शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

पाहणीसाठी लाखोंचा खर्च

By admin | Updated: December 17, 2014 00:38 IST

औरंगाबाद : केंद्रीय कृषी सचिव प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दोन पथकांनी सोमवारी जिल्ह्यातील तीन गावांना भेटी देऊन दुष्काळाची धावती पाहणी केली.

औरंगाबाद : केंद्रीय कृषी सचिव प्रवेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दोन पथकांनी सोमवारी जिल्ह्यातील तीन गावांना भेटी देऊन दुष्काळाची धावती पाहणी केली. या पथकांनी तिन्ही ठिकाणी तासाभरापेक्षा कमी वेळ घालविला असला तरी त्यांच्या दौऱ्यावर १० लाखांहून अधिक खर्च झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. अधिकारी-कर्मचाऱ्यांचा फौजफाटा, गाड्या आणि इतर सुविधांवर हा खर्च करण्यात आला. मात्र, वेगवेगळ्या खात्यांमार्फत हा खर्च करण्यात आल्याने त्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आलेली नव्हती. मराठवाड्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक रविवारी औरंगाबादेत दाखल झाले. यात दहा अधिकाऱ्यांचा समावेश होता. येथे आल्यानंतर त्यांची दोन पथकांत विभागणी झाली. दोन्ही पथकांनी सोमवारी सकाळीच पाहणी दौऱ्याला सुरुवात केली.एकेका पथकात २०-२० गाड्या होत्या. शिवाय त्यांच्यासोबत मंत्रालयातून आलेले आणि पुण्याहून आलेले सुमारे पंधरा वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक पातळीवरील सुमारे पन्नास अधिकारी, शंभर कर्मचारी होते. एका पथकाने सटाणा गावाला दहा मिनिटांची भेट देऊन जिल्हा सोडला, तर दुसऱ्या पथकाने पैठण तालुक्यातील लिंबगाव आणि मुरमा गावांमध्ये अर्धा-पाऊण तास वेळ घालवून बीड जिल्ह्यात प्रवेश केला. पथकाचा जिल्ह्यातील पाहणी दौरा तासाभरापेक्षा कमी काळाचा होता; पण या छोटेखानी दौऱ्यावर १० लाखांहून जास्त खर्च झाल्याचे सूत्रांनी सांगितले. पथकांच्या ताफ्यातील गाड्या, त्यांचे डिझेल, पथकातील अधिकारी आणि मुंबई, पुण्याहून आलेल्या अधिकाऱ्यांची बडदास्त, त्यांच्या राहण्या, जेवणाचा खर्च तसेच दोन-तीन दिवस आधीपासून दौऱ्याची तयारी करण्यात व्यस्त असणारे अधिकारी, कर्मचारी आदींवर हा खर्च झाला. पथकासाठी प्रशासनाने काही व्हीआयपी गाड्या भाड्यानेही घेतल्या होत्या. मात्र, हा खर्च विविध विभागांमार्फत करण्यात आला.