शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

सर्वच धर्मग्रंथांतून एकतेचा संदेश

By admin | Updated: December 23, 2015 23:38 IST

जालना : भगवद् गीता असो अथवा कुराण, सर्वच धर्मग्रंथांमध्ये एकता व समानतेचा संदेश दिला आहे. प्रत्येक ग्रंथात एकमेकांचा सन्मान ठेवावा,

जालना : भगवद् गीता असो अथवा कुराण, सर्वच धर्मग्रंथांमध्ये एकता व समानतेचा संदेश दिला आहे. प्रत्येक ग्रंथात एकमेकांचा सन्मान ठेवावा, असे म्हटले असल्याचे मत गीता पठण स्पर्धेत विजेती ठरलेल्या मरयम सिद्दीकी हिने बुधवारी येथे मांडले. जालना येथे शेख माजेद मित्र मंडळाच्या वतीने शासकीय विश्रामगृहात मरयम व तिचे वडील आसेफ सिद्दिकी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मरयम हिने आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी माजी आ. कैलास गोरंट्याल, माजी उपनगराध्यक्ष राजेश राऊत, विष्णू पाचफुले, महावीर ढक्का, शेख माजेद, शशिकांत घुगे, मिर्झा अन्वर बेग, इसा खान उपस्थित होते.मरयम म्हणाली, इस्कॉनच्या वतीने भगवद् गीता पठण स्पर्धा आयोजित केली होती. यात गीताचे उत्कृष्ट सादरीकरण व पठण केल्याने तिला यश मिळाले. जन्माने मुस्लिम असले तरी भगवद् गीता ग्रंथ मला आवडतो. यातील सर्वच श्लोकातून मानवी जीवन मूल्यांची शिकवण दिली आहे. सातवीत शिकणाऱ्या मरयमने भागवत गीतेतील ‘यदा यदा ही धर्मस्य...’ हा श्लोक सादर करून उपस्थितांची मने जिंकली. श्लोक सादर करण्यासोबतच याचा अर्थही तिने सहज शब्दात विषद केला.