शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
7
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
8
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
9
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
10
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
11
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
12
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
13
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
14
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
15
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
16
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
17
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
18
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
19
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
20
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी

बाजार समितीत ६० हजार क्विंटल माल पडून

By admin | Updated: May 7, 2017 00:09 IST

लातूर : आडते आणि हमालाच्या वादात जिल्हाभरातील तब्बल ६० हजार क्विंटल शेतमाल गेल्या पाच दिवसांपासून जाग्यावर पडून आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आडत व्यापाऱ्याकडून मिळणारी मजुरी अत्यल्प असून या मजुरीत ५० टक्क्यांनी वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी हमाल, मापाडी, गाडीवान संघटनेच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आलेल्या संपाचा पाचवा दिवसही कडकडीत बंदचा गेला़ या आंदोलनात हमाल, मापाडी, गाडीवान, महिला कामगारांसह तीन हजार हमालांनी पाचव्या दिवशीही पोत्याला हात लावला नाही़ या आंदोलनामुळे लातूर बाजार समितीतील आडत्यांची दुकाने मालाच्या पोत्याने खचाखच भरली आहेतच़ शिवाय, बाजार समितीचे रस्ते आणि प्रांगणही मालाच्या पोत्यांनी जाम झाले आहेत़ त्यात अवकाळी पावसाचा इशारा मिळाल्याने तिकडे शेतकरी हवालदिल झाला असून, आडते आणि हमालाच्या वादात जिल्हाभरातील तब्बल ६० हजार क्विंटल शेतमाल गेल्या पाच दिवसांपासून जाग्यावर पडून आहे़ गेल्या पाच दिवसात बाजार समिती आणि सहायक कामगार आयुक्तांनी आडत व्यापारी आणि हमाल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या चार बैठका घेतल्या़ मात्र याबाबत शनिवारी कुठलाही मार्ग निघाला नाही़ त्यामुळे चारही बैठका निष्फळ ठरल्या आहेत़ हमालांच्या संपाचा शनिवारी पाचवा दिवस होता़ परिणामी, या संपामुळे बाजार समितीत ५० ते ६० हजार क्विंटल शेतमाल जाग्यावर पडून आहे़ यातून शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे़ तसेच कोट्यवधींची उलाढाला ठप्प आहे़ लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत एकूण १ हजार ५०० आडत व्यापाऱ्यांची नोंदणीकृत दुकाने आहेत़ त्यापैकी ७५० दुकाने सुरू आहेत़ या आडतीवर हमाला, मापाडी, गाडीवान आणि महिला कामगार असे एकूण तीन हजार हमाल काम करतात़ गेल्या अनेक दिवसांपासून हमालीचे दर वाढून मिळावेत, यासाठी या कामगारांचा संघर्ष सुरू आहे़ प्रत्येक वेळी आश्वासन देवून संप मिटविण्याचा प्रयत्न केला जातो़ मात्र दिलेल्या आश्वासनांची पूर्तता संबंधित व्यापाऱ्यांकडून होत नसल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे़ सध्या मिळणारी प्रतिक्विंटल हमाली १० रूपये आहे़ ती १५ रूपये करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी कामगार संघटनेची आहे़ याच मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून हा संप सुरू आहे़ लातूरच्या बाजार समितीत १९०० कामगार हे परवानाधारक आहेत़ या कामगारांसह इतर कामगारांची संख्या एकूण तीन हजारांच्या घरात आहे़ २०११ मध्ये हमालीच्या मजुरीत दरवाढ करण्यात आली होती़ तेव्हापासून अद्याप दरवाढ करण्यात आली नाही़ वाढत्या महागाईबरोबर ही दरवाढ होणे अपेक्षित आहे़ मात्र व्यापाऱ्याकडून दुष्काळाचे कारण सांगत गेल्या तीन वर्षांपासून दरवाढ करण्यात आली नाही़ त्यामुळे कामगारांनी पुन्हा काम बंद आंदोलन केले आहे़ परिणामी बाजार समितीतील व्यवहार ठप्प आहेत़