शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
2
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
3
मनसे नेते प्रकाश महाजनांना अमित ठाकरे, बाळा नांदगावकरांचा फोन; नाराजी दूर करण्याचा प्रयत्न
4
नशिबाचा खेळ! ३३ वर्षांपूर्वी मुलासाठी ढाबा बांधत होते, तिथेच मुलाचा मृत्यू झालेला, त्याच ढाब्यासमोर फौजा सिंग यांना कारने उडवले
5
Mumbai: सोसायटीच्या दहाव्या मजल्यावरून पडून अभियंत्याचा मृत्यू, मालाड पश्चिम येथील घटना
6
अपडेट झालं नाही तर बंद होईल मुलांचं आधार कार्ड; UIDAI नं नियमांमध्ये केला मोठा बदल
7
Vastu Tips: श्रीमंतांचं घर जणू आरसेमहल; कारण आरसे योग्य दिशेला लावण्याने वाढते संपत्ती!
8
अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट
9
'हो, मी पुतीन यांच्यावर खूपच नाराज आहे, पण..."; डोनाल्ड ट्रम्प यांची रोखठोक भूमिका, काय सांगितले?
10
बायकोने रचला हत्येचा कट, मित्र अन् बॉयफ्रेंडने दिली साथ! नवऱ्याच्या कार अपघातामागचं सत्य ऐकून बसेल धक्का
11
अ‍ॅथलीट फौजा सिंग हिट अँड रन प्रकरणातील आरोपी अमृतपाल सिंगला अटक; पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली
12
सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत
13
लंडन-न्यू यॉर्क विसरा! 'हे' आहे जगातील सर्वात महागडं शहर, आपल्या मुंबईचंही यादीत नाव!
14
देशातील 'ही' सर्वात मोठी बँक पहिल्यांदाच देणार बोनस शेअर्स; डिविडंडही मिळणार, १९ जुलै महत्त्वाचा दिवस
15
निवडक १२० पदाधिकारी, १०९ मिनिटांचं प्रश्नोत्तराचे सत्र; मनसे शिबिरात राज ठाकरे काय बोलले?
16
एक स्कीम मुलीसाठी, दुसरी सर्वांसाठी; पाहा तुमच्या गरजेनुसार NPS वात्सल्य-सुकन्यापैकी कोणती आहे बेस्ट?
17
२० गुप्त तळघरे, दुबईच्या मौलानाकडून ट्रेनिंग, पुस्तकातून पसरवला द्वेष! छांगुर बाबाचा नेमका प्लान काय होता? 
18
Stock Market Today: ३६ अंकांनी घसरुन सेन्सेक्स उघडला; मेटल क्षेत्रात घसरण, IT मध्ये तेजी; HDFC-Infosys सह 'यात' तेजी
19
उत्तेजक व्हिडिओ अन् अश्लील भाषा वापरून कमवायचे दरमहिना ३५ हजार; पोलीस तपासात केले कबूल 
20
पोलीस ठाण्यात काम करता करता होमगार्डसोबत पळून गेली तीन मुलांची आई! पोलिसांत धाव घेत पती म्हणाला... 

बाजारपेठेत ६० टक्के नागरिकांना, ८० टक्के व्यापाऱ्यांना मास्क नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर स्थितीत येत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावण्यासाठी ...

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर स्थितीत येत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावण्यासाठी नागरिकांनाच आठ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यानंतर ही ऐतिहासिक औरंगाबाद शहरात नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये किंचितही फरक पडलेला नाही. सोमवारी दुपारी पैठण गेट, टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा, रंगारगल्ली, सिटीचौक, सराफा, शहागंज, आदी भागात फेरफटका मारला असता ६० टक्के नागरिक, ८० टक्के व्यापारी मास्क विना आढळून आले.

२० फेब्रुवारी रोजी शहरात १२६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. रविवारी शहराचा हा आकडा थेट १८४ पर्यंत गेला. सुनामी लाटेसारखा कोरोना शहरात पसरत आहे. राज्यातील अनेक शहरे, जिल्हे लॉकडाऊनच्या झळा सोसत आहेत. रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावावे किंवा नाही, याचा निर्णय नागरिकांवर सोपविला. सोमवारी औरंगाबाद शहरात याचा काही प्रमाणात तरी बदल दिसून येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, असे काहीच झाले नाही. सोमवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेत हळूहळू गर्दी वाढू लागली. सायंकाळी चार वाजल्यानंतर गर्दीत प्रचंड वाढ होत होती. पैठणगेट ते गुलमंडी, शहागंज ते सिटी चौक, गुलमंडी ते रंगारगल्ली या भागात पाय ठेवायलाही जागा नव्हती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ६० नागरिक मास्क न घालता फिरत होते. यात भरीस भर म्हणून ८० टक्के व्यापारी मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. व्यापारी आणि नागरिकांच्या गळ्यात मास्क तर दिसून येत होता. मात्र, तो लावलेला नव्हता हे विशेष. मास्क न लावल्याने कोरोना होईल याची कोणतीही भीती नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मनात दिसून आली नाही. या परिस्थितीवरून नागरिकांसह व्यापाऱ्यांना लॉकडाऊन हवा आहे असे दिसून येत आहे.

रुग्णसंख्या वाढली तर रात्रीचा लॉकडाऊन

शहरात येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली तर रात्रीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल, अशी शक्यता महापालिकेतील सूत्रांनी व्यक्त केली. १ मार्चनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली तर दिवसाही लॉकडाऊन लावण्यात येईल.

दररोज ७० हजारांचा दंड वसूल

मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून महापालिका दररोज ६० ते ७० हजार रुपये दंड वसूल करीत आहे. यानंतरही नागरिक मास्क लावायला तयार नाहीत.