शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
2
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
3
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
4
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
5
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
6
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
7
उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा...
8
बिहारमध्ये NDAचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष लढवणार सर्वाधिक जागा
9
अतूट बंध! महागडे गिफ्टस नको तर 'या' ८ गोष्टींनी फुलवा नातं, आयुष्यभर राहा एकमेकांचे सोबती
10
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
11
नवरात्री २०२५: विनायक चतुर्थी कधी? व्रताचा संकल्प करा; गणपती पूजन ठरेल वरदान, कायम कृपा-लाभ!
12
USA Hanuman Statue: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
13
Navratri 2025: नवरात्रीत लावलेला अखंड दिवा घालवतो 'अकाल मृत्यू'ची भीती; मात्र... 
14
"आधी नवरा गेला, आता मुलगी..."; विद्यार्थिनीचा शाळेत संशयास्पद मृत्यू, आईने फोडला टाहो
15
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
16
आर अश्विन पुन्हा मैदानात दिसणार; निवृत्तीनंतर परदेशातील ४ संघाकडून खेळण्याची ऑफर!
17
चेक क्लिअरन्स आता एका दिवसातच! 'या' तारखेपासून नवा नियम लागू, जाणून घ्या कसा घ्यायचा फायदा
18
Rahul Gandhi : "भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती"
19
Katrina Kaif Pregnancy: गुडन्यूज! कतरिना कैफने शेअर केला बेबी बंप फोटो, ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
20
कलियुगातला कंस! सूनेसोबतच मामाचे प्रेमबंध जुळले, अडथळा ठरणाऱ्या भाच्याला संपवले

बैठक निष्फळ !

By admin | Updated: May 16, 2016 23:31 IST

बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये क्षीरसागरांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीची मोट बांधण्यासाठी आ. विनायक मेटे यांनी सोमवारी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली.

मेटे मेटाकुटीला : कृउबा निवडणुकीत चौरंगी लढतीची शक्यता बीड : येथील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये क्षीरसागरांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडीची मोट बांधण्यासाठी आ. विनायक मेटे यांनी सोमवारी बोलावलेली बैठक निष्फळ ठरली. बैठकीला विविध पक्षाच्या दुसऱ्या फळीतील पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. प्रमुख पदाधिकाऱ्यांअभावी एकमत झाले नाही. त्यामुळे चौरंगी लढतीची शक्यता वाढली आहे.कृउबावर गेली अनेक वर्षे वर्चस्व गाजविणाऱ्या आ. जयदत्त क्षीरसागर यांना शह देण्यासाठी आ. मेटे यांनी ताकद लावली आहे. त्यांनी क्षीरसागर विरोधकांना एकत्रित आणण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर बैठक घेतली. यावेळी माजी आ. जनार्दन तुपे, भाजपचे नवनाथ शिराळे, अ‍ॅड. सर्जेराव तांदळे, शिवसेनेचे सचिन मुळूक, रासपचे राहुल बनगर, रिपाइंचे राजू जोगदंड, माजी मंत्री सुरेश नवले गटाचे आसाराम आमटे यांनी उपस्थिती लावली. शिवसंग्रामचे राजेंद्र मस्के, दिलीप गोरे, प्रभाकर कोलंगडे, अनिल घुमरे, शिवाजी जाधव, सुभाष सपकाळ, सुहास पाटील, राहुल मस्के यांचीही उपस्थिती होती.या बैठकीत केवळ चर्चेचे गुऱ्हाळ रंगले. क्षीरसागरांच्या ताब्यातून कृउबा खेचण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे अशी अपेक्षा आ. मेटे यांनी व्यक्त केली. त्यासाठी हवे तर शिवसंग्रामला कमी जागा सोडा, अशीही तयारी त्यांनी दर्शवली. शिवाय, नेतृत्व कोणीही घ्या, परंतु क्षीरसागरांना झटका द्या, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, ठोस निर्णय झाला नाही.बैठकीनंतर आ. मेटे वगळता इतर पक्षाचे पदाधिकारी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडे गेले. मात्र, त्यांनीही आपला निर्णय अंधातरीच ठेवत १८ मे पर्यंत ‘वेट अँड वॉच’ अशी भूमिका घेतली. भाजपपेक्षा बीड तालुक्यात शिवसेना वरचढ आहे. त्यामुळे शिवसेनेला सोबत घेण्यासाठी मेटे यांची धडपड सुरू आहे. मात्र, सेना-भाजप एकत्रित लढल्यास तिरंगी अन्यथा स्वतंत्र लढल्यास चौरंगी लढतीची शक्यता व्यक्त केली जात आहे.अशीही शक्यता...पालकमंत्री पंकजा मुंडे व आ. विनायक मेटे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मेटे यांंच्याऐवजी भाजप छुपी युती करून राष्ट्रवादीच्या पाठीमागे ताकद लावू शकतो, अशी शक्यता देखील राजकीय वर्तूळातून व्यक्त होऊ लागली आहे. मेटेंच्या बैठकीला हजेरी लावणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी सबुरीचा सल्ला दिल्याचे सांगितले जाते. (प्रतिनिधी)