शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
4
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
5
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
6
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
7
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
8
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
9
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
10
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
11
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
13
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
14
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
15
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
16
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
17
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
18
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
19
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
20
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका

मराठवाड्याच्या जन्माचा साक्षीदार ढासळतोय्

By admin | Updated: September 17, 2014 01:13 IST

संतोष अन्नदाते, तांदूळजा भारतीय संस्कृताचा इतिहास फार प्राचीन व ऐतिहासिक असून, शासनाच्या उदासिन धोरणांमुळे अनेक गावागावातील एैतिहासिक ठेवा नष्ठ होण्याची

संतोष अन्नदाते, तांदूळजाभारतीय संस्कृताचा इतिहास फार प्राचीन व ऐतिहासिक असून, शासनाच्या उदासिन धोरणांमुळे अनेक गावागावातील एैतिहासिक ठेवा नष्ठ होण्याची भिती निर्माण तर झालीच आहे; परंतू यापैकीच प्रमुख व इ़स़ १७६० साली उदगीरच्या लढाईत निजामांचा पराभव होऊन निजाम व मराठे यांच्यातील तहनामा ज्या गढीत झाला तहनामान्यातील करारानुसार निजामांनी मराठ्यांना मराठवाडी भाषिकांचा ‘वाडा’ म्हणून तसेच तुंगभद्रा नदी पर्यंतचा प्रदेश दिला़ याचपैकी याचे नामकरण ‘मराठवाडा’ असे करण्याचे ठिकाण म्हणजे सुमारे अडीचशे वर्षापासून त्या इतिहासाची साक्ष देत असलेली तांदूळज्याच्या सरदार नाईक बावणे यांची गढी आज ढासळू लागली आहे़ सुमारे अडीचशे वर्षापूर्वी ‘मराठवाडा’ या प्रांताला ‘मराठवाडा’ हे नाव देण्याचा ‘ऐतिहासिक निर्णय’ ज्या गढीमध्ये झाला़ त्या लातूर तालुक्यातील तांदूळजा येथील ‘सरदार नाईक बावणे’ यांच्या गर्दीचा विसर पर्यटन मंत्रालयाने पडला आहे़ मराडवाड्याची जन्मभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गडीच्या विकासासाठी ऐतिहासिक स्थळ विकास योजनेअंतर्गत साधा उल्लेखही दिसून येत नाही़ निजामाचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायाने त्याकाळी सरदार नावाची उपाधी देवून कर्तव्यदक्ष मावळे तयार केले़ या सरदारांना विशिष्ट अशा पाच-पन्नास गावाची जहागीरी देवून टाकली व अशा प्रकारे तांदूळजा येथील नाईक बावणे हे त्यावेळचे सरदार होते़ त्याप्रमाणे या सरदारांसाठी व त्याभोवतालच्या प्रदेश संरक्षणासाठी त्यांनी बुरुजवजा मोठमोठ्या किल्ल्याप्रमाणे गढीची निर्मिती झाली़ गढीचे बांधकाम गनिमीकावा पद्धतीने केले गेले़ त्यामुळे शत्रुपासून आले संरक्षण व्हावे तसेच शत्रु आणि त्यांचे मानसे आढळून येताच तोफेचा गोळा शत्रुला लागावा अशा पद्धतीने निर्मिती करण्यात आली़ मराठवाड्याची जन्मभुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गढीने अनेक घडामोडी पाहिल्या आहेत़ १९४८ मध्ये तांदुळजा, सारसा, देवळा येथील गावाच्या लोकांवर रजाकाराने जेव्हा अत्याचार सुरु केले तेव्हा तांदुळजाच्या सरदार जगजीवन उर्फ युवराज नाईक बावणे, बाबुराव बंडेराव शिंदे आदी मंडळींनी रजाकाराला सळो की पळो करुन सोडले़ बन्सीलाल मारवाडी यांच्या मुलाची हत्या करुन सोने-नाणे घेवून जाणाऱ्या ४० रजाकारी पठाणांना मांजरा नदीच्या पुरात गराडा घालून जलसमाधी दिली़ तसेच आज तांदुळजा येथे असलेल्या सामाजिक वनिकरणातही काही रजाकाराला ठार करण्यात आले़