शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
4
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
5
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
6
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
7
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
8
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
9
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
10
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
11
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
12
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
13
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
14
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
15
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
16
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
17
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
18
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
19
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
20
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल

मराठवाडा विकास मंडळाला पाच वर्षांत मिळाले फक्त ५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:04 IST

विकास राऊत औरंगाबाद : मराठवाड्यातील सिंचन, शिक्षण, उद्योग, कृषी क्षेत्राशी निगडित अनुशेष भरून काढण्यासाठी स्थापन केलेल्या मराठवाडा (वैधानिक) विकास ...

विकास राऊत

औरंगाबाद : मराठवाड्यातील सिंचन, शिक्षण, उद्योग, कृषी क्षेत्राशी निगडित अनुशेष भरून काढण्यासाठी स्थापन केलेल्या मराठवाडा (वैधानिक) विकास मंडळाला मागील ५ वर्षांत फक्त ५० कोटींचा निधी शासनाकडून मिळाला. १ हजार कोटींची मागणी असताना केवळ ५ टक्के निधी देऊन गेल्या सरकारने मंडळाची बोळवण केली होती. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात मंडळाची मुदत संपुष्टात आल्यामुळे यापुढे मंडळाचे अर्थपूर्ण सक्षमीकरण होणार की, पुन्हा येरे माझ्या मागल्याप्रमाणे सुरू राहणार, हे अद्याप स्पष्ट नाही.

सहसंचालकांपासून शिपायांपर्यंतची १७ पदे मंडळासाठी मंजूर असून, त्यातील निम्म्याहून अधिक पदे रिक्त आहेत. १९९४ पासून आजवर २७ वर्षांत मंडळाला फारसे अनुदान मिळाले नाही. २००८ पासून तर मंडळाला अध्यक्षही नव्हते. २०१८ ला अध्यक्ष मिळाले, त्यांनाही पूर्ण कार्यकाळ मिळाला नाही. तज्ज्ञ सदस्यांची नियुक्त राज्यपालांनी केली. मात्र, बैठकी आणि परिसंवादापलीकडे या मंडळाच्या हाती काहीही लागले नाही.

माजी अध्यक्ष खा. डॉ. भागवत कराड, तज्ज्ञ सदस्य मुकुंद कुलकर्णी, शंकर नागरे, कृष्णा लव्हेकर, बी.बी. ठोंबरे, डॉ. अशोक बेलखोडे यांनी मागील सरकारकडे आणि विद्यमान सरकारकडे वारंवार निवेदने देऊन मंडळ आणि सक्षमीकरण या मुद्यांकडे लक्ष वेधले. मात्र, कोणत्याही सरकारने त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. सद्य:स्थितीत विनाअधिकाराचे दुर्लक्षित मंडळ म्हणून याकडे पाहिले जात आहे.

उद्योगासाठी काय हवे

एमएसएमईचे क्लस्टर निर्माण करण्यासाठी शासनाची योजना आहे. त्यामध्ये शेतीपूरक उद्योग व शेतकऱ्यांचा सहभाग वाढेल असा विचार करावा. दोन वर्षांत प्रत्येक तालुक्यात दोन क्लस्टर सुरू व्हावेत. यासाठी १५० कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करावी.

शिक्षण -आरोग्य अनुशेषासाठी हे करावे

नांदेड वैद्यकीय महाविद्यालय येथे पॅरामेडिकल अभ्यासक्रम सुरू करून १ व २ वर्षांचे कोर्स तेथे असावेत. वैद्यकीय क्षेत्र वाढत असून, ग्रामीण भागातील मुलांना त्या अभ्यासक्रमांचा फायदा होईल. या अभ्यासक्रमांसाठी नांदेड महाविद्यालयाला इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी ३ वर्षे अनुदान द्यावे. किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांना चालना द्यावी.

सूक्ष्म सिंचनातून अशी अपेक्षा

मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. इतर योजनेव्यतिरिक्त ७०० कोटी रुपयांची तरतूद मायक्रो (सूक्ष्म) सिंचनासाठी करण्यात यावी. जेणेकरून मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागाला दिलासा मिळेल.

सिंचनासाठी समान तरतूद असावी

२०१० साली शासनाने राज्यातील सर्व सिंचन अनुशेष संपल्याचे जाहीर केले. सध्या विदर्भातील चार जिल्ह्यांचा सिंचन अनुशेष भौगोलिकदृष्ट्या समोर आणला गेला. ९ लाख हेक्टरचा अनुशेष विदर्भात दाखविला जात आहे. त्यातुलनेत साडेचार लाख हेक्टरच्या सिंचनाला मराठवाड्यात वाव आहे. २०१० पर्यंतचा विचार न करता २०१५ पर्यंत सिंचनाच्या अनुशेषाबाबत विचार व्हावा. केवळ विदर्भातील चार जिल्ह्यांचा विचार न करता मराठवाड्याचाही त्यासोबत कमी-अधिक प्रमाणात विचार व्हावा. अशा सूचना तज्ज्ञ सदस्यांनी मागील सरकारला केल्या होत्या.