शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

सिंचन विभागाने लपविले कोट्यवधींचे दायित्व

By admin | Updated: August 18, 2014 00:38 IST

औरंगाबाद : सिंचन विभागाने २४ कोटी रुपयांचे दायित्व निर्माण केल्याचा गौप्यस्फोट मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी शनिवारी (दि.१६) स्थायी समितीच्या बैठकीत केला.

औरंगाबाद : सिंचन विभागाने २४ कोटी रुपयांचे दायित्व निर्माण केल्याचा गौप्यस्फोट मुख्य वित्त व लेखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी शनिवारी (दि.१६) स्थायी समितीच्या बैठकीत केला. वारंवार मागणी करूनही सिंचन विभागाने अद्यापही पूर्ण माहिती दिली नसल्याचे त्यांनी यावेळी सभागृहासमोर स्पष्ट केले. सिंचनाच्या काम वाटपावरून गेल्या काही दिवसांपासून सिंचन विभागातील अनियमितता समोर आली आहे. स्थायी समितीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत अनिलकुमार चोरडिया यांनी हा विषय उपस्थित करून सिंचन विभागाने गेल्या वर्षभरात मंजूर केलेली सर्वच कामे रद्द करण्याची मागणी केली. सिंचन विभागाच्या दायित्वाबद्दल त्यांनी विचारणा केल्यावर कॅफो चव्हाण म्हणाले, सिंचन विभागाने अनेक कामांची माहिती अर्थ विभागाला दिलेलीच नाही. प्रशासकीय मंजुरी देण्यापूर्वी प्रत्येक संचिका वित्त विभागाकडून मंजूर होऊन जाणे अपेक्षित असताना सिंचन विभागाने वित्त विभागाकडे संचिका न पाठविताच कामाला मंजुरी दिली. ही कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची बिले फक्त वित्त विभागाकडे सादर केली जातात व ती बिले वित्त विभागाला मंजूर करणे अपरिहार्य आहे. चव्हाण म्हणाले, न्यायप्रविष्ट असलेल्या ९ कोटींच्या कामांसह सिंचन विभागाचे दायित्व २४ कोटी रुपयांचे असून, अद्याप त्यांच्याकडे ५ कोटी ५० लाख रुपयांची कामे टेंडरसाठी पडून आहेत. असे असताना सिंचन विभागाने चालू वर्षाचे ८९ लाख रुपयांचे दायित्व दर्शवून खोटी माहिती पुरविली आहे. पाझर तलावात या वर्षासाठी ५ कोटींचे नियोजन होणे आवश्यक असताना ७ कोटी रुपयांचे झाले आहे. त्यामुळे आपण संचिकांना मान्यता देणे सध्या रोखले आहे. शारदा जारवाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला उपाध्यक्षा विजया निकम, सभापती रामनाथ चोरमले, शिक्षण सभापती बबन कुंडारे, दीपक राजपूत, अलका पळसकर, रामदास पालोदकर, सीईओ चौधरी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळुंके आदींची उपस्थिती होती.