शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
5
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
6
Operation Sindoor Live Updates: भारताचा कोणताही शत्रू वाचू शकत नाही, अमित शाहांची पोस्ट
7
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
8
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
9
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
11
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
12
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
13
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
14
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
15
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
16
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
17
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
18
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
19
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
20
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?

पारा ४३ अंशांवर..

By admin | Updated: May 6, 2017 00:26 IST

जालना : शुक्रवारी तापमान ४३ अंश सेल्यिअस नोंदविले गेल्याने कडक ऊन व उकाड्यामुळे जालनेकरांची लाहीलाही झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता कायम आहे. शुक्रवारी तापमान ४३ अंश सेल्यिअस नोंदविले गेल्याने कडक ऊन व उकाड्यामुळे जालनेकरांची लाहीलाही झाली. जिल्ह्यात गत काही वर्षांपासून तापमानात कमालीची वाढ होत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दोन ते तीन अंशांनी तापमान वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. शुक्रवारी जिल्ह्याचे सरासरी तापमान ४३ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. वाढत्यामुळे उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अवकाळीमुळे उन्हाची तीव्रता कमी होईल, अशी शक्यता होती. मात्र उन्हाचा पारा वाढला आहे. उकाड्यात प्रचंड वाढ झाल्याने आबालवृद्धांचे हाल होत आहेत. तापमान ४३ अंश असले तरी याची तीव्रता ४६ अंशां सारखी भासत होती. दुपारी बारा वाजेपर्यंत चाळीस अंशांवर असलेले तापमान दुपारी तीन वाजता ४३ अंशांवर गेले. विविध संकेतस्थळांवर तापमान ४३ अंश दाखवित होते. अंबड, परतूर, मंठा ४२ तर भोकरदन, जाफराबाद व बदनापूर तालुक्यांत पार ४१ ते ४२ अंशांवर स्थिरावत होता. जिल्ह्याचे तापमान मात्र ४३ अंश दिसत होते. शुक्रवारी कडक उन्हामुळे शहरात दिवसभर सन्नाटा दिसून आला. लग्नतिथी असूनही दुपारनंतर बाजारपेठेतील गर्दी कमी झाली होती. उन्हाच्या तीव्रतेने जलसाठ्यांत झपाट्याने घट होत असल्याचे दिसून येते. कडक उन्हामुळे आठवडी बाजारातील गर्दी रोडावलेलीच आहे. उन्हामुळे लग्नसमारंभातील गर्दीवरही परिणाम झाल्याचे चित्र आहे. गतवर्षी याच दिवशी तापन ३९ ते ४० अंश होते. यंदा त्यात वाढ होऊन ते ४३ अंशांवर गेले आहे. शेतीमध्ये पीक नसले तरी फळबागा व भाजीपाल्यास वाढत्या तापमानाचा मोठा बसत आहे. अत्यल्प पाणी व उन्हाची तीव्रता यामुळे फळबागा वाळून जात असल्याचे शेतकरी सांगतात.