शहरं
Join us  
Trending Stories
1
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
2
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
5
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
6
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
7
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
8
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
13
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
14
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
17
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
18
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
19
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
20
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध

दूधना प्रकल्पाचे पाणी टेलपर्यंत पोहोचलेच नाही

By admin | Updated: February 17, 2016 23:16 IST

परभणी : निम्न दूधना प्रकल्पातून दूधना नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेच नाही़

परभणी : निम्न दूधना प्रकल्पातून दूधना नदीपात्रात सोडण्यात आलेले पाणी नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलेच नाही़ नोंदविलेल्या मागणीपेक्षा २ दलघमी पाणी कमी सोडल्याने परभणी तालुक्यातील १२ गावे तहानलेलीच आहेत़ यामुळे या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम राहिला आहे़ सेलू तालुक्यातील निम्न दूधना प्रकल्पातून दूधना नदीत पाणी सोडण्याची मागणी आ़ विजय भांबळे यांनी केली होती़ तसेच आ़ डॉ़ राहुल पाटील यांनी ३ नोव्हेंबर २०१५, ३१ जानेवारी २०१६ रोजी विभागीय आयुक्त उमाकांत दांगट, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, मुख्यमंत्री देवेेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन दूधनाचे १० दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी केली होती़ यासंदर्भात मंत्रालय व विभागीय आयुक्तस्तरावर बैठकही झाली़ त्यानंतर ८ फेब्रुवारी रोजी दूधना नदीपात्रातून ७ दलघमी पाणी ९०० क्युसेसने चार दरवाज्यातून सोडण्यात आले़ हे पाणी नदीपात्र परिसरातील बहुतांश गावांपर्यंत पोहोचणार नाही म्हणून पुन्हा आ़ डॉ़ पाटील यांनी पाणी सोडण्याची मागणी केली़ त्यानुसार आणखी १ दलघमी पाणी नदीपात्रात सोडण्यात आले़ हे पाणी मोरेगाव, इरळद, झरीनंतर परभणी तालुक्यातमील सनपुरीपर्यंत पोहोचले़ त्यानंतर पुढे पाणी गेलेच नाही़ त्यामुळे परभणी तालुक्यातील करडगाव, हिंगला, धारणगाव, साटला, समसापूर, धार, मांगणगाव, मटकऱ्हाळा, दुर्डी, देवठाणा, पिंपळगाव टोंग, साबा या गावांपर्यंत पोहचलेच नाही़ त्यामुळे ही गावे अद्यापही तहानलेलीच आहेत़ नदीपात्रात १० दलघमी पाणी सोडले असते तर ते पाणी टेलपर्यंत पोहचले असते़ परंतु, पाणी सोडण्यातूनही राजकारण झाले आणि १० दलघमी पाणी सोडण्याऐवजी केवळ ८ दलघमी पाण्यावरच बोळवण करण्यात आली़ (जिल्हा प्रतिनिधी)