शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या परिषदेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:19 IST

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०३५ पर्यंत जगभरातून क्षयरोग हद्दपार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे

ल्ोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०३५ पर्यंत जगभरातून क्षयरोग हद्दपार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारतात क्षयरोगाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. देशात प्रत्येक मिनिटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. त्यामुळे २०२५ पर्यंत हे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न आहेत. नव्या औषधोपचारांनी त्यात निश्चित यश येईल, असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेचे कन्सल्टंट डॉ. संजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘महामायक्रोकॉन २०१७’ या भारतीय वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या तीनदिवसीय परिषदेचा रविवारी (दि.१५) समारोप झाला. परिषदेत आयोजित चर्चासत्रात डॉ. संजय सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी व्यासपीठावर इंडियन असोसिएशन आॅफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीचे अध्यक्ष डॉ. किशोर इंगोले, संयोजन अध्यक्ष डॉ. अजित दामले, संयोजन सचिव डॉ. ज्योती इरावणे (बजाज), डॉ. वीरेंद्र काशेट्टी, डॉ. छाया कुमार, डॉ. जयश्री भाकरे यांची उपस्थिती होती.डॉ. सूर्यवंशी यांनी देशातील क्षयरोगाच्या परिस्थितीविषयी मार्गदर्शन केले. प्रमाण कमी करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. डॉ. रंजनी रामचंद्रन यांनी सध्याच्या आणि भविष्यातील क्षयरोग निदानाच्या तंत्राबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. श्रीपाद टाकळीकर यांनी ‘आॅटोमेशन इन मायक्रोबायोलॉजी’ या विषयी मार्गदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत राज्यभरातील जवळपास २८० डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ़ अनिल गायकवाड, डॉ़ मंगला हरबडे, डॉ़ मुक्ता खापरखुंटीकर, डॉ़ लईक जाफरी, डॉ़ अर्जुन जाधव, डॉ़ अनुजा सामाले आदींनी परिश्रम घेतले.