शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

...तर मायावतींनी राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:13 IST

बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे ऐक्य होऊन मायावतींनी राष्टÑीय अध्यक्षपद स्वीकारावे, असे मला वाटते’ अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी व्यक्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘समाज म्हणून सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन डावपेच आखले पाहिजेत व एक निर्णायक राजकीय शक्ती निर्माण केली पाहिजे. अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी या प्रक्रियेत यावे, त्यांचे नेतृत्व मानायला मी तयार आहे. किंबहुना बहुजन समाज पार्टी व रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया या पक्षांचे ऐक्य होऊन मायावतींनी राष्टÑीय अध्यक्षपद स्वीकारावे, असे मला वाटते’ अशी प्रतिक्रिया आज येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपाइं ए चे राष्टÑीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केली.ते दुपारी सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलत होते. ‘अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बाबासाहेबांचे नातू म्हणून आम्हाला आदरच आहे. माझ्या मंत्रिपदाबद्दल त्यांना आदर आहे की नाही माहीत नाही; पण बाळासाहेबांनी अकोला पॅटर्न राबवून बाबासाहेबांच्या स्वप्नातले राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे उद्गारही आठवले यांनी काढले.आम्ही रा.स्व. संघासोबत नाहीत. आम्ही भाजपबरोबर, नरेंद्र मोदींबरोबर आहोत. नरेंद्र मोदी संविधानाला धर्मग्रंथ मानतात. त्यामुळे संविधान बदलले जाण्याची आम्हाला सूतराम शक्यता वाटत नाही. त्या केवळ वावड्या आहेत, असे सांगत ताजमहालवरून सुरू झालेली चर्चा निरर्थक आहे. ताजमहाल ही एक सुंदर कलाकृती आहे. जगातले आश्चर्य आहे. त्यावरून वाद उपस्थित करणे चुकीचे असल्याचे मत आठवले यांनी व्यक्त केले.शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी दलित योजनांचे पाचशे कोटी रुपये महाराष्टÑ शासनाने वळवल्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करीत आठवले यांनी यासंबंधीचा कायदा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, गुजरातमध्ये मुस्लिम आणि दलित काँग्रेसच्या बाजूने नाहीत. पाटीदार समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्याच्या आम्ही विरोधात आहोत. इतकेच नव्हे तर मराठा, जाट, ठाकूर, ब्राह्मण, राजपूत या मोठ्या जातींना ओबीसीत समाविष्ट करून घ्यायला आमचा विरोध आहे; पण आरक्षणाची मर्यादा आणखी २५ टक्के वाढवून त्यांना देण्यास आमची हरकत नाही.मनसेने कायदा हातात घेऊ नये. दादागिरी त्यांनाच करता येत नाही. मुंबईच्या फेरीवाल्यांनीही आपला संसार उद्ध्वस्त होताना उघड्या डोळ्यांनी पाहू नये. अन्यायाचा मुकाबला करावा, असे आवाहन आठवले यांनी यावेळी केले.बाबूराव कदम, मिलिंद शेळके, दौलत खरात, अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण, किशोर थोरात, संजय ठोकळ, सुनील मगरे,श्रावण गायकवाड, नागराज गायकवाड, बाळकृष्ण इंगळे, अरविंद अवसरमोल, कमलेश चांदणे आदींची यावेळी उपस्थिती होती.