शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

‘जनता विकास’च्या बैठकीत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2016 23:54 IST

औरंगाबाद : स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मंथन करण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने शनिवारी आयोजित बैठकीत प्रचंड गदारोळ झाला.

औरंगाबाद : स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मंथन करण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने शनिवारी आयोजित बैठकीत प्रचंड गदारोळ झाला. बैठकीत बहुसंख्य लोकांनी मराठवाडा वेगळे राज्य झाले पाहिजे, या बाजूने मते मांडली. तरीदेखील शेवटच्या निवेदनात परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीसाठी परिषद अनुकूल नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे काही जणांनी आयोजकांना धारेवर धरत जोरदार घोषणाबाजी केली. उपस्थितांची मते विचारात घ्यायचीच नव्हती तर बैठक बोलावलीच कशाला, असा जाबही त्यांनी विचारला.श्रीहरी अणे यांच्या वक्तव्यामुळे सध्या मराठवाड्यात स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीच्या मुद्यावर वेगवेगळी चर्चा सुरू झाली. त्यामुळे या विषयावर भूमिका ठरविण्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या शहर शाखेच्या वतीने शनिवारी बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अभ्यासक, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. परिषदेचे पदाधिकारी शरद अदवंत आणि सारंग टाकळकर यांच्या सूचनेनुसार एकेकाने आपली या विषयावरील मते मांडण्यास सुरुवात केली. सुरुवातीला बोलताना प्रा. विजय दिवाण यांनी वेगळ्या मराठवाड्याची मागणी करणे हा देशद्रोह असल्याची टीका केली. त्याप्रमाणे निशिकांत भालेराव यांनीही हीच बाजू मांडत संपूर्ण महाराष्ट्र एकसंध राहिला पाहिजे, अशी भूमिका मांडली. मराठवाडा जनता विकास परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी वेगळ्या मराठवाडा राज्याची भूमिका घेतल्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. जलतज्ज्ञ प्रा. प्रदीप पुरंदरे यांनी दिवाण यांचे मत खोडून काढीत वेगळ्या राज्याच्या मागणीला देशद्रोह म्हणणे चुकीचे असल्याचे सांगितले. वेगळ्या मराठवाडा राज्याच्या प्रश्नावर मी आज कोणतीही एक ठाम भूमिका घेऊ शकत नाही. सुभाष लोमटे म्हणाले, मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत आला आहे. जगदीश भावठाणकर, मिर्झा अब्दुल कय्युम, स्वातंत्र्यसैनिक तारा लड्डा, ओमप्रकाश वर्मा, अ‍ॅड. लक्ष्मण प्रधान, कैलास तवार, प्रवीण जाधव, प्रमोद माने, निवृत्ती दराडे, विलास तांगडे आदींनी मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी स्वतंत्र राज्य झालेच पाहिजे, अशी आग्रही भूमिका घेतली. बैठकीच्या शेवटी सारंग टाकळकर यांनी परिषदेच्या वतीने निवेदन वाचून दाखविले. त्यात त्यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्यनिर्मितीला परिषद अनुकूल नसल्याचे जाहीर केले. टाकळकर यांनी हे परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे मत असून, ते जनतेच्या मतांवर ठरत नाही, असे विधान केले. त्यामुळे वाद चिघळला. काहींनी परिषदेचे मत जे काय आहे ते असू द्या, पण बैठकीतील उपस्थितांची मतेही निवेदनात नोंदवा, अशी मागणी केली.