शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पारा गेला ४१ अंशावर !

By admin | Updated: March 27, 2016 00:10 IST

जालना : यंदा मार्च महिन्यातच पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. शनिवारी जालन्याचा पारा तब्बल ४१ अंशांवर गेल्याने उष्णतेमुळे शहरवासियांचे हाल झाले.

जालना : यंदा मार्च महिन्यातच पाऱ्याने चाळिशी पार केली आहे. शनिवारी जालन्याचा पारा तब्बल ४१ अंशांवर गेल्याने उष्णतेमुळे शहरवासियांचे हाल झाले. दुपारनंतर सर्वच रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. काही रस्ते निर्मुनष्य झाल्याचे चित्र होते. एकूणच कडक उन्हामुळे जनजीवन काहीअंशी विस्कळीत होत आहे. शहरवासियांना मे हिटचा अनुभव येत आहे.दोन दिवसांपासून पारा ३८-३९ अंशांवर स्थिरावत होता. शनिवारी दुपारी १ ते ४ वाजे दरम्यान उन्हाचा पारा ४१ अंशांवर गेला होता. सकाळी १० वाजता ३२ अंशांवर असणारे तापमान दुपारी ४ वाजता ४१ अंशावर गेले होते. उष्णतेच्या तीव्रतेमुळे आबालवृद्धांचे हाल होत असून, काहींनी घराबाहेर पडणे टाळले. तालुकास्थानेही कडक उन्हामुळे चांगलीच तापली होती. यात प्रामुख्याने बदनापूर, भोकरदन, जाफराबादचे तापमान ३७ अंश होते. तर घनसावंगी, अंबड, परतूरचे तापमान ३८ अंश होते. मंठ्याचे तापमान वाढले असून, शनिवारी पारा ३९ अंशांवर गेला होता. शहरासोबतच ग्रामीण भागातही उन्हामुळे जनजीवन प्रभावित झाले होते. जिल्ह्यात यंदा पडलेल्या अत्यल्प पावसामुळे जानेवारी महिन्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. मात्र अवकाळी पावसामुळे काही काळ दिलासा मिळाल्यानंतर उन्हाची तीव्रता पुन्हा एकदा वाढली आहे. तापमानात वाढ होत जाईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. गत वर्षी याच दिवशी तापमान ३८ अंश एवढे होते. यावर्षी यात तब्बल ३ अंशांनी वाढ होऊन ४१ पर्यंत केले. कडक उन्हाचा फटका भाजीपाला उत्पादनावर होत आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे जलसाठ्यांतही झपाट्यान घट झाली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३० पेक्षा अधिक प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. तापमान वाढत असल्याने ग्रामीण भागातील आठवडी बाजारावर परिणाम होत आहे.लग्नसराईचे दिवस असूनही कडक उन्हामुळे गर्दी रोडावत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे अर्थचक्रावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. कडक उन्हामुळे थंडपेयांची विक्रीत चांगली वाढ झाली आहे. शहाळे, टरबूज, द्राक्ष तसेच उसाच्या रसासह इतर शीतपेयांना मागणी वाढली आहे. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून बहुतांश नागरिक शीतपेयांना पसंती देत आहेत. उन्हामुळे रुग्णालयांत गर्दी वाढत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी टोप्या, रूमालांची मागणी वाढत आहे.