शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
2
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
3
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
4
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
5
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाल 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
6
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
7
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
8
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
9
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
10
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
11
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश
12
"मॅडम येत आहेत, त्यांना..."; पोलीस असल्याचं सांगून दुकानात घुसले अन् २ लाखांचे दागिने चोरले
13
ISI कडून मिळाले आदेश, बेताब खोऱ्यात लपवली शस्त्रे; NIA च्या अहवालात धक्कादायक खुलासा
14
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
15
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
16
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
17
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
18
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
19
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
20
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!

मातीमोल भाव; अखेर फुले कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मातीमोल भावातही खरेदी करायला कोणी तयार नसल्याने अखेर शेतकऱ्यांना ४ क्विंटलपेक्षा अधिक टवटवीत फुले कचऱ्याच्या गाडीत ...

औरंगाबाद : मातीमोल भावातही खरेदी करायला कोणी तयार नसल्याने अखेर शेतकऱ्यांना ४ क्विंटलपेक्षा अधिक टवटवीत फुले कचऱ्याच्या गाडीत टाकावी लागली.

सिटीचौकातील फूल बाजारात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर बंद, मंगल कार्यालये बंद, धार्मिक, सामाजिक, व राजकीय कार्यक्रम बंद असल्याने त्याचा परिणाम फूल विक्रीवर झाला आहे.

फुलांचे भाव पाहिले की, शेतकऱ्याच्या हाती किती पैसे मिळत असतील याचा अंदाज येतो. बिजली, गलांडा २ ते ५ रुपये किलो, १० ते १५ रुपये शेकडा गुलाब, काकडा ६० रुपये, झेला १०० रुपये किलो, मोगरा ८० रुपये किलो, निशिगंध ४० ते ६० रुपये किलोने विकला जात आहे. मोगऱ्याचे भाव कधीच एवढे कमी झाले नव्हते. बिजली व गलांडा मातीमोल भावातही कोणी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने बुधवारी सकाळी शेतकऱ्यांना ४ क्विंटलपेक्षा अधिक फुले कचरा गाडीत टाकावी लागली. यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. बबलू शेठ यांनी सांगितले की, बिजली व गलांडा शेतीतून काढणेसुद्धा परवडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फूल उत्पादक विलास तांबे यांनी सांगितले की, कोरोनामुळे मागील वर्षभरापासून फुलांची शेती तोट्यात चालली आहे, आता फुलांची शेतीच करायची नाही, असे आम्ही ठरविले आहे.

कॅप्शन

मागणी नसल्याने फुलांचे भाव गडगडले. मातीमोल भावात खरेदीला कोणी तयार नसल्याने अखेर फुलांना कचरा गाडीत टाकावे लागत आहे.