शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात तीन महिन्यांत ५१३ मि.मी.पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:08 IST

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा पावसाळ्यातील तीन महिन्यांत ५१३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. ६७९ मि.मी. सरासरीच्या तुलनेत झालेले पर्जन्यमान ...

औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा पावसाळ्यातील तीन महिन्यांत ५१३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. ६७९ मि.मी. सरासरीच्या तुलनेत झालेले पर्जन्यमान समाधानकारक असल्याचा दावा हवामान खात्याने केला. पावसाळ्याचा सप्टेंबर हा शेवटचा महिना असून १ सप्टेंबर रोजी विभागात ८.९ मि.मी. पाऊस झाला. यात औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सात मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात विभागात सुमारे १६६ मि.मी. पाऊस होण्याची गरज आहे. १ सप्टेंबर राेजी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात ७१ मि.मी तर गोलेगांव मंडळात ११४ मि.मी. पाऊस बरसला. जालना जिल्ह्यातील भोकरदन ११२ मि.मी. सिपोरा मंडळात ७७ तर धावडा ६६, आन्वा १४१ आणि जाफ्राबाद मंडळात ८५ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.

ऑगस्ट अखेरीस पावसाचे पुनरागमन झाल्यानंतर मोठ्या ११ प्रकल्पांपैकी जायकवाडी, माजलगाव आणि मांजरा प्रकल्पात कमी जलसाठा आहे. उर्वरित प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.

तीन महिन्यांत जिल्हानिहाय झालेला पाऊस असा

औरंगाबाद ४३१.२ मि.मी., जालना ४६१.३ मि.मी. बीड ३९४.१ मि.मी. लातूर ५२५ मि.मी. उस्मानाबाद ४१८.४ मि.मी. नांदेड ६४७ मि.मी. परभणी ५९२.३ मि.मी. हिंगोली ६४०.६ मि.मी. पाऊस यंदाच्या पावसाळ्यात नाेंदविला गेला आहे. गेल्यावर्षी आजवर ५६१.५ मि.मी पाऊस मराठवाड्यात झाला होता.

जायकवाडी ४३.३६ टक्क्यांवर, मानार, विष्णुपुरी तुडुंब

दोन दिवसांतील पावसामुळे जायकवाडी धरणात सुमारे अडीच ते तीन टक्क्यांनी जलसाठा वाढला आहे. धरणात सध्या ४३.३६ टक्के जलसाठा झाला आहे. नाशिककडून अद्याप पाण्याचा ओघ नसल्यामुळे जायकवाडी ५० टक्क्यांच्या आत आहे. निम्न दुधनामध्ये ९४, येलदरी ८७, सिध्देश्वर ९६, माजलगांव ५६, मांजरा २६, पैनगंगा ८२, मानार १०० टक्के भरले आहे. तर निम्न तेरणा प्रकल्पात ५७ टक्के, विष्णुपुरीत १०० टक्के, सिना कोळेगांवमध्ये ८ टक्के, शहागड बंधारा ३५ तर खडका बंधाऱ्यात ९९ टक्के जलसाठा सध्या आहे.