शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

‘एमआयएम’ तर सेटलमेंट पक्ष

By admin | Updated: April 16, 2015 01:02 IST

औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष नेहमीच सेटलमेंट करीत आला आहे.

औरंगाबाद : मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एमआयएम) पक्ष नेहमीच सेटलमेंट करीत आला आहे. औरंगाबादेत मुस्लिम बांधवांना ‘कलमा’ पढण्यास सांगणाऱ्या एमआयएमच्या नेत्यांनी अगोदर वांद्रे पोटनिवडणुकीत शिवसेनेसोबत केलेली छुपी युती जगासमोर मांडावी. असे खुले आवाहन समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आज औरंगाबादेत केले.समाजवादी पक्षाचे १२ उमेदवार औरंगाबाद मनपाच्या निवडणुकीत उभे करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रचारानिमित्त आझमी बुधवारी शहरात दाखल झाले. प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, एमआयएमचे दोन आमदार पालकमंत्री रामदास कदम यांच्या कक्षात जात होते. त्यांना रामदास कदमकडे जाऊ नका, असे काँग्रेस नेते आरेफ नसीम समजावून सांगत होते. त्यांचे न ऐकता दोन्ही आमदार त्यांच्याकडे कशासाठी गेले होते. वांद्रे पोटनिवडणुकीपूर्वी कदम आणि एमआयएमच्या आमदारांमध्ये कोणती सेटलमेंट झाली, याचे उत्तर दिले पाहिजे. एमआयएमचे काम न करणाऱ्या मुस्लिम बांधवांना थेट धर्माबाहेर काढण्याचा अधिकार कोणी दिला. एमआयएमचे नेते सच्चे मुसलमान असतील तर वांद्रे येथील गुपित जगासमोर मांडावे, असेही आझमी यांनी नमूद केले. समाजवादी पार्टीने वांद्रे पोटनिवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा दिला होता. एक चांगला नेता सभागृहात यावा हा त्यामागचा हेतू होता.राज्यातील सेना-भाजप युतीवर जोरदार हल्ला चढवत गोहत्याबंदीमुळे राज्यात असंख्य नागरिक बेरोजगार झाले. शेतकऱ्यांच्या वृद्ध जनावरांचा सांभाळ कोणी करावा. सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा छुपा अजेंडा चालवत असल्याचा आरोप त्यांनी केला. शहरांची नावे बदलल्याने विकास होत नाही. औरंगाबाद हे नाव चांगले आहे. औरंगजेब सेक्युलर होते. त्यांच्या नावाने शहर वसले आहे, त्यावर कोणाचा आक्षेप असायला नको. औरंगाबादेत मागील दहा वर्षांमध्ये हज हाऊसची स्थापना न झाल्याबद्दलही आझमी यांनी नाराजी दर्शविली. पत्रकार परिषदेला समाजवादी पक्षाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.