शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एमजीएममधील तंत्रनिकेतनचा विद्यार्थी बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 23:59 IST

मुंबईला जातो’, असे सांगून गेलेला एमजीएम संस्थेतील तंत्रनिकेतनमध्ये शिकणारा सनेश्वर सुखदेव नरवणे (१७, रा. कल्याण, मुुंबई) हा विद्यार्थी मागील सहा दिवसांपासून बेपत्ता आहे. ११ जानेवारीपासून त्याचा संपर्क होत नसल्याने त्याच्या आईने औरंगाबादेत येऊन बुधवारी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.

औरंगाबाद : ‘मुंबईला जातो’, असे सांगून गेलेला एमजीएम संस्थेतील तंत्रनिकेतनमध्ये शिकणारा सनेश्वर सुखदेव नरवणे (१७, रा. कल्याण, मुुंबई) हा विद्यार्थी मागील सहा दिवसांपासून बेपत्ता आहे. ११ जानेवारीपासून त्याचा संपर्क होत नसल्याने त्याच्या आईने औरंगाबादेत येऊन बुधवारी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली.प्राप्त माहिती अशी की, सनेश्वर एमजीएममधील तंत्रनिकेतनच्या पहिल्या वर्षात शिकतो. काही विषयात तो अनुत्तीर्ण झाला. एमजीएममधील मुलांच्या वसतिगृहातील रूम नंबर २२२ मध्ये तो राहतो. ३ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता सनेश्वरने वसतिगृहाचे सुरक्षारक्षक गोविंद मुळे यांच्याकडे रजेचा अर्ज देऊन मुंबईतील घरी जातो, असे सांगून तो निघून गेला. ८ जानेवारी रोजी एक दिवस सनेश्वर महाविद्यालयात हजर होता. तो मुंबईला येत असल्याची कल्पना सनेश्वरने त्याच्या घरी दिली नव्हती. त्याची आई आणि बहीण त्यास सतत फोन लावत होते, मात्र तो फोन उचलत नव्हता. ११ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्याच्या आईने त्यास फोन लावला तेव्हा एका स्त्रीने फोन उचलला आणि राँग नंबर म्हणून फोन कट केला. त्यानंतर काही वेळाने त्यांनी पुन्हा त्या नंबरवर संपर्क साधला तेव्हा सनेश्वरने फोन उचलला आणि फोन चार्जिंगला लावलेला असल्याने तेथे काम करणाऱ्या मावशीने फोन उचलल्याचे त्यांना सांगितले. त्यावेळी व्हिडिओ कॉल कर, असे त्या सनेश्वरला म्हणाल्यानंतर त्याने फोन कट केला. तेव्हापासून त्याचा मोबाईल बंद आहे. संपर्क तुटल्याने त्याची आई बुधवारी सकाळी एमजीएम वसतिगृहात आली. त्यानंतर एमजीएमचे सुनील कदम यांच्यासह त्या सिडको ठाण्यात गेल्या आणि त्यांनी सनेश्वर हरवल्याची तक्रार नोंदविली.

टॅग्स :Missingबेपत्ता होणंcollegeमहाविद्यालय