शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
काय सांगता! २० हजारांचे पॉकेट, 'Apple' ने लाँच केलेल्या उत्पादनाची जोरदार चर्चा
4
"ती कट्टर मुस्लीम नव्हती" जैशची लेडी कमांडर डॉ. शाहीनशी संसार मोडणाऱ्या नवऱ्याने केला खुलासा
5
पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी...
6
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
7
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
8
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
9
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
10
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
11
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
12
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
13
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
14
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
15
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
16
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
17
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
18
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
19
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
20
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!

१८५७ च्या उठावातील शहिदांचा स्मृतिदिन पाळण्यात यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : इंग्रजांविरोधात १८५७ मध्ये उठाव करण्यात आला होता. या युद्धाचा एक केंद्रबिंदू औरंगाबादही होता. या उठावात सहभागी क्रांतिकारकांना ...

औरंगाबाद : इंग्रजांविरोधात १८५७ मध्ये उठाव करण्यात आला होता. या युद्धाचा एक केंद्रबिंदू औरंगाबादही होता. या उठावात सहभागी क्रांतिकारकांना काळा चबुतरा (क्रांतीचौक) येथे तोफेच्या तोंडी देऊन शहीद करण्यात आले. काहींना फाशी देण्यात आली होती. या युद्धातील शहिदांच्या स्मृतीनिमित्त २३ जून रोजी शासकीय पातळीवर स्मृतीदिवस पाळण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

तात्याराव टोपे, नानासाहेब पेशवे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादेतही १८५७ च्या उठावाची ठिणगी पडली होती. याची चाहूल लागताच इंग्रजांनी आपल्या सैन्यातील हिंदू-मुस्लिमांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवून दिले. २३ जून १८५७ रोजी उठाव करणाऱ्या २१ क्रांतिकारकांना शहीद करण्यात आले. तोफेच्या तोंडाला बांधून, काहींना काळा चबुतरा येथे फाशी देण्यात आली होती. या युद्धात हिंदू-मुस्लिम यांची एकता वाखाणण्याजोगी होती. इंग्रजांनीच १८५७ च्या उठावाची घटना लिहून ठेवली आहे. त्यांच्या आधारेच विविध संदर्भ दिल्याचे डॉ. रमजान यांनी नमूद केले. औरंगाबादच्या छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या सहकार्याने पुरावे गोळा केले. शासनाकडे २३ जून हा दिवस शासकीय पातळीवरही स्मृतीदवस म्हणून पाळला जावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.