शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठेत ६० टक्के नागरिकांना, ८० टक्के व्यापाऱ्यांना मास्क नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर स्थितीत येत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावण्यासाठी ...

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर स्थितीत येत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावण्यासाठी नागरिकांनाच आठ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यानंतर ही ऐतिहासिक औरंगाबाद शहरात नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये किंचितही फरक पडलेला नाही. सोमवारी दुपारी पैठण गेट, टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा, रंगारगल्ली, सिटीचौक, सराफा, शहागंज, आदी भागात फेरफटका मारला असता ६० टक्के नागरिक, ८० टक्के व्यापारी मास्क विना आढळून आले.

२० फेब्रुवारी रोजी शहरात १२६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. रविवारी शहराचा हा आकडा थेट १८४ पर्यंत गेला. सुनामी लाटेसारखा कोरोना शहरात पसरत आहे. राज्यातील अनेक शहरे, जिल्हे लॉकडाऊनच्या झळा सोसत आहेत. रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावावे किंवा नाही, याचा निर्णय नागरिकांवर सोपविला. सोमवारी औरंगाबाद शहरात याचा काही प्रमाणात तरी बदल दिसून येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, असे काहीच झाले नाही. सोमवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेत हळूहळू गर्दी वाढू लागली. सायंकाळी चार वाजल्यानंतर गर्दीत प्रचंड वाढ होत होती. पैठणगेट ते गुलमंडी, शहागंज ते सिटी चौक, गुलमंडी ते रंगारगल्ली या भागात पाय ठेवायलाही जागा नव्हती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ६० नागरिक मास्क न घालता फिरत होते. यात भरीस भर म्हणून ८० टक्के व्यापारी मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. व्यापारी आणि नागरिकांच्या गळ्यात मास्क तर दिसून येत होता. मात्र, तो लावलेला नव्हता हे विशेष. मास्क न लावल्याने कोरोना होईल याची कोणतीही भीती नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मनात दिसून आली नाही. या परिस्थितीवरून नागरिकांसह व्यापाऱ्यांना लॉकडाऊन हवा आहे असे दिसून येत आहे.

रुग्णसंख्या वाढली तर रात्रीचा लॉकडाऊन

शहरात येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली तर रात्रीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल, अशी शक्यता महापालिकेतील सूत्रांनी व्यक्त केली. १ मार्चनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली तर दिवसाही लॉकडाऊन लावण्यात येईल.

दररोज ७० हजारांचा दंड वसूल

मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून महापालिका दररोज ६० ते ७० हजार रुपये दंड वसूल करीत आहे. यानंतरही नागरिक मास्क लावायला तयार नाहीत.