शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

तुळजापूरसाठी पाऊण कोटी; म्हणे परफॉर्मन्स पाहिला !

By admin | Updated: April 8, 2017 00:18 IST

उस्मानाबाद : भाजप-सेना युतीची सत्ता आहे. असे असतानाही नगरोत्थान योजनेअंतर्गत पालिकांना निधी मंजूर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताकेंद्र असणाऱ्या पालिकांना झुकते माप देण्यात आले

उस्मानाबाद : केंद्र तसेच राज्यातही भाजप-सेना युतीची सत्ता आहे. असे असतानाही नगरोत्थान योजनेअंतर्गत पालिकांना निधी मंजूर करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ताकेंद्र असणाऱ्या पालिकांना झुकते माप देण्यात आले आहे. तर भाजप-सेनेची सत्ता असणाऱ्या पालिकांची सात ते दहा लाखापर्यंत निधी देऊन बोळवण केली आहे. नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात पायाभूत व सामाजिक सुविधा निर्माण करणे व बळकटीकरणासाठी जिल्हा योजनेअंतर्गत महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा व मल:निसारण, नागरी स्वच्छता, सामाजिक पायाभूत सुविधा, नागरी दळणवळण साधनांचा विकास, पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा विकास, शालेय शिक्षणाशी निगडीत पायाभूत सुविधा इ. कामे करता येताता. या योजनेच्या माध्यमातून आठ पालिकांसाठी सुमारे २ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. केंद्रासोबतच राज्यातही भाजप-सेना सत्तेत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांची सत्ता असणाऱ्या सत्ताकेंद्रांना इतरांच्या तुलनेत झुकते माप मिळावे, अशी अशी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. परंतु, जिल्ह्यात याच्या उलट स्थिती दिसते. आठ पालिकांना मंजूर करण्यात आलेल्या रकमेवर नजर टाकली असता, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असणाऱ्या पालिकांना सढळ हाताने निधी मिळाला आहे. यामध्ये तुळजापूर पालिकेला तब्बल पाऊण कोटी रूपये मंजूर झाले आहेत. परंडा पालिकेलाही सुमारे अर्धा कोटीपेक्षा अधिक रक्कम मंजूर केली आहे. असे असतानाच दुसरीकडे आठ पालिकांपैकी सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या व सेना-भाजपाचे सत्ताकेंद्र असणाऱ्या उस्मानाबाद पालिकेला अवघे दहा लाख रूपये मंजूर केले आहेत. अशीच अवस्था उमरगा पालिकेची आहे. ज्या ठिकाणी भाजप काँग्रेसच्या सोबतीने सत्तेत आहे. या पालिकेला तर केवळ ७ लाख रूपये देऊन बोळवण केली आहे. राज्य आणि केंद्रात असूनही जिल्ह्यातील भाजप-सेनेची सत्ताकेंद्र असणाऱ्या संस्थांना झुकते माप मिळणार नसेल तर सत्तेचा उपयोग काय, असा सवाल आता कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांतून उपस्थित होत आहे.