शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
3
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
4
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
5
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
6
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
7
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
8
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
9
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
10
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
11
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
12
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
13
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
14
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
15
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
16
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
17
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
18
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
19
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
20
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...

राज्यातील २१ महापालिकांच्या महापौरांची निवड थेट जनतेतून होणार - देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 06:44 IST

महाराष्ट्रातील क आणि ड वर्ग महापालिकांच्या महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा सरकार विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले.

औरंगाबाद : महाराष्ट्रातील क आणि ड वर्ग महापालिकांच्या महापौरांची निवड थेट जनतेतून करण्याचा सरकार विचार करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले. राज्यात एकूण २५ महापालिका असून, त्यापैकी २१ महापालिका क आणि ड वर्गातील आहेत.सरपंचांच्या निवडणुका थेट जनतेतून करण्याचा निर्णय फडणवीस सरकारने अलीकडेच घेतला. त्यानुसार, साडेसात हजार सरपंचांची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होणार आहे. त्या आधी राज्य सरकारने नगरपालिकांतील नगराध्यक्षांची निवडणूक थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, राज्यातील बहुसंख्य नगराध्यक्ष थेट निवडून आले आहेत. त्यामुळे क आणि ड वर्ग महापालिकांचे महापौरही अप्रत्यक्षपणे न निवडता, त्यांचीही जनतेतून निवड व्हावी, या दृष्टीने राज्य सरकार विचार करीत आहे.देशभरातील महापौरांची परिषद औरंगाबादमध्ये पार पडली. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी केले. त्या वेळी काही महापौरांनीच थेट निवडणुकीची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील काही शहरे अतिशय मोठी आहेत. तिथे महापौरांची थेट निवडणूक घेणे शक्य नाही. मात्र, क आणि ड वर्ग महापालिकांतील महापौरांची निवड जनतेने करण्याबाबत सरकार विचार करीत आहे.क आणि ड वर्गातील महापालिका- औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नवी मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, सांगली-मिरज-कूपवाड, अमरावती, मीरा-भार्इंदर, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, अहमदनगर, अकोला, जळगाव, नांदेड-वाघाळा, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी आणि पनवेल या २१ महापालिका क व ड वर्ग आहेत.- मुंबई महापालिका अ+ तर नागपूर व पुणे महापालिका अ वर्ग आहेत. ठाणे, पिंपरी-चिंचवड व नाशिक या ब वर्ग महापालिका आहेत.लाल दिव्याची गाडी द्याया परिषदेमध्ये काही महापौरांनी आम्हाला लाल दिव्याच्या गाड्या द्याव्यात, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली. त्याला शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे यांनीही पाठिंबा दिला. त्यांनी महापौरांना आर्थिक अधिकार मिळायला हवेत, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली.निवडणुका इतक्यात नाहीतराज्यातील बहुसंख्य महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या आहेत आणितिथे नगरसेवकांमधून महापौरही निवडून गेले आहे. जेव्हा त्या महापालिकांच्या निवडणुका पुन्हा होतील, त्या वेळी महापौरथेट जनतेतून निवडण्याबाबत सरकार निर्णय घेऊ शकेल.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस