शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या परिषदेचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 01:19 IST

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०३५ पर्यंत जगभरातून क्षयरोग हद्दपार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे

ल्ोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) २०३५ पर्यंत जगभरातून क्षयरोग हद्दपार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भारतात क्षयरोगाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. देशात प्रत्येक मिनिटाला एका व्यक्तीचा क्षयरोगाने मृत्यू होतो. त्यामुळे २०२५ पर्यंत हे प्रमाण कमी करण्याचे प्रयत्न आहेत. नव्या औषधोपचारांनी त्यात निश्चित यश येईल, असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेचे कन्सल्टंट डॉ. संजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे आयोजित ‘महामायक्रोकॉन २०१७’ या भारतीय वैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांच्या तीनदिवसीय परिषदेचा रविवारी (दि.१५) समारोप झाला. परिषदेत आयोजित चर्चासत्रात डॉ. संजय सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी व्यासपीठावर इंडियन असोसिएशन आॅफ मेडिकल मायक्रोबायोलॉजीचे अध्यक्ष डॉ. किशोर इंगोले, संयोजन अध्यक्ष डॉ. अजित दामले, संयोजन सचिव डॉ. ज्योती इरावणे (बजाज), डॉ. वीरेंद्र काशेट्टी, डॉ. छाया कुमार, डॉ. जयश्री भाकरे यांची उपस्थिती होती.डॉ. सूर्यवंशी यांनी देशातील क्षयरोगाच्या परिस्थितीविषयी मार्गदर्शन केले. प्रमाण कमी करण्यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले. डॉ. रंजनी रामचंद्रन यांनी सध्याच्या आणि भविष्यातील क्षयरोग निदानाच्या तंत्राबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. श्रीपाद टाकळीकर यांनी ‘आॅटोमेशन इन मायक्रोबायोलॉजी’ या विषयी मार्गदर्शन केले. तीन दिवस चाललेल्या या परिषदेत राज्यभरातील जवळपास २८० डॉक्टरांनी सहभाग नोंदविला. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ़ अनिल गायकवाड, डॉ़ मंगला हरबडे, डॉ़ मुक्ता खापरखुंटीकर, डॉ़ लईक जाफरी, डॉ़ अर्जुन जाधव, डॉ़ अनुजा सामाले आदींनी परिश्रम घेतले.