शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

स्थलांतराने वाडी-तांडे ओस

By admin | Updated: December 11, 2014 00:41 IST

संतोष धारासूरकर ,जालना शेतात काम नाही...गावात रोजगार नाही...मग ४-६ महिने काढावीत तरी कशी ? या विवंचनेने ग्रासलेले शेकडो शेतमजूर, अल्पभूधारक लेकराबाळांसह

संतोष धारासूरकर ,जालनाशेतात काम नाही...गावात रोजगार नाही...मग ४-६ महिने काढावीत तरी कशी ? या विवंचनेने ग्रासलेले शेकडो शेतमजूर, अल्पभूधारक लेकराबाळांसह गोराढोरांनिशी गाव-तांडे सोडून रोजगाराच्या शोधार्थ महानगरांकडे धावू लागले आहेत. या जिल्ह्यातून दरवर्षी शेतमजुरांचे शेकडो कुटुंबिय रोजगारानिमित्त महानगरांकडे स्थलांतरीत होतात. विशेषत: दिवाळीचा सण आटोपला की, या कुटुंबियांना स्थलांतराचे वेध लागतात. त्याप्रमाणे याही वर्षी नित्यनेमाप्रमाणे शेतमजुरांसह त्यांचे कुटुंबिय आॅक्टोबर अखेरपासून पुणे, नाशिक, मुंबईकडे रवाना झाले आहेत. त्यात यावर्षी विशेष हे की, शेतमजुरांबरोबर अल्प भूधारक सुद्धा कुटुंबियांसह स्थलांतरीत होत आहेत. गेल्या तीन वर्षांपासूनच्या दुष्काळाच्या झळा हेच त्यामागचे प्रमुख कारण आहे. या जिल्ह्यातील अंबड व घनसावंगी या दोन तालुक्यातून दरवर्षी जवळपास ४ ते ५ हजार कुटुंबिय उसतोडीसाठी पश्चिम महाराष्ट्रात स्थलांतरीत होत असतात. याही वर्षी नित्यनेमाप्रमाणे हे कुटुंबिय लेकराबाळांसह ढोरांनिशी बैलगाड्या घेऊन बारामती, इंदापूर पासून थेट कर्नाटकातील भालकी, बिदर वगैरे भागात रवाना झाले आहेत. यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात आता या दोन्ही तालुक्यातील प्रत्येक वाड्यातांड्यांमधून किमान सरासरी ४० ते ५० कुटुंबे स्थलांतरीत झाले आहेत. म्हणजेच उसतोडीसाठी स्थलांतराचेही प्रमाण सुमारे २० टक्क्यांनी वाढले आहे. शेतमजुरांबरोबर अल्पभूधारक सुद्धा उसतोडणीस गेले आहेत. यावर्षी जिल्ह्यात अल्पसा पाऊस झाला. घनसावंगी व अंबड या दोन तालुक्यात सरासरीच्या तुलनेत निम्मा सुद्धा पाऊस झाला नाही. परिणामी खरिपातील सोयाबीन पुरेशा प्रमाणात शेतकऱ्याच्या पदरात पडले नाही. दोन वेचणीतच कापूस आटोपला. पावसाअभावी रब्बीच्या पेरण्या झाल्याच नाहीत. ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या, त्या-त्या भागात पिकेच जमिनीच्या वर आलेली नाहीत. परिणामी रब्बीतील गव्हासह ज्वारी, हरभरा वगैरे पिकांना पाणी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. मुळात जमिनीतील पाणी पातळी मोठी घट आहे. शंभर फुटापर्यंत विहिरींनी तळ गाठला आहे. असे हे दुष्काळी चित्र दिवसेंदिवस भीषण स्वरूप धारण करीत आहे. शेतांमधून काम नाही. गावात रोजगार नाही. कारण छोटछोटी का असेना, कामे, व्यवहार ठप्प आहेत. शेतात गेले तर पाच मिनिटे सुद्धा उभे रहावे वाटत नाही. घरी करमत नाही. या स्थितीत ४-६ महिने काढावीत तरी कसे ? लेकराबाळांसह गुरे-ढोरे जगवावीत तरी कशी? असा यक्षप्रश्न शेतमजुरांबरोबर अल्पभूधारकांसमोर पडला आहे. ४अंबड तालुक्यातील गोविंदपूर हे छोटेसे गाव. ४०० ते ५०० गावची लोकसंख्या. या गावातून गेल्या महिन्याअखेरपर्यंत ५० बैलगाड्यानिशी कुटुंब उसतोडीनिमित्त जिल्ह्याबाहेर रवाना झाले. मुलाबाळांसह गुरेढोरे व संसारोपयोगी साहित्यानिशी हे कुटुंबिय ४-६ महिन्यांसाठी बाहेरगावी गेले असून मे अखेर किंवा जूनमध्ये मान्सून बरसल्यानंतरच हे कुटुंबिय माघारी परततील, असे चित्र आहे.४अंबड व घनसावंगी या दोन तालुक्यात बहुतांशी वाडी, तांड्यांमधून प्रत्येकी ४० ते ५० कुटुंबे उसतोडीसह रोजगाराच्या शोधात महानगरांकडे रवाना झाले असून गोविंदपूर, दहेगाव खुर्द, कुक्कडगाव, सुखापूरी, ताडहदगाव, भालसखेडा, लालवाडी, पारनेर, शेवगा तसेच जामखेड, चिंचखेड, मसई, बोरी वगैरे गावांमधून आता या कुटुंबियातील केवळ वयोवृद्ध नागरिक घरदार सांभाळत आहेत.