शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा, देवळाई परिसर तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 23:48 IST

औरंगाबाद : दुष्काळात एकीकडे शासन जनतेला मोफत पाणी पाजते, तर दुसरीकडे टँकरचे पैसे भरूनही पाणीपुरवठा होत नाही, अशी ओरड देवळाईच्या नागरिकांतून होत आहे.

औरंगाबाद : दुष्काळात एकीकडे शासन जनतेला मोफत पाणी पाजते, तर दुसरीकडे टँकरचे पैसे भरूनही पाणीपुरवठा होत नाही, अशी ओरड देवळाईच्या नागरिकांतून होत आहे. पूर्वी या भागात मोफत पाणीपुरवठा टँकरच्या माध्यमातून केला जात असे; परंतु आता मनपात समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. देवळाई गावात पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नाही. गावातील नागरिक टॅक्स भरूनही त्यांना पाण्यासाठी वेगळेच पैसे मोजावे लागत आहेत. मनपाने मूळ गावाला तसेच म्हाडा कॉलनीत मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अनेकदा करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. सातारा-देवळाई परिसरात टँकरची संख्या रोडावली असून खाजगी टँकरचा धंदा मात्र तेजीत सुरू आहे. परिसरातील जलस्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ देवळाईवासीयांवर आलेली आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दुष्काळात मोफत पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता असतानाही पैसे घेऊन पाणीपुरवठा केला जात असल्याबाबत नागरिकांनी खंत व्यक्त केली. रोगराई पसरण्याची भीती...विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून, दूषित पाणी प्यायल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढली आहे. मनपाचे टँकर वेळेवर येत नसल्याने नाईलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नव्यानेच समाविष्ट झालेल्या परिसरातील मूलभूत समस्या मनपा अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने सोडवाव्यात, अशी मागणी बाबूराव जाधव यांनी केली आहे.