शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
3
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
4
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
5
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
6
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
7
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
8
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
9
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
10
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
11
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
12
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
13
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
14
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
15
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
16
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
17
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
18
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
19
PF खातेधारकांसाठी मोठी बातमी! पेन्शन, पीएफ आणि ईपीएसच्या नियमांमध्ये मोठे बदल
20
सूरज चव्हाणचं प्री-वेडिंग फोटोशूट; होणाऱ्या पत्नीसोबत वेस्टर्न लूकमध्ये दिल्या रोमँटिक पोझ
Daily Top 2Weekly Top 5

...तर मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:13 IST

बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे ऐक्य होऊन मायावतींनी राष्टÑीय अध्यक्षपद स्वीकारावे, असे मला वाटते’ अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘समाज म्हणून सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन डावपेच आखले पाहिजेत व एक निर्णायक राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी या प्रक्रियेत यावे, त्यांचे नेतृत्व मानायला मी तयार आहे. किंबहुना बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे ऐक्य होऊन मायावतींनी राष्टÑीय अध्यक्षपद स्वीकारावे, असे मला वाटते’ अशी प्रतिक्रिया आज येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं ए चे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.ते दुपारी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ‘अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बाबासाहेबांचे नातू म्हणून आम्हाला आदरच आहे. माझ्या मंत्रिपदाबद्दल त्यांना आदर आहे की नाही माहीत नाही; पण बाळासाहेबांनी अकोला पॅटर्न राबवून बाबासाहेबांच्या स्वप्नातले राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे उद्गारही आठवले यांनी काढले.आम्ही रा.स्व. संघासोबत नाहीत. आम्ही भाजपबरोबर, नरेंद्र मोदींबरोबर आहोत. नरेंद्र मोदी संविधानाला धर्मग्रंथ मानतात. त्यामुळे संविधान बदलले जाण्याची आम्हाला सूतराम शक्यता वाटत नाही. त्या केवळ वावड्या आहेत, असे सांगत ताजमहालवरून सुरू झालेली चर्चा निरर्थक आहे. ताजमहाल ही एक सुंदर कलाकृती आहे. जगातले आश्चर्य आहे. त्यावरून वाद उपस्थित करणे चुकीचे असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी दलित योजनांचे पाचशे कोटी रुपये महाराष्टÑ शासनाने वळवल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत आठवले यांनी यासंबंधीचा कायदा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये मुस्लिम आणि दलित काँग्रेसच्या बाजूने नाहीत. पाटीदार समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याच्या आम्ही विरोधात आहोत. इतकेच नव्हे तर मराठा, जाट, ठाकूर, ब्राह्मण, राजपूत या मोठ्या जातींना ओबीसीत समाविष्ट करून घ्यायला आमचा विरोध आहे; पण आरक्षणाची मर्यादा आणखी २५ टक्के वाढवून त्यांना देण्यास आमची हरकत नाही.मनसेने कायदा हातात घेऊ नये. दादागिरी त्यांनाच करता येत नाही. मुंबईच्या फेरीवाल्यांनीही आपला संसार उद्ध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी पाहू नये. अन्यायाचा मुकाबला करावा, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, किशोर थोरात, संजय ठोकळ, सुनील मगरे,श्रावण गायकवाड, नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमोल, कमलेश चांदणे आदींची यावेळी उपस्थिती होती.