शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

मातीमोल भाव; अखेर फुले कचऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:02 IST

औरंगाबाद : मातीमोल भावातही खरेदी करायला कोणी तयार नसल्याने अखेर शेतकऱ्यांना ४ क्विंटलपेक्षा अधिक टवटवीत फुले कचऱ्याच्या गाडीत ...

औरंगाबाद : मातीमोल भावातही खरेदी करायला कोणी तयार नसल्याने अखेर शेतकऱ्यांना ४ क्विंटलपेक्षा अधिक टवटवीत फुले कचऱ्याच्या गाडीत टाकावी लागली.

सिटीचौकातील फूल बाजारात सध्या चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मंदिर बंद, मंगल कार्यालये बंद, धार्मिक, सामाजिक, व राजकीय कार्यक्रम बंद असल्याने त्याचा परिणाम फूल विक्रीवर झाला आहे.

फुलांचे भाव पाहिले की, शेतकऱ्याच्या हाती किती पैसे मिळत असतील याचा अंदाज येतो. बिजली, गलांडा २ ते ५ रुपये किलो, १० ते १५ रुपये शेकडा गुलाब, काकडा ६० रुपये, झेला १०० रुपये किलो, मोगरा ८० रुपये किलो, निशिगंध ४० ते ६० रुपये किलोने विकला जात आहे. मोगऱ्याचे भाव कधीच एवढे कमी झाले नव्हते. बिजली व गलांडा मातीमोल भावातही कोणी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने बुधवारी सकाळी शेतकऱ्यांना ४ क्विंटलपेक्षा अधिक फुले कचरा गाडीत टाकावी लागली. यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. बबलू शेठ यांनी सांगितले की, बिजली व गलांडा शेतीतून काढणेसुद्धा परवडत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फूल उत्पादक विलास तांबे यांनी सांगितले की, कोरोनामुळे मागील वर्षभरापासून फुलांची शेती तोट्यात चालली आहे, आता फुलांची शेतीच करायची नाही, असे आम्ही ठरविले आहे.

कॅप्शन

मागणी नसल्याने फुलांचे भाव गडगडले. मातीमोल भावात खरेदीला कोणी तयार नसल्याने अखेर फुलांना कचरा गाडीत टाकावे लागत आहे.