शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

उपकुल सचिवांकडून महिला कर्मचाऱ्याचा मानसिक छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:04 IST

औरंगाबाद : विद्यापीठात महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेपेक्षा जास्तवेळ बसवून ठेवणे, गरज नसताना सुटीच्या दिवशी कामावर बोलावून मानसिक छळ केल्याच्या ...

औरंगाबाद : विद्यापीठात महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेपेक्षा जास्तवेळ बसवून ठेवणे, गरज नसताना सुटीच्या दिवशी कामावर बोलावून मानसिक छळ केल्याच्या उपकुल सचिवांविरुद्धच्या लेखी तक्रारी दोन महिला कर्मचाऱ्यांनी कुलगुरुंकडे केल्या. दरम्यान, या प्रकरणातील एक महिला कर्मचारी ही बनावट असल्याचे निष्पन्न झाले असून, दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या तक्रारीची सत्यता पडताळून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश कुलगुरुंनी कुलसचिवांना दिले आहेत.

यासंदर्भात कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी यांनी सांगितले की, अलिकडे विद्यापीठात कायम सेवेत असलेल्या एका डाटाएण्ट्री ऑपरेटर महिलेची तक्रार कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे प्राप्त झाली असून, त्यात उपकुलसचिव इश्वर मंझा यांनी आपला मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे. त्यानंतर दुसऱ्या महिला कर्मचाऱ्याचीदेखील कुलगुरु डॉ. येवले यांच्याकडे अशाच प्रकारची तक्रार प्राप्त झाली. तथापि, विद्यापीठ प्रशासनाला तक्रारदार दुसरी महिला कर्मचारी ही विद्यापीठाच्या कोणत्याही अस्थापनेवर अथवा बाह्यस्रोत कर्मचारीदेखील नसल्याचे आढळून आले. त्यामुळे तूर्तास डाटाएण्ट्री ऑपरेटर महिलेच्या तक्रारीवरून विद्यापीठ प्रशासनाने उपकुलसचिव मंझा यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, तीन दिवसांत खुलासा मागितला आहे.

दरम्यान, दिवसभरातील या घडामोडींमुळे विद्यापीठ वर्तुळात खळबळ उडाली असून, ती महिला कोण असेल, हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती. दोनपैकी एक महिला विद्यापीठात कर्मचारी नसताना थेट कुलगुरुंकडे तक्रार दाखल करण्याचे धाडस करते कशी, या तर्कवितर्कांना उधाण आले होते.