शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

पारा ४२ अंशांवर गेल्याने जालनेकर त्रस्त

By admin | Updated: April 29, 2015 00:52 IST

जालना : शहरात यंदाच्या तापमानाचा उच्चांक मंगळवारी नोंदला गेला. पारा ४२ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना कडक उन्हाचे चटके जाणवले.

जालना : शहरात यंदाच्या तापमानाचा उच्चांक मंगळवारी नोंदला गेला. पारा ४२ अंश सेल्सियसपर्यंत गेल्याने रस्त्यावर ये-जा करणाऱ्यांना कडक उन्हाचे चटके जाणवले. लग्नसराईत वऱ्हाडी मंडळींचे मात्र या उन्हामुळे मोठे हाल झाले.उन्हाळा सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता फारशी जाणवत नव्हती. एप्रिल महिन्याच्या १५ तारखेपर्यंत देखील पारा ३६ अंशापुढे सरकला नव्हता. अवकाळी पाऊस, गारपिट, सतत ढगाळ वातावरण यामुळे भर उन्हाळ्यातही पावसाळा असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. गेल्या १२ दिवसांपासून मात्र तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सियस दरम्यान नोंदले जात होते. मंगळवारी सकाळपासूनच कडक ऊन जाणवू लागले. दुपारी ३ वाजता उन्हाचा पारा ४२ अंशावर पोहोचला. उन्हामुळे अनेकांनी घरी विश्रांती घेणे पसंत केले. परंतु ज्यांना कामानिमित्त बाहेर ये-जा करणे टाळणे अशक्य होते, त्यांनी रूमाल, गॉगल्सचा वापर करून उन्हापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला.नवीन मोंढ्यात दुपारी १ ते ४ या दरम्यान, कामगारांनी विश्रांती घेणे पसंत केले. या काळात मालाची आवकही झाली नाही. गर्दीची ठिकाणे वगळता शहरात अन्य रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट होता. यंदा तापमानात प्रथमच वाढ झालेली दिसून आली. लग्नसराईमुळे शहरात बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. बाजारपेठेतही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून आली. (प्रतिनिधी)२८ एप्रिल ही लग्नसराईतील दाट तिथी असल्याने आज शहरातील जवळपास सर्व मंगल कार्यालयांमध्ये लग्नसराईची धूम होती. वाढत्या उन्हामुळे लग्नसराईतील अबालवृद्धांचे मोठे हाल झाले. मात्र नवरदेवासमवेत निघालेल्या मिरवणुकांमध्ये तरूणांचा उत्साह कायम असल्याचे दिसून आले. ४वऱ्हाडी मंडळी या मिरवणुकीमध्ये जेथे सावली असेल, अशा ठिकाणी जाऊन थांबणे पसंत करीत होते. वृद्ध मंडळींनी अशा मिरवणुकीपासून स्वत:ला दूर ठेवत मंगल कार्यालयात थांबणे पसंत केल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी रिकाम्या पाणी पाऊच पडल्याचे चित्रही दिसून आले.कडक उन्हामुळे आज शहरातील विविध थंडपेयांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी नेहमीपेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. लग्नसराईमुळे परगावाहून शहरात आलेल्या पाहुण्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे बसस्थानक, रेल्वेस्थानक या परिसरातही ग्राहकांची गर्दी दिसून आली. उन्हाच्या कडाक्यातून सुटका म्हणून सायंकाळी मोतीबागेतही गर्दी दिसून आली.