शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
4
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
5
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
6
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
7
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
8
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
9
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
10
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
11
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
12
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
13
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
14
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
15
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
16
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
17
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
18
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
19
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
20
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?

एमआयएम - महापौरांत खडाजंगी

By admin | Updated: May 19, 2015 00:54 IST

औरंगाबाद : मनपातील विरोधी पक्षनेता नियुक्तीच्या मुद्यावरून सोमवारी एमआयएमचे नगरसेवक आणि महापौरांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

औरंगाबाद : मनपातील विरोधी पक्षनेता नियुक्तीच्या मुद्यावरून सोमवारी एमआयएमचे नगरसेवक आणि महापौरांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पालिकेत विरोधी बाकावर एमआयएमचेच सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्यामुळे कोणतीही सबब न सांगता विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी भूमिका एमआयएमच्या नगरसेवकांनी घेतली. तर महापौरांनी नगरविकास खात्याचे पत्र आल्याशिवाय निर्णय घेता येणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी काही जणांनी तुम्ही एमआयएमला विरोधी पक्षनेतेपद देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहात, असा आरोप महापौरांवर केला. त्यानंतर दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. एमआयएमच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी महापौर त्र्यंबक तुपे यांची भेट घेतली. शिष्टमंडळात नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता. विरोधी पक्ष नेत्याच्या नियुक्तीबाबत २० दिवस होऊनही महापौरांनी निर्णय न घेतल्यामुळे शिष्टमंडळातील काही सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसचे दहाच सदस्य आहेत, तर आमचे २६ नगरसेवक आहेत, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदावर एमआयएमचाच अधिकार आहे. तरीही शासन आणि आयोगाकडे पत्रव्यवहार करून वेळ वाया का घालविला जात आहे, असा सवाल शिष्टमंडळातील सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर महापौरांनी काँग्रेसनेही पत्र देऊन विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला असल्यामुळे हा उशीर होत असल्याचे सांगितले. राज्यात एमआयएम हा नोंदणीकृत पक्ष नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आम्हालाचशिष्टमंडळात एमआयएमचे जिल्हाध्यक्ष जावेद कुरैशी, नगरसेवक जमीर अहमद कादरी, गंगाधर ढगे, फेरोज खान, जहांगीर खान यांच्यासह पक्षाचे बहुतेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांचा समावेश होता. महापौरांपुढे बाजू मांडण्यासाठी पक्षाच्या वतीने एका वकिलांना सोबत आणण्यात आले होते. या वकिलांनीच सुरुवातीला महापौरांपुढे एमआयएमचे म्हणणे मांडले. ४नियमात सर्वात मोठ्या विरोधी गटाला विरोधी पक्षनेतेपद द्यावे, असे म्हटलेले आहे, त्यात पक्षाचा उल्लेख नाही, असे सांगितले. तसेच उल्हासनगर मनपात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हा हायकोर्टाने त्यावर स्पष्ट निर्णय दिलेला आहे. त्यातही मोठ्या गटालाच पद देण्याचे निर्देश देण्यात आले होते, याचा दाखलाही त्यांनी दिला. एमआयएमच्या शिष्टमंडळात नगरसेवक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता; परंतु त्यात एकही महिला नगरसेविका नव्हती. त्याऐवजी त्यांचे पतीराजच हिरीरीने सहभागी झाले होते. त्यामुळे शिष्टमंडळात नगरसेवक पतीराजांचा भरणा अधिक दिसत होता.