शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
4
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
5
सुनेवर अत्याचार, पतीचं बाहेर अफेअर; दीप्तीच्या भावाने 'कमला पसंद'च्या मालकाच्या कुटुंबावर केले आरोप!
6
बाजारात 'सुपर फास्ट' कमबॅक! बजाज-रिलायन्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी; फक्त २ स्टॉक्स घसरले
7
चीनची दादागिरी संपणार! EV आणि संरक्षण क्षेत्रासाठी आवश्यक 'रेअर अर्थ' खनिजांसाठी सरकारचा मोठा प्लॅन
8
घरासाठी कर्ज घेण्यास लोकांचा सरकारी बँकांवर जास्त भरोसा; ४० टक्के कर्ज ७५ लाखांपेक्षा अधिक
9
MCX च्या शेअरनं गाठला ₹१०,२५० चा उच्चांकी स्तर; ₹१२,५०० पर्यंत जाऊ शकतो भाव, काय म्हणाले एक्सपोर्ट
10
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
11
'टेस्ला मॉडेल Y' भारतात २० लाखांनी स्वस्त होणार? कंपनीचा मोठा दावा, किंमत नाही, मालकी खर्च कमी होणार...
12
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
13
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
14
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
15
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
16
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
17
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
18
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
19
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
20
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
Daily Top 2Weekly Top 5

केळी लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:31 IST

इसापूर धरणामध्ये फक्त १२ टक्के पाणीसाठा असल्याने यंदा केळी, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत़ अर्धापूरमध्ये १५०० तर मुदखेड तालुक्यात ३००० अशी जवळपास साडेचार हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे़ इसापूर धरणात पाणी नसल्याने यंदा केळीला पाणी मिळणार नसल्याने हजारो हेक्टरवरील केळी कापून काढण्याचा सपाटाच शेतकºयांनी लावला आहे़ केळी लागवडीपासून आजपर्यंत प्रतिहेक्टरी ६० ते ७० हजार खर्च झाला आहे़ त्यामुळे लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल होणार असून चारशे कोटी रूपयांची उलाढाल ठप्प होईल, असे चित्र आहे़

श्रीनिवास भोसले।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : इसापूर धरणामध्ये फक्त १२ टक्के पाणीसाठा असल्याने यंदा केळी, ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत़ अर्धापूरमध्ये १५०० तर मुदखेड तालुक्यात ३००० अशी जवळपास साडेचार हजार हेक्टरवर केळीची लागवड झाली आहे़ इसापूर धरणात पाणी नसल्याने यंदा केळीला पाणी मिळणार नसल्याने हजारो हेक्टरवरील केळी कापून काढण्याचा सपाटाच शेतकºयांनी लावला आहे़ केळी लागवडीपासून आजपर्यंत प्रतिहेक्टरी ६० ते ७० हजार खर्च झाला आहे़ त्यामुळे लागवडीवरील कोट्यवधींचा खर्च मातीमोल होणार असून चारशे कोटी रूपयांची उलाढाल ठप्प होईल, असे चित्र आहे़इसापूर धरण क्षेत्र परिसरात पाऊस न झाल्याने यंदा पहिल्यांदाच १२ टक्के जलसाठा झाला आहे़ सदर धरणावर अवलंबून असणाºया नांदेडसह हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकºयांवर संकट ओढावले आहे़ पाण्याअभावी केळी येऊ शकणार नाहीत, या भितीने शेकडो शेतकरी डोक्यापर्यंत वाढलेल्या केळी कापून काढत आहेत़यंदा सर्वत्र चांगला पाऊस झाला असल्याचा गवगवा शासनदरबारी असलेल्या नोंदीवरून केला जात आहे़ परंतु, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, अर्धापूर, मुदखेड, भोकर, उमरी, धर्माबाद, हदगाव या तालुक्यांना वरदान ठरलेले इसापूर धरण यंदा कोरडेठाक आहे़ संपूर्ण पावसाळ्यात पहिल्यांदाच इसापूर धरण १२ टक्के एवढे कमी भरले आहे़ त्यामुळे या धरणावर अवलंबून असणारी हजारो हेक्टरमधील केळी, ऊस, हळद आदी पीकं धोक्यात सापडली़ अर्धापूरसह मुदखेड तालुक्यातील शेतकºयांनी यंदा इसापूर धरणातून पाणीपाळ्या मिळणार नाहीत, हे लक्षात घेवून जून, जुलैमध्ये लागवड केलेल्या शेकडो हेक्टरवरील केळी काढून टाकण्याचा सपाटा लावला आहे़ केळीचे हिरवेगार बन डोक्यापर्यंत ऊंच झालेल्या केळी कापतांना पोटच्या मुलांना मारल्यासारख्या वेदना होत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करीत आहेत़ त्यातच बँकाकडून पीकविमा स्विकारला जात नसल्याने शेतकºयांना दुहेरी संकट ओढावले आहे़निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि शासनाच्या उदासिन धोरणामुळे अडचणीत सापडलेला बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला आहे़ राज्यभरात अर्धापूर तालुक्यातील केळी प्रसिद्ध आहे़ येथून परराज्यातदेखील केळी पाठविली जाते़ जिल्ह्यात अर्धापूर, मुदखेड तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जाते़ दरवर्षी अर्धापूर तालुक्यातील अडीच ते तीन हजार हेक्टरवर केळी लागवड केली जाते़ पावसाचे प्रमाण कमी असल्याने यंदा बहुतांश शेतकºयांनी केळी लागवडीकडे पाठ फिरविली़ त्यातही हजारो शेतकºयांनी आठशे ते १२०० हेक्टरवर यंदा केळीची लागवड केली़दरम्यान, इसापूर धरण क्षेत्रात कमी पाऊस झाला़ दरवर्षी येथून पाच ते सहा पाणीपाळ्या मिळतात़ मागील वर्षात चांगले उत्पादन झाल्याने यंदा केळी लागवड केलेल्या शेतकºयांनी लागवडीपासूनच खर्चावर जोर दिला होता़ यामध्ये टिश्यू कल्चरचे बेणे घेण्यापासून खताची मात्रा, ठिबक आदीवर हजारोंचा खर्च केला़ परिसरातील शेकडो शेतकरी केळी काढून टाकत असल्याने हा खर्च मातीत गेल्यात जमा आहे़