शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

सर्वच धर्मग्रंथांतून एकतेचा संदेश

By admin | Updated: December 23, 2015 23:38 IST

जालना : भगवद् गीता असो अथवा कुराण, सर्वच धर्मग्रंथांमध्ये एकता व समानतेचा संदेश दिला आहे. प्रत्येक ग्रंथात एकमेकांचा सन्मान ठेवावा,

जालना : भगवद् गीता असो अथवा कुराण, सर्वच धर्मग्रंथांमध्ये एकता व समानतेचा संदेश दिला आहे. प्रत्येक ग्रंथात एकमेकांचा सन्मान ठेवावा, असे म्हटले असल्याचे मत गीता पठण स्पर्धेत विजेती ठरलेल्या मरयम सिद्दीकी हिने बुधवारी येथे मांडले. जालना येथे शेख माजेद मित्र मंडळाच्या वतीने शासकीय विश्रामगृहात मरयम व तिचे वडील आसेफ सिद्दिकी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मरयम हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विष्णू पाचफुले, महावीर ढक्का, शेख माजेद, शशिकांत घुगे, मिर्झा अन्वर बेग, इसा खान उपस्थित होते.मरयम म्हणाली, इस्कॉनच्या वतीने भगवद् गीता पठण स्पर्धा आयोजित केली होती. यात गीताचे उत्कृष्ट सादरीकरण व पठण केल्याने तिला यश मिळाले. जन्माने मुस्लिम असले तरी भगवद् गीता ग्रंथ मला आवडतो. यातील सर्वच श्लोकातून मानवी जीवन मूल्यांची शिकवण दिली आहे. सातवीत शिकणाऱ्या मरयमने भागवत गीतेतील ‘यदा यदा ही धर्मस्य...’ हा श्लोक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्लोक सादर करण्यासोबतच याचा अर्थही तिने सहज शब्दात विषद केला.