शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

शिष्यवृत्ती वाटपात लाखोंचा घोटाळा !

By admin | Updated: July 25, 2014 00:28 IST

सोमनाथ खताळ , बीड समाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते मात्र यामध्ये लाखो रूपयांचा घोटाळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सोमनाथ खताळ , बीडसमाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप केले जाते मात्र यामध्ये लाखो रूपयांचा घोटाळा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिष्यवृत्तीच्या वाटपात नियोजनाचा अभाव व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत संबंधित शाळांनी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनींच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून लाखो रूपयांचा निधी हडप केल्याची तक्रार मनविसेने केली आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत शिष्यवृत्ती पोहोचली की नाही, याचा पुरावा सुद्धा समाजकल्याणकडे उपलब्ध नसल्याने संशय व्यक्त होत आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुलींना समाजकल्याण विभागामार्फत सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे वाटप प्रत्येक वर्षी करण्यात येते. २००३-०४ मध्ये सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरू झाली. या शिष्यवृत्ती अंतर्गत अनुसूचित जाती व व्ही.जे.एन.टी. प्रवर्गातील पाचवी ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थिनींना दहा महिन्यासाठी प्रती महिना ६०० तर ८ ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना दहा महिन्यासाठी प्रती महिना १०० रूपयाची शिष्यवृत्ती दिली जाते. मात्र प्रत्यक्षात ही शिष्यवृत्ती या विद्यार्र्थिनींपर्यंत पोहचत नाही. मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्यांचे दस्तावेज समाजकल्याण कार्यालयात आणून जमा करतात, आणि आलेला लाखो रूपयांचा निधी स्वत:च्या खिशात घालत असल्याची तक्रार मनविसेचे शैलेश जाधव यांनी समाजकल्याणकडे दिलेला निवेदनात केली आहे.विशेष म्हणजे मागील तीन वर्षापासूनच्या निधीचा घोळही समाजकल्याण अधिकाऱ्यांना अद्याप निघालेला नाही. २०११-१२ चा निधी २०१०-११ ला, २०१२-१३ चा निधी २०११-१२ ला वाटप करण्याचा महाप्रताप येथील अधिकारी करीत असल्याचे समोर आले आहे. प्रत्येक वर्षातील आलेली शिष्यवृत्ती त्या- त्या वर्षात का वाटप केली जात नाही? मागच्या वर्षाचा निधी जातो कोठे? यासारख्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरे समाजकल्याणकडे उपलब्ध नाहीत. आम्हाला वेळ नाही तपासायलायासंदर्भात सहायक आयूक्त आर.एम. शिंदे म्हणाले एवढे तपासायला आम्हाला वेळ नाही. असे घोटाळे होत असतील मी नवीनच आहे, असे सांगून त्यांनी हात झटकले. आमच्याकडे शिष्यवृत्ती वाटपाची माहिती उपलब्ध नाही, असे सांगून त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केली़सेम टू सेम!२०११-१२ मधील काही शाळांच्या प्रस्तावाची यादी ‘लोकमत’च्या हाती लागली. यामध्ये अनेक विद्यार्र्थिनींच्या स्वाक्षऱ्या, पेन व अक्षर हे ‘सेम’ असल्याचे निदर्शनास आले. यावरून संस्थाचालक, मुख्याध्यापक, कर्मचारी यांनी मिलीभगत करून विद्यार्थिनींच्या शिष्यवृत्तीचा लाखो रूपयांचा निधी हडप केला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची स्वाक्षरी एकाच अक्षरात आणि सारखी असू शकत नाही, यामध्ये घोटाळा असून यामध्ये अधिकाऱ्यांचाही समावेश आहे असा आरोपही मनविसेचे शैलेश जाधव यांनी केला आहे.