शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

राज्यातील २१ महापालिकांच्या महापौरांची निवड थेट जनतेतून होणार - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 06:44 IST

महाराष्ट्रातील क आणि ड वर्ग महापालिकांच्या महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा सरकार विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील क आणि ड वर्ग महापालिकांच्या महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा सरकार विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. राज्यात एकूण २५ महापालिका असून, त्यापैकी २१ महापालिका क आणि ड वर्गातील आहेत.सरपंचांच्या निवडणुका थेट जनतेतून करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने अलीकडेच घेतला. त्यानुसार, साडेसात हजार सरपंचांची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होणार आहे. त्या आधी राज्य सरकारने नगरपालिकांतील नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, राज्यातील बहुसंख्य नगराध्यक्ष थेट निवडून आले आहेत. त्यामुळे क आणि ड वर्ग महापालिकांचे महापौरही अप्रत्यक्षपणे न निवडता, त्यांचीही जनतेतून निवड व्हावी, या दृष्टीने राज्य सरकार विचार करीत आहे.देशभरातील महापौरांची परिषद औरंगाबादमध्ये पार पडली. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. त्या वेळी काही महापौरांनीच थेट निवडणुकीची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील काही शहरे अतिशय मोठी आहेत. तिथे महापौरांची थेट निवडणूक घेणे शक्य नाही. मात्र, क आणि ड वर्ग महापालिकांतील महापौरांची निवड जनतेने करण्याबाबत सरकार विचार करीत आहे.क आणि ड वर्गातील महापालिका- औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कूपवाड, अमरावती, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, अहमदनगर, अकोला, जळगाव, नांदेड-वाघाळा, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी आणि पनवेल या २१ महापालिका क व ड वर्ग आहेत.- मुंबई महापालिका अ+ तर नागपूर व पुणे महापालिका अ वर्ग आहेत. ठाणे, पिंपरी-चिंचवड व नाशिक या ब वर्ग महापालिका आहेत.लाल दिव्याची गाडी द्याया परिषदेमध्ये काही महापौरांनी आम्हाला लाल दिव्याच्या गाड्या द्याव्यात, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याला शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनीही पाठिंबा दिला. त्यांनी महापौरांना आर्थिक अधिकार मिळायला हवेत, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.निवडणुका इतक्यात नाहीतराज्यातील बहुसंख्य महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणितिथे नगरसेवकांमधून महापौरही निवडून गेले आहे. जेव्हा त्या महापालिकांच्या निवडणुका पुन्हा होतील, त्या वेळी महापौरथेट जनतेतून निवडण्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस