शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

खंडोबा यात्रेत येणार लाखेंचा जनसमुदाय

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : प्रति जेजुरी असलेली सातारा खंडोबा यात्रा २७ नोव्हेंबरला असून, चंपाषष्टीला मराठवाड्यातील तांडा, वाडी, वस्त्यांसह खेड्यापाड्यातून लाखो भाविकांची गर्दी ओसंडते.

औरंगाबाद : प्रति जेजुरी असलेली सातारा खंडोबा यात्रा २७ नोव्हेंबरला असून, चंपाषष्टीला मराठवाड्यातील तांडा, वाडी, वस्त्यांसह खेड्यापाड्यातून लाखो भाविकांची गर्दी ओसंडते. परिसरातील मोकळी जागा यात्रेसाठी उपलब्ध करून देत सेवा- सुविधा पुरवाव्यात, असे साकडे सातारा- देवळाई नगर परिषदेचे प्रशासक तथा तहसीलदार विजय राऊत यांच्याकडे मंदिर ट्रस्टी व नागरिकांनी घातले आहे.अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्वार केला आहे. साताऱ्यासह शहराचे कुलदैवतही मानले जाते. पुरातन मंदिर असल्याने या मंदिराचा समावेश शासनाने तीर्थस्थळांत झाला असल्याने मंदिराचा कारभार आता पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत: देखरेख केली जाते. पुरातन मंदिराची रचना दीपमाळीची तुटफूट होत असून, त्याची डागडुजीही यात्रेअगोदर करावी, यासाठी ट्रस्ट व ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. खंडोबाच्या मूर्तीच्या डोळ्यावर तडे गेल्याने भाविक व ग्रामस्थांनी डोळे बदलण्याची सतत मागणी केल्यानंतर मंदिरातील दोन्ही मूर्तींचे डोळे ट्रस्टने यंदा बदलले असून, मंदिरावर सीसीटीव्हीची नजरही लावली आहे. त्यामुळे मंदिर सुरक्षित झाले आहे; परंतु मंदिराच्या विटांचे बांधकाम ठिसूळ झाले असून, त्यावर मुलामा चढविण्याची मागणी जोर धरीत आहे. यात्रेसाठी जागा उपलब्ध करामराठवाड्यातून भाविक दर्शनासाठी येतात, यात्रेसाठी मंदिराशेजारील सर्व जागेवर उंच उंच इमारती उभ्या राहिल्याने यात्रेकरूंना थांबण्यासाठी जागाच उपलब्ध राहिलेली नाही. खाजगी जागा नगर परिषदेने यात्रेसाठी उपलब्ध करून द्यावी. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पथदिवे, रस्ते दुरुस्ती, आरोग्यसेवा, पोलीस यंत्रणा इत्यादी विषयांवर नगर परिषद प्रशासक विजय राऊत यांना निवेदन देऊन ट्रस्ट अध्यक्ष गोविंद चोपडे, सचिव मोहन पवार, साहेबराव पळसकर, समाजसेवक सोमीनाथ शिराणे, आबा चव्हाण, डॉ. संजय साळवे, दिलीप दांडेकर, विजय धुमाळ, नंदकुमार दांडेकर, दिलीप धुमाळ, सुभाष पारखे, किशोर पारखे, किशोर सोनवणे आदींनी केली आहे. एमआयटी रस्ता दयनीयएमआयटी ते मंदिरापर्यंत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, तीन आठवड्यांवर यात्रा येऊन ठेपली आहे. भाविकांना आदळआपट करीत मंदिर गाठावे लागते. नगर परिषदेने याविषयी तात्काळ नियोजन करून रस्त्याची अवस्था सुधारावी, अशी मागणी एम.बी. पटेल यांनी केली आहे. वर्षभर मंदिरात दर्शनासाठी औरंगाबाद जिल्ह्यातूनच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यातून भाविकांची गर्दी होत असते. यात्रेनिमित्त पूर्वी महिनाभर आधीपासूनच गर्दी असायची; परंतु आता खेड्यापाड्यांतून बैलगाडीने येणाऱ्यांची संख्या रोडावली असून ट्रॅक्स, सुमो, कार, टेम्पो अशा वाहनांतून भाविक येथे येतात. येथे भाविकांना थांबण्यासाठी मोठी जागा शिल्लक नसल्याने मुक्काम न करता त्याच दिवशी ते परत निघून जातात. आता यात्रेत मनोरंजनात्मक कार्यक्रम होत नाहीत. धार्मिक कार्यक्रम आटोपून नाइलाजाने भाविक माघारी निघून जातात. त्यामुळे यात्रेत मिळणारा महसूलही बुडतो, अशी खंत ट्रस्टच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.प्रशासक तथा तहसीलदार विजय राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ग्रामपंचायत ज्या पद्धतीने यात्रेसाठी नियोजन करीत होती त्याच प्रकारे नगर परिषदसुद्धा सेवा-सुविधा पुरविणार आहे. नगर परिषदेची ही पहिलीच यात्रा असून, डागडुजी व नियोजनाच्या सूचनाही कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे सांगण्यात आले.