालयास मिळणे बाकी आहे. त्या तुलनेत अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात बऱ्यापैकी उपचार होत असल्याने अनेक रुग्ण तेथे उपचार घेण्यास पसंती देत आहेत. वर्षभराच्या कालावधीत वीस ते पंचवीस रुग्णांना उपचार घेतले असून त्यातून स्वारातीला चाळीस लाखांच्या जवळपास उत्पन्न मिळाले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राजीव गांधी योजनेर्तंगत लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना अधिक रक्कम दिली जाते. मात्र जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्यामुळे येथे उपचारासाठी येण्यास रुग्णांनी पाठ फिरवली आहे. (प्रतिनिधी)जिल्हा शल्यचिकित्सकांचेही दुर्लक्षजिल्हा रुग्णालयात योग्य उपचार होत नसल्याने शस्त्रक्रियेसाठी अनेकांनी फिरवली पाठराजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत लाभार्थ्यांवर उपचार करणाऱ्या दवाखान्यांना मिळतो निधीबीड जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याने इतर रुग्णालयांना पसंती