शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

एमआयएमला खिंडार?

By admin | Updated: May 13, 2016 00:11 IST

एमआयएमला खिंडार पाडण्याचा डाव रचण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आ. इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत १६ मे रोजी शहरात होणाऱ्या एका कार्यक्रमात एमआयएमला खिंडार पाडण्याचा डाव रचण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आ. इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. पक्षाने भाजपला सहकार्य करण्यासाठी मनपा स्थायी समितीच्या दोन सदस्यांचा राजीनामा घेतला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वांना समान संधी देण्यासाठी हा कायदेशीर निर्णय घेतला आहे. दीड वर्षांपूर्वी औरंगाबादच्या राजकारणात चंचू प्रवेश करून एक आमदार आणि २६ नगरसेवकांसह मनपाच्या विरोधी पक्षपदापर्यंत पोहोचलेल्या एमआयएम या पक्षाच्या नगरसेवकांना प्रत्येकी ३० लाख रुपयांची आॅफर राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप करून आ.जलील यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. पालिकेत एमआयएमचे सध्या २६ नगरसेवक आहेत. एमआयएममध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात गटबाजी वाढली आहे. आ.जलील यांच्या विरोधात एक गट सक्रिय झालेला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत खदखद वाढली आहे. त्याचा परिणाम पक्षातून बाहेर पडण्याचा विचारदेखील काहींच्या मनात घोळत असावा. (पान २ वर)पक्षात खदखद वाढतेयजलील यांच्या विरोधात एक गट सक्रिय आहे. त्या गटातील काही पदाधिकाऱ्यांची पक्षसंघटनेवरून मध्यंतरी उचलबांगडी करण्यात आली. जाहीरपणे जलील विरोधी गटाने त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यापर्यंत घोषणाबाजी केली. त्यानंतर एमआयएम नगरसेवक समर्थकांनी जलील यांच्या घरासमोर निदर्शने करून राग व्यक्त केला. कधी शिवसेना धार्जिणे तर कधी भाजप धार्जिणे निर्णय घेण्यात एमआयएम पुढाकार घेत असल्याचा आरोप मुस्लिम मतदारांमधून होतो आहे. खाम नदी अतिक्रमण मोहिमेत शहराध्यक्ष अन्वर कादरी यांनी लुडबूड केली. त्यांना तेथून नागरिकांनी पिटाळले. यावरून लक्षात येते की, एमआयएम कोणत्या दिशेने जात आहे. ते राजीनामे कायदेशीर...सदस्य शेख समिना, विकास एडके यांचे एमआयएमने राजीनामे घेतले. ते राजीनामे नाशिक, नांदेड, मुंबई मनपातील आजवर झालेल्या निर्णयावरून आणि मनपा अधिनियमाच्या मदतीने घेतले आहेत. पक्षाच्या सर्व नगरसेवकांना ५ वर्षांत स्थायी समितीत जाता यावे. यासाठी तो निर्णय घेतला आहे. त्यामुळे युतीला सहकार्य होईल, असा विषयच नाही. महापौर त्र्यंबक तुपे यांना सांगून सर्व काही केलेले असताना त्यांनी विधि विभागाचा सल्ला का मागविला हे कळण्यास मार्ग नाही. असे आ.जलील म्हणाले.