शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

मातंग समाज बांधवांचा देगलुरात विराट मोर्चा

By admin | Updated: August 23, 2014 00:47 IST

देगलूर : मातंग समाजाला सामाजिक व आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी देगलुरात २२ आॅगस्ट रोजी विराट मोार्च काढण्यात आला़

देगलूर : मातंग समाजाला सामाजिक व आर्थिक प्रवाहात आणण्यासाठी स्वतंत्र आठ टक्के आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी देगलुरात २२ आॅगस्ट रोजी विराट मोार्च काढण्यात आला़ पारंपरिक वाजंत्री आणि गगनभेदी घोषणा देत हा मोर्चा तहसील कार्यालयावर गेला़ या मोर्चासाठी ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक दाखल झाले़ आ़रावसाहेब अंतापूरकर, माजी आ़ अविनाश घाटे, जि़प़चे माजी अध्यक्ष संभाजीराव मंडगीकर, राष्ट्रवादीचे मारोती वाडेकर, शिवसेनेचे मच्छिंद्र गवाले, नागनाथ वाडेकर, गोपाळ टेंभुर्णे यात सहभागी झाले़ तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत स्वतंत्र आरक्षणाची आवश्यकता का आहे याची विविध वक्त्यांनी मांडणी केली़ मातंग समाजाच्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीच्या अभ्यासासाठी गठीत केलेल्या आयोगाने आपला अहवाल सरकारकडे दिल्यानंतरही काही शिफारशी स्वीकारून स्वतंत्र आरक्षण स्पष्टपणे नाकारण्यात आले़ अन्य समाजाला आरक्षणाचा लाभ देण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली झाल्या़ त्यामुळे संघर्षाशिवाय दुसरा पर्याय नसल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या़ मातंग समाज आरक्षण कृती समितीकडून तहसीलदारांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले़मोर्चा यशस्वीतेसाठी शंकरराव भाटापूरकर, सुभाष जांभळीकर, राजेंद्र मंडगीकर, मनोहर देगावकर, गंगाधर भुयारे, सुभाष अल्लापूरकर, अ‍ॅड़आऱडी़ सूर्यवंशी, प्रा़विश्वनाथ कंधारे, संजय गवलवाड आदींनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)