शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

संचमान्यतेचा घोळ अखेर मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 00:56 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सध्या बदल्या आणि समायोजनाची लगबग आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेला सुधारित संचमान्यतेचा घोळ अखेर आज सोमवारी मिटला

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सध्या बदल्या आणि समायोजनाची लगबग आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेला सुधारित संचमान्यतेचा घोळ अखेर आज सोमवारी मिटला. संचमान्यतेचा तिढा सुटल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांचा मार्गही मोकळा झाला आहे. सुधारित संचमान्यतेनुसार जिल्हाभरात प्राथमिक सहशिक्षकांची संख्या मात्र, पुन्हा एकदा घटली आहे. परिणामी, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षकांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, आॅनलाईन संचमान्यतेनुसार मुख्याध्यापक, सहशिक्षक आणि पदवीधर शिक्षकांची तालुकानिहाय मंजूर पदे उद्या मंगळवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयास कळवली जातील. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी कार्यालय हे अतिरिक्त शिक्षकांचा ताळमेळ लावून समायोजनाची प्रक्रिया सुरू करतील. त्यानंतर लगेच पदोन्नत्यांची प्रक्रिया पूर्ण सुरू केली जाणार असून मग शिक्षकांच्या बदल्या होतील. अलीकडे दिवसेंदिवस शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही खाजगी इंग्रजी शाळांचे फॅड वाढत चालले आहे. त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांवर होत आहे. परिणामी जि.प. शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे त्या शाळांवरील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. मागील तीन-चार वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली असता शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदा शिक्षणाचा हक्क कायद्यातील तरतुदीनुसार आॅनलाईन संचमान्यता करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात मुख्याध्यापकांची ५९७, सहशिक्षकांची ६ हजार ६९७ आणि पदवीधर शिक्षकांची २ हजार १२९ पदे मंजूर झाली आहेत. तथापि, ३० सप्टेंबर रोजीच्या पटसंख्येनुसार शाळानिहाय कुठे शिक्षक अतिरिक्त तर कुठे कमीही ठरू शकतील. याचा ताळमेळ लावण्याची प्रक्रिया सध्या गटशिक्षणाधिकारी स्तरावर सुरू आहे. उद्या मंजूर पदांचा अहवाल गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना पाठविला जाईल.