शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

केळी लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:31 IST

इसापूर धरणामध्ये फक्त १२ टक्के पाणीसाठा असल्याने यंदा केळी, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत़ अर्धापूरमध्ये १५०० तर मुदखेड तालुक्यात ३००० अशी जवळपास साडेचार हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे़ इसापूर धरणात पाणी नसल्याने यंदा केळीला पाणी मिळणार नसल्याने हजारो हेक्टरवरील केळी कापून काढण्याचा सपाटाच शेतकºयांनी लावला आहे़ केळी लागवडीपासून आजपर्यंत प्रतिहेक्टरी ६० ते ७० हजार खर्च झाला आहे़ त्यामुळे लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल होणार असून चारशे कोटी रूपयांची उलाढाल ठप्प होईल, असे चित्र आहे़

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : इसापूर धरणामध्ये फक्त १२ टक्के पाणीसाठा असल्याने यंदा केळी, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत़ अर्धापूरमध्ये १५०० तर मुदखेड तालुक्यात ३००० अशी जवळपास साडेचार हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे़ इसापूर धरणात पाणी नसल्याने यंदा केळीला पाणी मिळणार नसल्याने हजारो हेक्टरवरील केळी कापून काढण्याचा सपाटाच शेतकºयांनी लावला आहे़ केळी लागवडीपासून आजपर्यंत प्रतिहेक्टरी ६० ते ७० हजार खर्च झाला आहे़ त्यामुळे लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल होणार असून चारशे कोटी रूपयांची उलाढाल ठप्प होईल, असे चित्र आहे़इसापूर धरण क्षेत्र परिसरात पाऊस न झाल्याने यंदा पहिल्यांदाच १२ टक्के जलसाठा झाला आहे़ सदर धरणावर अवलंबून असणाºया नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकºयांवर संकट ओढावले आहे़ पाण्याअभावी केळी येऊ शकणार नाहीत, या भितीने शेकडो शेतकरी डोक्यापर्यंत वाढलेल्या केळी कापून काढत आहेत़यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला असल्याचा गवगवा शासनदरबारी असलेल्या नोंदीवरून केला जात आहे़ परंतु, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, हदगाव या तालुक्यांना वरदान ठरलेले इसापूर धरण यंदा कोरडेठाक आहे़ संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच इसापूर धरण १२ टक्के एवढे कमी भरले आहे़ त्यामुळे या धरणावर अवलंबून असणारी हजारो हेक्टरमधील केळी, ऊस, हळद आदी पीकं धोक्यात सापडली़ अर्धापूरसह मुदखेड तालुक्यातील शेतकºयांनी यंदा इसापूर धरणातून पाणीपाळ्या मिळणार नाहीत, हे लक्षात घेवून जून, जुलैमध्ये लागवड केलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी काढून टाकण्याचा सपाटा लावला आहे़ केळीचे हिरवेगार बन डोक्यापर्यंत ऊंच झालेल्या केळी कापतांना पोटच्या मुलांना मारल्यासारख्या वेदना होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत़ त्यातच बँकाकडून पीकविमा स्विकारला जात नसल्याने शेतकºयांना दुहेरी संकट ओढावले आहे़निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या उदासिन धोरणामुळे अडचणीत सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला आहे़ राज्यभरात अर्धापूर तालुक्यातील केळी प्रसिद्ध आहे़ येथून परराज्यातदेखील केळी पाठविली जाते़ जिल्ह्यात अर्धापूर, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते़ दरवर्षी अर्धापूर तालुक्यातील अडीच ते तीन हजार हेक्टरवर केळी लागवड केली जाते़ पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा बहुतांश शेतकºयांनी केळी लागवडीकडे पाठ फिरविली़ त्यातही हजारो शेतकºयांनी आठशे ते १२०० हेक्टरवर यंदा केळीची लागवड केली़दरम्यान, इसापूर धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला़ दरवर्षी येथून पाच ते सहा पाणीपाळ्या मिळतात़ मागील वर्षात चांगले उत्पादन झाल्याने यंदा केळी लागवड केलेल्या शेतकºयांनी लागवडीपासूनच खर्चावर जोर दिला होता़ यामध्ये टिश्यू कल्चरचे बेणे घेण्यापासून खताची मात्रा, ठिबक आदीवर हजारोंचा खर्च केला़ परिसरातील शेकडो शेतकरी केळी काढून टाकत असल्याने हा खर्च मातीत गेल्यात जमा आहे़