शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

एमआयएमला खिंडार?

By admin | Updated: May 13, 2016 00:11 IST

एमआयएमला खिंडार पाडण्याचा डाव रचण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आ. इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत १६ मे रोजी शहरात होणाऱ्या एका कार्यक्रमात एमआयएमला खिंडार पाडण्याचा डाव रचण्यात आल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आ. इम्तियाज जलील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. पक्षाने भाजपला सहकार्य करण्यासाठी मनपा स्थायी समितीच्या दोन सदस्यांचा राजीनामा घेतला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वांना समान संधी देण्यासाठी हा कायदेशीर निर्णय घेतला आहे. दीड वर्षांपूर्वी औरंगाबादच्या राजकारणात चंचू प्रवेश करून एक आमदार आणि २६ नगरसेवकांसह मनपाच्या विरोधी पक्षपदापर्यंत पोहोचलेल्या एमआयएम या पक्षाच्या नगरसेवकांना प्रत्येकी ३० लाख रुपयांची आॅफर राष्ट्रवादीकडून देण्यात आल्याचा गंभीर आरोप करून आ.जलील यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. पालिकेत एमआयएमचे सध्या २६ नगरसेवक आहेत. एमआयएममध्ये अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात गटबाजी वाढली आहे. आ.जलील यांच्या विरोधात एक गट सक्रिय झालेला आहे. त्यामुळे पक्षांतर्गत खदखद वाढली आहे. त्याचा परिणाम पक्षातून बाहेर पडण्याचा विचारदेखील काहींच्या मनात घोळत असावा. (पान २ वर)पक्षात खदखद वाढतेयजलील यांच्या विरोधात एक गट सक्रिय आहे. त्या गटातील काही पदाधिकाऱ्यांची पक्षसंघटनेवरून मध्यंतरी उचलबांगडी करण्यात आली. जाहीरपणे जलील विरोधी गटाने त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यापर्यंत घोषणाबाजी केली. त्यानंतर एमआयएम नगरसेवक समर्थकांनी जलील यांच्या घरासमोर निदर्शने करून राग व्यक्त केला. कधी शिवसेना धार्जिणे तर कधी भाजप धार्जिणे निर्णय घेण्यात एमआयएम पुढाकार घेत असल्याचा आरोप मुस्लिम मतदारांमधून होतो आहे. खाम नदी अतिक्रमण मोहिमेत शहराध्यक्ष अन्वर कादरी यांनी लुडबूड केली. त्यांना तेथून नागरिकांनी पिटाळले. यावरून लक्षात येते की, एमआयएम कोणत्या दिशेने जात आहे. ते राजीनामे कायदेशीर...सदस्य शेख समिना, विकास एडके यांचे एमआयएमने राजीनामे घेतले. ते राजीनामे नाशिक, नांदेड, मुंबई मनपातील आजवर झालेल्या निर्णयावरून आणि मनपा अधिनियमाच्या मदतीने घेतले आहेत. पक्षाच्या सर्व नगरसेवकांना ५ वर्षांत स्थायी समितीत जाता यावे. यासाठी तो निर्णय घेतला आहे. त्यामुळे युतीला सहकार्य होईल, असा विषयच नाही. महापौर त्र्यंबक तुपे यांना सांगून सर्व काही केलेले असताना त्यांनी विधि विभागाचा सल्ला का मागविला हे कळण्यास मार्ग नाही. असे आ.जलील म्हणाले.