शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

१८५७ च्या उठावातील शहिदांचा स्मृतिदिन पाळण्यात यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:04 IST

औरंगाबाद : इंग्रजांविरोधात १८५७ मध्ये उठाव करण्यात आला होता. या युद्धाचा एक केंद्रबिंदू औरंगाबादही होता. या उठावात सहभागी क्रांतिकारकांना ...

औरंगाबाद : इंग्रजांविरोधात १८५७ मध्ये उठाव करण्यात आला होता. या युद्धाचा एक केंद्रबिंदू औरंगाबादही होता. या उठावात सहभागी क्रांतिकारकांना काळा चबुतरा (क्रांतीचौक) येथे तोफेच्या तोंडी देऊन शहीद करण्यात आले. काहींना फाशी देण्यात आली होती. या युद्धातील शहिदांच्या स्मृतीनिमित्त २३ जून रोजी शासकीय पातळीवर स्मृतीदिवस पाळण्यात यावा, अशी मागणी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ डॉ. रमजान शेख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.

तात्याराव टोपे, नानासाहेब पेशवे यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादेतही १८५७ च्या उठावाची ठिणगी पडली होती. याची चाहूल लागताच इंग्रजांनी आपल्या सैन्यातील हिंदू-मुस्लिमांना वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पाठवून दिले. २३ जून १८५७ रोजी उठाव करणाऱ्या २१ क्रांतिकारकांना शहीद करण्यात आले. तोफेच्या तोंडाला बांधून, काहींना काळा चबुतरा येथे फाशी देण्यात आली होती. या युद्धात हिंदू-मुस्लिम यांची एकता वाखाणण्याजोगी होती. इंग्रजांनीच १८५७ च्या उठावाची घटना लिहून ठेवली आहे. त्यांच्या आधारेच विविध संदर्भ दिल्याचे डॉ. रमजान यांनी नमूद केले. औरंगाबादच्या छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे यांच्या सहकार्याने पुरावे गोळा केले. शासनाकडे २३ जून हा दिवस शासकीय पातळीवरही स्मृतीदवस म्हणून पाळला जावा, अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.