शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
4
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
8
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
9
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
10
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
11
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
12
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
13
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
14
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
15
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
16
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
17
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
18
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
19
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
20
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?

बाजारपेठेत ६० टक्के नागरिकांना, ८० टक्के व्यापाऱ्यांना मास्क नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:04 IST

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर स्थितीत येत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावण्यासाठी ...

औरंगाबाद : कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर स्थितीत येत आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावण्यासाठी नागरिकांनाच आठ दिवसांचा अवधी दिला आहे. त्यानंतर ही ऐतिहासिक औरंगाबाद शहरात नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये किंचितही फरक पडलेला नाही. सोमवारी दुपारी पैठण गेट, टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा, रंगारगल्ली, सिटीचौक, सराफा, शहागंज, आदी भागात फेरफटका मारला असता ६० टक्के नागरिक, ८० टक्के व्यापारी मास्क विना आढळून आले.

२० फेब्रुवारी रोजी शहरात १२६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. रविवारी शहराचा हा आकडा थेट १८४ पर्यंत गेला. सुनामी लाटेसारखा कोरोना शहरात पसरत आहे. राज्यातील अनेक शहरे, जिल्हे लॉकडाऊनच्या झळा सोसत आहेत. रविवारी रात्री मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन लावावे किंवा नाही, याचा निर्णय नागरिकांवर सोपविला. सोमवारी औरंगाबाद शहरात याचा काही प्रमाणात तरी बदल दिसून येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, असे काहीच झाले नाही. सोमवारी सकाळपासून शहरातील बाजारपेठेत हळूहळू गर्दी वाढू लागली. सायंकाळी चार वाजल्यानंतर गर्दीत प्रचंड वाढ होत होती. पैठणगेट ते गुलमंडी, शहागंज ते सिटी चौक, गुलमंडी ते रंगारगल्ली या भागात पाय ठेवायलाही जागा नव्हती. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ६० नागरिक मास्क न घालता फिरत होते. यात भरीस भर म्हणून ८० टक्के व्यापारी मास्क वापरत नसल्याचे दिसून आले. व्यापारी आणि नागरिकांच्या गळ्यात मास्क तर दिसून येत होता. मात्र, तो लावलेला नव्हता हे विशेष. मास्क न लावल्याने कोरोना होईल याची कोणतीही भीती नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मनात दिसून आली नाही. या परिस्थितीवरून नागरिकांसह व्यापाऱ्यांना लॉकडाऊन हवा आहे असे दिसून येत आहे.

रुग्णसंख्या वाढली तर रात्रीचा लॉकडाऊन

शहरात येणाऱ्या तीन ते चार दिवसांमध्ये रुग्णसंख्या झपाट्याने वाढत गेली तर रात्रीचा लॉकडाऊन जाहीर करण्यात येईल, अशी शक्यता महापालिकेतील सूत्रांनी व्यक्त केली. १ मार्चनंतर परिस्थिती हाताबाहेर गेली तर दिवसाही लॉकडाऊन लावण्यात येईल.

दररोज ७० हजारांचा दंड वसूल

मास्क न लावणाऱ्या नागरिकांकडून महापालिका दररोज ६० ते ७० हजार रुपये दंड वसूल करीत आहे. यानंतरही नागरिक मास्क लावायला तयार नाहीत.