शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

संचमान्यतेचा घोळ अखेर मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2016 00:56 IST

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सध्या बदल्या आणि समायोजनाची लगबग आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेला सुधारित संचमान्यतेचा घोळ अखेर आज सोमवारी मिटला

औरंगाबाद : जिल्हा परिषदेत सध्या बदल्या आणि समायोजनाची लगबग आहे. मागील पंधरा ते वीस दिवसांपासून सुरू असलेला सुधारित संचमान्यतेचा घोळ अखेर आज सोमवारी मिटला. संचमान्यतेचा तिढा सुटल्यामुळे शिक्षकांच्या बदल्यांचा मार्गही मोकळा झाला आहे. सुधारित संचमान्यतेनुसार जिल्हाभरात प्राथमिक सहशिक्षकांची संख्या मात्र, पुन्हा एकदा घटली आहे. परिणामी, मुख्याध्यापक आणि पदवीधर शिक्षकांच्या संख्येत वाढ झाली आहे. दरम्यान, आॅनलाईन संचमान्यतेनुसार मुख्याध्यापक, सहशिक्षक आणि पदवीधर शिक्षकांची तालुकानिहाय मंजूर पदे उद्या मंगळवारी गटशिक्षणाधिकारी कार्यालयास कळवली जातील. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी कार्यालय हे अतिरिक्त शिक्षकांचा ताळमेळ लावून समायोजनाची प्रक्रिया सुरू करतील. त्यानंतर लगेच पदोन्नत्यांची प्रक्रिया पूर्ण सुरू केली जाणार असून मग शिक्षकांच्या बदल्या होतील. अलीकडे दिवसेंदिवस शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही खाजगी इंग्रजी शाळांचे फॅड वाढत चालले आहे. त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांवर होत आहे. परिणामी जि.प. शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी झाल्यामुळे त्या शाळांवरील शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. मागील तीन-चार वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली असता शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. यंदा शिक्षणाचा हक्क कायद्यातील तरतुदीनुसार आॅनलाईन संचमान्यता करण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यात मुख्याध्यापकांची ५९७, सहशिक्षकांची ६ हजार ६९७ आणि पदवीधर शिक्षकांची २ हजार १२९ पदे मंजूर झाली आहेत. तथापि, ३० सप्टेंबर रोजीच्या पटसंख्येनुसार शाळानिहाय कुठे शिक्षक अतिरिक्त तर कुठे कमीही ठरू शकतील. याचा ताळमेळ लावण्याची प्रक्रिया सध्या गटशिक्षणाधिकारी स्तरावर सुरू आहे. उद्या मंजूर पदांचा अहवाल गटशिक्षणाधिकारी कार्यालयांना पाठविला जाईल.