शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याला सर्वकाही भांडून मिळवावे लागते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:04 IST

--- औरंगाबाद : संतांची भूमी असली तरी मराठवाड्याला सर्वकाही भांडून मिळवावे लागते. विकासासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र येऊन ...

---

औरंगाबाद : संतांची भूमी असली तरी मराठवाड्याला सर्वकाही भांडून मिळवावे लागते. विकासासाठी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व पक्ष एकत्र येऊन काम करतात. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मराठवाड्याला झुकते माप मिळून अधिकचा निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

सावंगी वळण रस्ता ते केंब्रीजपर्यंत रस्त्याच्या १३ कोटींच्या निधीतून विशेष दुरुस्ती, भालगाव - शेंद्रा रस्ता विशेष दुरुस्तीसाठी पाच कोटींच्या कामाचे भूमिपूजन, कुंभेफळ येथे जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके यांच्या केलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा शनिवारी झाला. यावेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे, जि. प. अध्यक्षा मीना शेळके, आ. हरिभाऊ बागडे, आ. अंबादास दानवे, माजी आ. कल्याण काळे, नामदेव पवार, सुभाष झांबड, सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे, हिशाम उस्मानी, इब्राहीम पठाण, जगन्नाथ काळे, रामराव शेळके, ह.भ.प. तावरे नाना, सरपंच कांताबाई मुळे, उपसरपंच मनीषा शेळके, मुख्य अभियंता दिलीप उकीर्डे, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, सुधीर मुळे, आदींची उपस्थिती होती.

मंत्री चव्हाण म्हणाले, जिल्ह्यातील १२३९ कोटींची रस्त्याची कामे अर्थसंकल्पात मंजूर आहेत. त्यातील २०० कोटींचा निधी सुरुवातीला दिला असून, २३७ कोटींच्या दुरुस्तीची कामे मंजूर केली. इमारतींच्या कामांना ३६५ कोटींची कामे मंजूर करून ८२ कोटी दिले. २०० पुलांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पुढील दोन वर्षांत ही कामे पूर्ण होतील. औरंगाबाद-पुणे-मुंबई जोडण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली आहे. समृद्धी महामार्गासोबत नांदेड-औरंगाबाद-मुंबई बुलेट ट्रेनने जोडण्यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही लक्ष घालायला सांगणार आहे. लाडसावंगी-करमाड १५ किलोमीटर रस्ता सीआरएफ मधून घेण्याच्या सूचना मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत. केंब्रीज शाळेच्या चौकात, शेंद्रा येथे भर पावसात कार्यकर्त्यांनी मंत्री चव्हाण यांच्या क्रेनद्वारे मोठ्या हारांनी स्वागत करून फटाक्यांची आतषबाजी केली.

---

मातोश्री पाणंद रस्त्याची योजना लवकरच

अतिवृष्टीत खचलेल्या विहिरी राेजगार हमी योजनेतून पुन्हा बांधण्यासाठी मदत करू तसेच मातोश्री पाणंद रस्ता योजनेचा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये येईल. त्या योजनेमुळे शेतात जाण्यासाठी पक्का रस्ता बनवता येईल. प्रत्येक शेतात जायला पक्का रस्ता आपल्या भागात देऊ, असे रोहयो मंत्री संदीपान भुमरे म्हणाले.

---