शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

दूध बंद, पाण्याचा रतीब सुरू !

By admin | Updated: February 9, 2016 00:30 IST

टीम लोकमत , बीड खेडी अन् पाणीटंचाई हे काही नवे चित्र नाही; परंतु पाण्यासारखा पैसा ओतून पाच पाणी योजना राबविल्या तरी महिलांच्या डोक्यावरील हंडा काही हटला नाही.

टीम लोकमत , बीडखेडी अन् पाणीटंचाई हे काही नवे चित्र नाही; परंतु पाण्यासारखा पैसा ओतून पाच पाणी योजना राबविल्या तरी महिलांच्या डोक्यावरील हंडा काही हटला नाही... गावात जेवढ्या गल्ल्या, मोहल्ले... त्या सर्वांना स्वतंत्र हातपंप... त्यांची संख्या दोन डझनवर; पण ठणठणाट कायमच...! एकवेळ दुधाशिवाय निभावता येईल; परंतु पाणी मिळाले नाही तर जगायचे कसे, हा यक्षप्रश्न! त्यामुळे दूध बंद करून पाण्याचा रतीब लावण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे. ‘लोकमत’च्या ‘स्पॉट रिपोर्टिंग’ मध्ये मादळमोहीकरांनी समस्यांचा पाढाच वाचला.मादळमोही हे जि.प. गटाचे गाव उपबाजारपेठेमुळे तालुक्यात प्रसिद्ध आहे. गावात मोहिमातेचे पुरातन मंदिर आहे. कल्याण - विशाखापट्टणम महामार्ग गावातून गेल्याने उपबाजारपेठेने बाळसे धरले आहे. १३ हजार लोकसंख्येच्या या गावात फेब्रुवारीमध्येच पाणी टंचाईच्या झळा तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. गावातील सार्वजनिक विहिरी, हातपंप, विद्युतपंप यापैकी कशालाही पाणी नाही. पारंपरिक आडही आटले आहेत. पाण्याचे मुख्य स्रोत उसासे टाकत असल्यामुळे पाण्यासाठी रानोमाळ पायपीट करण्याशिवाय नागरिकांना पर्यायच उरला नाही. ज्याच्याकडे थोडेफार पाणी आहे, त्याने टंचाईच्या परिस्थितीचा फायदा घेत पाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. ५०० लिटर पाण्यासाठी १०० रुपये दर ठरलेला आहे. गावातील जवळपास १ हजार पशुधनालाही पाणी टंचाईच्या झळा जाणवत आहेत. रामजी भुजबळ, राजाभाऊ झिंगरे, किसन कातोळे, डॉ. शहाजी शेळके आदींनी ‘लोकमत’जवळ समस्या आणि अपेक्षा मांडल्या.पाण्याचे मोल काय असते याची प्रचिती गावात गेल्यावरच कळते. ज्याला त्याला पाण्याचीच चिंता. कुणी बैलगाडीतून, कुणी वाहनातून, तर काही जण दुचाकीवरून पाणी वाहताना दिसतात. ‘साहेब, पाण्याचं विचारू नका. दुधाचा रतीब बंद केला अन् पाण्याचा लावला’, अशा शब्दांत काठी टेकवत आलेल्या वृद्धाने आपली वेदना व्यक्त केली. दिवस उगवला की, सारी कामे सोडून पाण्याची व्यवस्था करावी लागते, असे गणेश तळेकर म्हणाले.मुरली खंडागळे म्हणाले, आतापर्यंत अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले, दुष्काळही जवळून पाहिला; पण एवढी वाईट परिस्थिती कधी आली नव्हती. गयाबाई तळेकर म्हणाल्या, सारा वेळ पाण्याची तजवीज करताना घरातील कामे बाजूला पडतात.प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ६ उपकेंद्रे येतात. ३९ गावांचे कार्यक्षेत्र या आरोग्य केंद्रांतर्गत येते. केवळ एकच वैद्यकीय अधिकारी असून इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तसेच रूग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. येथील अधिकारी, कर्मचारी मुख्यालयी राहण्यास उदासीन आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या असून झाडेही वाळलेले आहेत. आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीसाठी २ कोटी रूपयाचा निधी मंजूर झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.टी.लांजेवार यांनी सांगितले.