शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

पालकमंत्र्यांच्या वेळे अभावी आरोग्य सेवा समन्वय समितीची बैठक रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2017 17:23 IST

जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या व्यस्ततेमुळे या समितीची दीड वर्षात एक ही बैठक झाली नाही.

ऑनलाईन लोकमत

बीड/ माजलगांव :  शासनाने दीड वर्षापुर्वी साथीचे व संसर्गजन्य रोगांवर तात्त्काळ नियंत्रण मिळवण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती गठीत केली होती. परंतु; जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या व्यस्ततेमुळे या समितीची दीड वर्षात एक ही बैठक झाली नाही.  

दीड वर्षापुर्वी नागपुर जिल्ह्यामध्ये स्वाईन फ्लु चा प्रादुर्भाव झाल्यानंतर वैद्यकीय महाविद्यालये, महानगर पालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे शासनाला आढळून आले होते. त्यामुळे साथीच्या व  संसर्गजन्य रोगांवर आळा बसवण्यासाठी  जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती स्थापना करण्याचे आदेश शासनाने काढले होते. पावसाळ्यात साथीच्या रोगा सोबतच स्वाईन फ्ल्यू ने डोके वर काढल्याने या समितीची बैठक होणे अपेक्षित होते. परंतु; ग्राम विकास मंत्री व जिल्हाच्या पालकमंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांच्या वेळे अभावी समिती स्थापणे पासून एकही बैठक झालेली नाही. 
 
या समिती मार्फत जिल्ह्यात राज्याच्या व केंद्राच्या आरोग्य विषयक विविध योजना राबल्या जातात, वेगेवेगळ्या विभागात समन्वय घडवून आणणे, संबंधीत विभागाला निर्देश देणे, सार्वजनिक आरोग्य संस्थाचा आढावा घेणे व विविध उपाययोजना
सुचवणे अशी काही महत्वाची कामे या मार्फत होणे अपेक्षित आहे. 
 
तात्काळ बैठक व्हावी 
सध्या जिल्ह्यात साथीच्या रोगाने थैमान घातले असून या  समितीची बैठक न झाल्यामुळे यावर उपाययोजना करणे संबंधीत विभागाच्या अधिका-यांना अवघड चालले आहे. तात्काळ  बैठक घेऊन आरोग्य समस्या सोडवाव्यात.
- डॉ. उध्दव नाईकनवरे, सदस्य, जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती
 
बैठक घेण्याबाबत प्रयत्न सुरु 
समितीची  स्थापना झाल्यापासुन  बैठक घेण्यासाठी आम्ही दोन वेळा पालकमंत्र्यांना पत्र व्यवहार केला होता. मात्र, त्यांच्या वेळे अभावी बैठक होऊ शकली नाही. लवकरच त्यांची वेळ घेऊन बैठकीचे नियोजन करण्यात येईल.  
-नागेश चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक व सचिव,  जिल्हा आरोग्य सेवा समन्वय समिती