शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

स्त्रोत बळकटीकरणाची १९ कामे अखेर मार्गी

By admin | Updated: August 4, 2014 00:51 IST

जालना : मुख्यमंत्री निधीतून देण्यात आलेल्या २ कोटींच्या निधीपैकी १.२० कोटी रूपयांमधून जिल्ह्यात १९ स्त्रोत बळकटीकरणाची कामे होणार आहेत.

जालना : मुख्यमंत्री निधीतून देण्यात आलेल्या २ कोटींच्या निधीपैकी १.२० कोटी रूपयांमधून जिल्ह्यात १९ स्त्रोत बळकटीकरणाची कामे होणार आहेत. यासाठीच्या निविदाही मार्गी लागल्या असून उर्वरीत ८० लाखांचा निधी सिंचन विभागाला देण्यात येणार आहे.जिल्ह्यात २०१३ मधील दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा निधी दिला. ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनेच्या स्त्रोत बळकटीकरणाच्या कामासाठी जिल्हा परिषदेमार्फत यापैकी १ कोटी २० लाखांचा निधी खर्च होणार आहे. स्त्रोत बळकटीकरणासाठी गावांची निवड करताना जिल्ह्यात सतत पाच, चार, तीन व दोन वर्षे टँकरग्रस्त ८८ गावांची निवड करण्यात आली होती. या गावांचे पुन्हा सर्व्हेक्षण करून भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने स्त्रोत बळकटीकरणाची कामे ज्या गावात झाली, ती गावे वगळून ४६ गावांची निवड केली. सदर गावे स्त्रोत बळकटीकरणासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य आहे किंवा नाही, याबाबत खात्री करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग व सहाय्यक भूवैज्ञानिक यांना कळविण्यात आले होते. उपविभाग व सहाय्यक भूवैज्ञानिक यांनी ४६ गावांमधून १९ गावांची निवड तांत्रिकदृष्ट्या योग्य असल्याचा अहवाल सादर केला. मात्र यात परतूर तालुक्यातील एकही गाव निकषात बसले नाही.मंठा तालुक्यात दोन गावांचा समावेश होतो. परंतु वरिष्ठ भूवैज्ञानिक विकास यंत्रणेमार्फत सदर दोन्ही गावांमध्ये यापूर्वी स्त्रोत बळकटीकरणाची कामे झालेली आहेत. त्यामुळे ही गावे वगळण्यात आल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने अनुपालन अहवालात म्हटले आहे.निवड झालेल्या १९ कामांपैकी जी कामे ५ लाख रुपये किंमतीपेक्षा अधिक आहेत, अशा ११ कामांची ई-निविदा प्रसिद्ध करून ती काढण्यात आली. मुख्यमंत्री निधीतील अन्य ८० लाखांचा निधी सिंचन विभागाला देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. मात्र हा निधी सिमेंट नाला बांध कामासाठीच आलेला असल्याने त्याच कामासाठी तो खर्चित व्हावा, अशी मागणी काही सदस्यांनी २७ मे रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत केली होती. मात्र त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने आपली भूमिका ठाम ठेवली. (प्रतिनिधी)सदस्यांनी नोंदविला होता आक्षेप स्त्रोत बळकटीकरणासाठी ज्या गावांची निवड झाली, त्यावरून जिल्हा परिषदेच्या काही पदाधिकारी व सदस्यांनी आपला आक्षेप नोंदविला होता. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी त्याबाबतची चौकशीही केली होती. मात्र या चौकशीनंतर सदरील आक्षेप फेटाळून लावण्यात आले होते. जे सर्वेक्षण झाले ते चुकीचे असून त्यात निकषात न बसणारी गावे घेण्यात आल्याचा आक्षेप घेऊन ही प्रक्रिया रद्द करण्याची मागणी जि.प. सदस्य संभाजी उबाळे यांनी केली होती. उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी मंठा, परतूर तालुक्यात एकही गाव निवडले नसल्याबद्दल तसेच पांडेपोखरी व शिंगोना ही गावे नऊ वर्षांपासून टंचाईग्रस्त असूनही त्यांची निवड झाली नाही, असा आक्षेप नोंदविला होता. अनिरूद्ध खोतकर यांनी ज्या गावात बंधारे झाले, त्या गावांची निवड केल्याचा तर महेंद्र पवार यांनी मर्जितल्या गुत्तेदारांना कामे दिल्याचा आरोप केला होेता.