शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

लॉकडाऊन काळात दाखल झालेल्या गुन्ह्यात लाखोंचा दंड वसुल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:05 IST

कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा वापर केला. मात्र तरीही नागरीक कोणत्या ना कोणत्या कारणाचा वापर करुन घराबाहेर ...

कोरोनाचा प्रसार आणि संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊनचा वापर केला. मात्र तरीही नागरीक कोणत्या ना कोणत्या कारणाचा वापर करुन घराबाहेर पडतच होते. यावर उपाय म्हणुन कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात विनापरवानगी घराबाहेर पडणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, ठरवुन दिलेल्या वेळेपेक्षा जास्तवेळ दुकान चालु ठेवणे, परवानगी नसतांना कार-दुचाकीने प्रवास करणे, मास्कचा वावर अशा आरोपावरून पोलीसांनी गुन्हे दाखल केले. अर्थात ठोठावला दंड आरोपींनी भरला देखील. काही तुरळक गुन्ह्यात गुन्हा कबुल न केलेल्यांवरील खटले मात्र सुरु आहेत.

कन्नड तालुक्यात शहर, ग्रामीण, पिशोर व देवगाव असे चार पोलीस ठाणे आहेत. त्यातील कन्नड शहर व ग्रामीण पोलीस ठाणे मिळून लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या आरोपाखाली २६१ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात विनापरवानगी घराबाहेर पडणे (९), जास्तवेळ दुकान सुरु ठेवणे (९), दुकान बंद ठेवणे बंधनकारक असतांना उघडणे (४४), विनापरवानगी कार-दुचाकीने प्रवास करणे (४६), जमावबंदी आदेशाचे उल्लंघन (४), विनामास्क फिरणे (१४९) यांचा समावेश आहे. त्यापैकी ४५३ आरोपींकडून ५ लाख ४३ हजार ४०० रूपये दंड वसुल करण्यात आला.

----------

गुन्हे मागे घेण्याची अशी असेल रचना

शासन स्तरावरुन पोलीस अधिक्षक व आयुक्त कार्यालयाकडे गुन्हयाच्या संदर्भाने माहिती विचारली जाते. ठरवून दिलेल्या नियमावलीत बसणाऱ्या गुन्हयांची माहिती संकलित केली जाते. शासनस्तरावर निर्णय होऊन न्याय विभागामार्फत खटले मागे घेण्याची प्रक्रिया राबविली जाईल असे कन्नड शहर पोलीस ठाण्याचे रामेश्वर रेंगे यांनी सांगीतले.

---------------

लॉकडाऊन काळातील गुन्ह्यांची माहिती - पिशोर पोलीस ठाणे

विना परवानगी घराबाहेर पडणे : निरंक

जास्त वेळ दुकान चालू ठेवणे : ६/६ : ४५००

विनापरवानगी कार / दुचाकी प्रवास = २/२ : २५००

जमावबंदी आदेशाचे उल्लंघन : २०/१२९ : १००० ( फक्त एका गुन्ह्यात शिक्षा 1/1000)

विना मास्क फिरणे : १०/१० : ७०००

दारू विकताना आणि बाळगताना मिळून आले : ४/४ =०

मास्क न लावता दुकानात मिळून आला : ३/३ : ६०००

तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना मिळून आला =५/५ : 1700 (४ गुन्ह्यात शिक्षा १७०० दंड )

आंबे विक्री करताना मिळून आला : 2/2 =०

उघड्यावर मांस विक्री करताना : ७/७ : ३७०० (५ गुण्यात शिक्षा ३७००)

विनापरवानगी गावाकडे आले : १/१ = ०

---------

पेढे विकताना मिळून आला = ६/६ : ४००० (४ गुन्ह्यात शिक्षा ४००० दंड )

टीप : ३४ गुन्ह्यात ३४ आरोपीना न्यायालयाने ३०,४०० दंड आकारला आहे. तर २२ गुन्हे न्यायालयात प्रलंबित आहेत.