शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

म्हाडा, देवळाई परिसर तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2016 23:48 IST

औरंगाबाद : दुष्काळात एकीकडे शासन जनतेला मोफत पाणी पाजते, तर दुसरीकडे टँकरचे पैसे भरूनही पाणीपुरवठा होत नाही, अशी ओरड देवळाईच्या नागरिकांतून होत आहे.

औरंगाबाद : दुष्काळात एकीकडे शासन जनतेला मोफत पाणी पाजते, तर दुसरीकडे टँकरचे पैसे भरूनही पाणीपुरवठा होत नाही, अशी ओरड देवळाईच्या नागरिकांतून होत आहे. पूर्वी या भागात मोफत पाणीपुरवठा टँकरच्या माध्यमातून केला जात असे; परंतु आता मनपात समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई परिसराला पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. देवळाई गावात पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नाही. गावातील नागरिक टॅक्स भरूनही त्यांना पाण्यासाठी वेगळेच पैसे मोजावे लागत आहेत. मनपाने मूळ गावाला तसेच म्हाडा कॉलनीत मुबलक पाणीपुरवठा करावा, अशी मागणी अनेकदा करूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. सातारा-देवळाई परिसरात टँकरची संख्या रोडावली असून खाजगी टँकरचा धंदा मात्र तेजीत सुरू आहे. परिसरातील जलस्रोत आटल्याने पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीची वेळ देवळाईवासीयांवर आलेली आहे. अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन दुष्काळात मोफत पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता असतानाही पैसे घेऊन पाणीपुरवठा केला जात असल्याबाबत नागरिकांनी खंत व्यक्त केली. रोगराई पसरण्याची भीती...विहिरीच्या पाण्याने तळ गाठला असून, दूषित पाणी प्यायल्याने आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढली आहे. मनपाचे टँकर वेळेवर येत नसल्याने नाईलाजास्तव खाजगी टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. नव्यानेच समाविष्ट झालेल्या परिसरातील मूलभूत समस्या मनपा अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने सोडवाव्यात, अशी मागणी बाबूराव जाधव यांनी केली आहे.